Sunday, 9 October 2011

/ देवत्व कल्पना-ब्रम्हा - विष्णू - महेश. ह्या देवत्वाच्या मूर्तीच्या कल्पना

ईश्वर / देवत्व कल्पना-ब्रम्हा - विष्णू - महेश. ह्या देवत्वाच्या मूर्तीच्या कल्पना
आपल्याकडे देवत्वाच्या ६ कल्पना आहेत कल्पना असे मी अशासाठी म्हणतो जो पर्यंत मला ती गोष्ट स्पष्ट पणे जाणवत नाही तो पर्यंत माझ्यासाठी ती कल्पनाच असते. आणि मला अजून पर्यंत तरी देव जाणवलेला नाही म्हणून माझ्यासाठी ती कल्पना आहे.
पहिला प्रकार ----- ओंकार (गणपती),
दुसरा प्रकार ------- ब्रम्हा - विष्णू - महेश. ह्या देवत्वाच्या मूर्तीच्या कल्पना ------------ सत्व - रज - तम हे त्यांचे गुण  ---------- सात्विक -- राजस-- तामसी हे त्यांचे स्वभाव म्हणजेच वृत्ती 
तिसरा प्रकार ----- पंचमहाभूते ----- पृथ्वी - आप (पाणी) - तेज - वायू - आकाश
चौथा प्रकार ----- सजीवांच्या उत्र्क्रांतीवादाचा म्हणजेच दशावतार १) मत्स्य, २) कूर्म, ३) वराह, ४) नारसिंह, ५) वामन, ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण, ९) बौद्ध, १०) कलंकी (कली)
पाचवा प्रकार ----- युगपुरुष ----- महान पुरुष ----- कालपरत्वे समाजाला लाभलेले विविध प्रकारचे नेते. उत्क्रांतीवादाच्या मधील दशावतारांपैकी शेवटचे ५ हे ह्याच प्रकारतहि येतात.
 
