Sunday, 9 October 2011

देवत्व कल्पना -- चौथा प्रकार -- उत्र्क्रांतीवाद -- दशावतार -- १) मत्स्य, २) कूर्म, ३) वराह, ४) नारसिंह,

देवत्व कल्पना -- चौथा प्रकार -- उत्र्क्रांतीवाद -- दशावतार -- १) मत्स्य, २) कूर्म, ३) वराह, ४) नारसिंह,
आपल्याकडे देवत्वाच्या ६ कल्पना आहेत कल्पना असे मी अशासाठी म्हणतो जो पर्यंत मला ती गोष्ट स्पष्ट पणे जाणवत नाही तो पर्यंत माझ्यासाठी ती कल्पनाच असते. आणि मला अजून पर्यंत तरी देव जाणवलेला नाही म्हणून माझ्यासाठी ती कल्पना आहे.
पहिला प्रकार ----- ओंकार (गणपती),
दुसरा प्रकार ------- ब्रम्हा - विष्णू - महेश. ह्या देवत्वाच्या मूर्तीच्या कल्पना ------------ सत्व - रज - तम हे त्यांचे गुण  ---------- सात्विक -- राजस-- तामसी हे त्यांचे स्वभाव म्हणजेच वृत्ती
तिसरा प्रकार ----- पंचमहाभूते ----- पृथ्वी - आप (पाणी) - तेज - वायू - आकाश
चौथा प्रकार ----- सजीवांच्या उत्र्क्रांतीवादाचा म्हणजेच दशावतार १) मत्स्य, २) कूर्म, ३) वराह, ४) नारसिंह,
पाचवा प्रकार ----- सजीवांच्या उत्र्क्रांतीवादाचा म्हणजेच दशावतार ५) वामन, ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण,
सहव्वा प्रकार ----- सजीवांच्या उत्र्क्रांतीवादाचा म्हणजेच दशावतार ९) बौद्ध, १०) कलंकी (कली)
 
चौथा प्रकार ------ दशावतार  - उत्क्रांतिवाद जो डार्विन च्या उत्क्रांतीवादशी जुळणारा आहे. सजीवांची उत्क्रांती हा एक वर्षानुवर्षे घडत आलेली क्रिया आहे. ती आपण नाही निसर्ग करत आला. हे जरी खरे असले तरी त्यात सजीवाचा हि काही वाट आहे ह्यात वाद नाही आपल्याकडे ८४ लक्ष योनी  म्हणजे सजीव  प्रकार आहेत असा पौराणिक उल्लेख आढळतो. त्यातील महत्वाचे टप्पे म्हणजेच हे दश अवतार आहेत. हे मात्र नक्की. आणि हे विस्ञान सिद्ध हि आहे.
आत्ता पर्यंत जे प्रकार पहिले त्यात शब्द वृत्ती आणि पंचमहाभुते ह्या पैकी कोणताच प्रकार सजीव नाही सजीवांची उत्क्रांती हि ह्या श्रुष्टीच्या उत्क्रांतीच्या पुढचा टप्पा आहे त्या मूळे त्याला हि देवत्व मानण्याची पद्धत आपल्याकडे दिसते. ह्याचे मी तीन भाग केले आहेत पहिले चार अवतार प्राण्यातील प्रगती दर्शवते पाच ते आठ हे मानवाची उत्क्रांती दर्शवते आणि पुढे नऊ व दहा हे आधुनिक आहेत जे जे वर जाते ते ते खाली येते त्याची प्रचीती देते   
दशव्तारांना देवत्व मानण्याची कल्पना हि सजीवांची सुरुवात ते आजचा मानव ह्या दोन प्रमुख स्थितींना जोडणारी महत्वाची कल्पना आहे.
१ ला अवतार- मत्स्य. आपल्याकडे ८४ लक्ष सजीव प्रकार आहेत अशी काल्पन आहे. आणि त्यांची प्रगती सुद्धा जलचर उभयचर भूचर अश्या क्रमाने झालेली आजच्या विज्ञान प्रधान युगालाही जान आहे. त्यातील बदलत्या टप्प्यातील शेवटचा टप्पा हा देवत्व मानला गेलेला दिसतो. मत्स्याच्या पुढची पायरी उभयचर २ रा अवतार कूर्म  ३ रा भूचर वराह व ४ था नरसिंह हे रूप मात्र विज्ञानाच्या उत्क्रांती वादाशी थोडे वेगळे दिसते.
ह्या उत्क्रांती वादाच्या मागची मानसिकता काय असावी ह्याचा आता विचार करू श्रुष्टीतील याच्या यावत सजीव मुक्ती साठी तडफडत आहे. त्याच्या अनेक इच्छांपैकी मुक्ती हि इच्छा आगदी प्रत्येकात अखंड आहे पण त्या साठी आपल्याला नेमके काय घडले म्हणजे आपण मुक्त होऊ? आपल्याला मोकळे वाटेल? असा विचार ज्या ज्या वेळी मनात घर करतो त्या त्या वेळी त्याला न लाभलेली गोष्ट लाभली तर आपल्याला मुक्त वाटेल हि सहज प्रवृत्ती निर्माण होते आगदी प्रत्येक सजीवत. हि मुक्तीची तीव्र इच्छाच त्याला उत्क्रांतीला मदत करते. आणि त्यातूनच त्याच्या प्रत्येक पूर्वीच्या योनिपेक्षा जरा उच्च योनी त्याला प्राप्त होते. ह्या बदलाचा वेग कमी असतो पण आन आपण प्रगत मानव विचार करू शकतो म्हणून ह्या मागच्या प्रगतीच्या आलेखाची आपल्याला करपणा येऊ शकते. त्यातील महत्वाचे टप्पे म्हणजेच दहाव्तारातील पहिले ४ अवतार होत.
   
     

No comments:

Post a Comment