आता दुसरा प्रकार ----- (पहिला प्रकार ----- ओंकार (गणपती), झाला) ----- ब्रम्हा - विष्णू - महेश. -----ह्या देवत्वाच्या मूर्तीच्या कल्पना आपल्या सर्वांना परिचित आहेत ह्या मागच्या संकल्पनांचा आता विचार करू. ह्या दुसर्या प्रकारात वृतींचा विचार केलेला दिसतो, आणि त्या वृत्तींनाच देव मानले आहे 
१) ब्रम्हा म्हणजे a कार ----- निर्मिणारा, निर्मितीचा आनंद मिळाल्यामुळे सदा प्रसन्न ----- सत्वगुणी. ह्या वेळी गुणांच्या बरोबर आणखीन एक जाणीव निर्माण झाली ती म्हणजे गती आणि काल. कारण निर्मिती म्हणजे कर्माबरोबर प्रवाह गती व काल संकल्पना हि निर्माण झाली म्हणजे गात काल-भूत काल, वर्तमान काल, व भविष्य काल म्हणजे तीनही काळाचे भान ठेऊन निर्मिती करायची. मागेहि पहायचे वर्तमानही लक्ष ठेवायचे  आणि भविष्याचे भान ठेवायचे म्हणजे तिथेही लक्ष ठेवायचे.   
२ विष्णू म्हणजे उकार ----- पालनकर्ता, पालन करणे म्हणजे जबाबदारी आली आणि जबाबदारी आली कि गांभीर्य आलच म्हणून गंभीर -------- राजसगुणी. इथे देह बुद्धी मन न्यानेद्रीये कर्मेंद्रिये सर्वांचा विकास साधायचा हे जबाबदारी माणसावर आहे. मग विश्व चालवणाऱ्या त्या ईश्वरावर केव्हढी जबाबदारी असेल आणि तो किती गंभीर असायला हवा. तसा तो नसेल तर आजच्या आपल्या राज्या/देश सारखी पूर्ण विश्वाची काय अवस्था होईल कल्पना करू शकाल आपण. तरीही तो त्याचे नियम सोडत नाही. म्हणूनच त्याला कृपाळू म्हणतात.
३ महेश म्हणजे मकार -----  नष्ट करणारा रागीट कारण राग आल्याशिवाय नाश करता येणार नाही  ----- तामसगुणी. तीनही गुणांचा समन्वय तो गजानन ओंम्कर स्वरूप ह्या ओंकार स्वरुपाची मी दिलेल्या माहितीखेरीज भरपूर माहिती आधीच उपलब्ध आहे त्यामुळे तीच मी परत देत नाही. आणि माझ्या दृष्टीकोनातून जी माहिती द्यायची ती ओमकार मद्ध्ये दिलीच आहे.  
आता ह्या दुसऱ्या प्रकारात ब्रम्हा विष्णू व महेश ह्यांना देव मानले आहे सत्व - रज - तम हे त्यांचे गुण  ---- सात्विक - राजस - तामस --- ह्या वृत्ती आहेत. अति पूर्व काळात हे देव मानले गेलेले दिसतात एकूण वास्तवाचा विचार केला तर त्रिगुणांनाच आदरणीय मानण्यात आलेले आहे. आणि त्यांनाच देवत्व बहाल केले आहे. हेच त्रिगुण माणसात कायम असतात. फक्त त्यांचे प्रमाण प्रत्येकात वेगवेगळे असते त्या मूळे त्यांच्या  त्यांच्या  अधिकात्वा वरून आपण व्यक्तीचा स्वभाव ठरवतो . समाज व्यवस्थेचा विचार करता माणसाला नेहमीच समोरून चांगला माणूस ---- सात्विक माणूस भेटावा/लाभावा  असे वाटत असते पण आपणही पूर्णपणे सात्विक नसतो. ईश्वर संकल्पना करतांना मात्र तीनही गुणांना समान प्राधान्य दिले गेलेले  आढळते.
ह्या देवत्वाच्या कल्पनान मद्ध्ये सजीव नाहीये. वृत्ती किंवा जडलाच कल्पनेने मानवी देह योजलेले आहेत. ब्रम्हा तीनही काळाचे भान असलेला म्हणून तीन तोंडे कल्पिली. विष्णू अत्यंत धीरागाम्भ्रपणे कर्तव्य पालन करणारा नागावर आरूढ होऊनही शांत. आणि शंकर तर क्रोधी म्हणजे तो क्राध दोन डोळ्यातून बाहेर येण्याला कमी पडेल म्हणून तिसरा डोळा त्याला आहे त्यातून तो आग बाहेर सोडतो आणि सर्व भस्मसात होत हि कल्पना. पण त्यांना मानवी रूपे देण्याचे कधी सुरु झाले हे इतिहास किंवा पुराने कुठेही नमूद करत नाहीत. पण त्याच बरोबर हे हि सत्य आहे कि
सृष्टीच्या अस्तित्वासाठी सर्वांची सारखीच गरज आहे ह्या गोष्टीची जाणीव मात्र त्या कालच्या मानवी कल्पना करणाऱ्या मानवालाही आहे. 
आज मात्र आपण माणूस त्या वृत्तींना उच्च नीच भेदाने स्वीकारतो. त्यातल्या त्यात उच्च नीच ठरवतो. आणि त्यामुळेच निसर्गाने देलेल्या देणगीचा  आपल्याला नीट वापर करता येत नाही.
वृत्तींना देव मानायचे म्हणजे त्यांना जाणायचे. राजयोगाच्या साधनेत समाधीचे ३-४ प्रकार सांगितले आहेत त्यातील निर्विकल्प समाधी च्या पूर्वी  सविकल्प समाधीत पर्यंतच्या सर्व प्रकारात ह्या स्वतःच्या वृत्तींवर  मन एकाग्र करायचे असते. स्वतःच्याच वृत्तींवर स्वतःच मन एकाग्र करणे हे सोपे नाही. मनावर प्रचंड ताण येतो. मेंदूला थकवा येतो. मुळात ते समजायलाच कठीण आहे अशक्य नाही  भौतिक जाणीवेचा तो शेवटचा टप्पा आहे. तामसी विचार दूर सारून सात्विक विचार जाणीवपूर्वक करायचा. अशा सतत प्रयत्नाने आपण आपल्या मनाला सतत सात्विक विचार करायला शिकवतो होतो आणि शेवटी तो हि सोडून द्यायचा. तेव्हा निर्विकल्प समाधीकडे आपला प्रवास सुरु होतो. ह्यालाच  अनन्य म्हणजे निव्वळ बिनतक्रार विना अट शरणागती म्हणतात. हे पूजा, आरती करतांना आपण रोज तोंडाने म्हणतो पण मुळात हा मनाचा भाव आहे तो जमला तर उपयोग नाहीतर नुसताच आरतीतील घंटानाद. स्वानुभव घेऊन बघायच्या ह्या गोष्टी आहेत. असो   हे सर्व प्रकार सर्व सामान्न्यांसाठी कठीण (अशक्य नाहीत) आहेत. त्यामुळेच मूर्ती कल्पना आल्या आणि त्या जास्तीतजास्त रुजल्या. त्याचे कारण माणसाला दृश्याची जाणीव सवय जन्मापासून आहे. त्यामुळे त्याला ते  जाणणे  सोपे  जाते ती सवय इतकी आहे कि त्याला त्या गोष्टी स्वप्नातही दिसतात. ह्यातूनच पुढे भक्ती मार्गाची व्यवस्था झाली. हा सूक्ष्म कडून स्थूलाकडे नेणारा विचार आहे --- जडाकडे नेणारा  प्रवास आहे. आणि त्याचे आचरण हा त्याच जादाकडून सूक्ष्म जो परमात्मा त्याच्या कडे नेणारा प्रवास आपण प्रत्यक्षात करायचा आहे. म्हणजेच साधना करतांना त्या सहज जाणवणाऱ्या जादाचा आधार घेऊन सूक्ष्म पर्यंत जाणे म्हणजे परमार्थाचा प्रवास होय. आमची अडचण हि आहे कि आपण त्यात प्रवास करतच नाही फक्त जडताच घुटमळत राहतो. म्हणून अनुभव येत नाही निर्भेळ आनंद मिळत नाही. आयुष्याचे प्रश्न तर मुळीच सुटत नाहीत. कारण आम्ही ढोंगी आहोत. आपण बहुतांशी धार्मिक कृत्य  आपण धार्मिक आहोत असे जगाला दाखवण्यासाठी करतो. समाजात आपले थोडे तरी स्थान राहावे म्हणून करतो. चार लोक आपल्याला आस्तिक आहात असे म्हणावीत म्हणून करतो. स्वतःच्या मानसिक उत्कर्षासाठी करत नाही म्हणून अनुभव येत नाहीत. पुन्हा एकदा विवेकानंदांचे वाक्य नामुद   करतो  ""अन सेल्फिश नेस इस मोर पेइंग यु बट पिपल डोन्ट हाएव पेशंस टू प्रेक्टीस इट"" ------ हाएव पेशंस.शुभम भवतु         
 
 
 
 
 
   

No comments:

Post a Comment