हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग ४ ----- देवक ठेवणे
विधी ७ वा -------------- देवक ठेवणे ---- ह्याला देवदेवक ठेवणे असेही म्हणतात. हा धार्मिक विधी आहे. ह्यात गणपती पूजन, पुंण्याहवाचन मातृका पूजन व नांदीश्राद्ध एव्हढे विधी अंतर्भूत आहेत.
केव्हा करावा -------- लग्नापूर्वी किंवा सोयीनुसार १, ४, ५, दिवस आगोदर ठेवता येते. काही संकट समयी अपरिहार्य कारण असल्यास विवाहाच्या आधी १० दिवस सुद्धा थेत येते. पण ते ठेवल्यावर वधु अथवा वराने घराच्या बाहेर जाऊ नये अशी अपेक्षा असते म्हणून आजकाल ते आदल्या दिवशी किंवा लाग्नाच्याच दिवशी लग्नापूर्वी ठेवतात. सर्व कार्य पुरे झाल्यावर हे उठवतात म्हणजे त्या देवतांच्या साक्षीने सर्व कार्य केले जावे असा संकेत आहे.
आवश्यक व्यक्ती ----- गुरुजी, वधु/वर, त्यांचे आई/वडील, कुंकू लावण्यासाठी सुवासिनी, करवली, दोन्ही पक्षी स्वतंत्र पणे करयचे असते.
माहिती -------------- आज सोयीसाठी हा विधी हॉलवरच केला जातो. खर तर हा विधी वधूवरांच्या आई वडिलांनी आपापल्या घरी करायचा असतो. आणि लग्नाचा सर्व विघी पूर्ण झाल्यावर देवक उठवायचे असते. ह्या विधीच्या वेळी मुलाच्या व मुलीच्या घरी वेगवेगळा संकल्प असतो.
वरपित्याचा संकल्प असा --------- माझा मुलगा ह्याच देव व ऋषी व पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी त्याच प्रमाणे धार्मिक संस्काराची बैठक घेऊन प्रजोत्पादन करण्यासाठी श्री पर्मेश्वर्प्रीत्यार्थम मी विवाह संस्कार करतो आहे.
वधु पित्याचा संकल्प असा ------- माझी मुलगी हिने भ्र्त्रासह आपल्या पतीसह कोणत्या गोष्टी स्वीकारायच्या आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या तसेच धर्माचरण करण्याकरिता अधिकार मिळण्यासाठी श्री परमेश्वराप्रीत्यार्थम विवाह संस्कार करतो आहे.
१) गणपती पूजन
२) पुंण्याः ह वाचन ----- वरुण पूजा
३) मातृका पूजन ----- या एकूण २७ देवता आहेत गौरी आदी १६ देवता, ब्राम्ही आदी ७ देवता, गणपती, दुर्गा, क्षेत्रपाल वस्तू अशा २७ देवता आहेत. ह्या सर्व देवतांची पूजा सुपात सुपारी स्वरुपात मांडून करावयाची असते.
४) नांदी श्राद्ध ----- म्हणजे कोणतेही मंगल कार्य करण्यापूर्वी पूर्वजांचे स्मरण होय. कर्त्याची आई, आजी, पणजी, वडील, आजोबा, पणजोबा, व कर्त्याच्या आईचे वडील, आजोबा, पणजोबा, व आईची आई, आजी, पणजी यांचे स्मरण असते. (नामोच्चार नाही) त्याच बरोबर मंडप पूजा करयची असते. त्याच्या ६ देवता आहेत नंदिनी, नलिनी, मैत्र, उमा, पशुवार्धिनी, शास्त्रागार्भा,-भगवती (दर्भ आंब्याच्या पानात गुंडाळून उंबराचे पान व दुर्वा गुंडाळून दोऱ्याने बांधून) त्याची पूजा करायची असते. (हे मांडवाचे खांब कल्पिलेले आहेत) खरा मांडव घातला असेल तर मांडवाच्या आग्नेय कोपऱ्यातील खांबांची- मेथीकादेवीची पूजा करावी. तांदूळ, हळकुंड, सुपारी, रुमालात बांधून त्या खांबाला बांधून ठेवावी. देवक उठवल्यावर त्याचे विसर्जन करावे. अविघ्न कलश म्हणजे गणपतीची पूजा सुगड व त्यावर झाकण त्यात तांदूळ सुपारी खारीक बदाम हळकुंड तिलाच लाडू, कुलदेवतेचा नारळ पुजावा. अश्तागरात म्हणजे अलिबाग तालुक्यात मातृकापुजानात कुलदेवता असतेच म्हणून वेगळ्या नारळाची कुलदेवता म्हणून पूजा करण्याची प्रथा नाही. अन्य ठिकाणी कुलदेवता म्हणून नारळाची पूजा करण्याची प्रथा आहे. त्या वेळी सुग्डला व नारळाला सुत गुंडाळायचे असते.
क्रमशः ------------------------ गौरी हार पूजा
विधी ७ वा -------------- देवक ठेवणे ---- ह्याला देवदेवक ठेवणे असेही म्हणतात. हा धार्मिक विधी आहे. ह्यात गणपती पूजन, पुंण्याहवाचन मातृका पूजन व नांदीश्राद्ध एव्हढे विधी अंतर्भूत आहेत.
केव्हा करावा -------- लग्नापूर्वी किंवा सोयीनुसार १, ४, ५, दिवस आगोदर ठेवता येते. काही संकट समयी अपरिहार्य कारण असल्यास विवाहाच्या आधी १० दिवस सुद्धा थेत येते. पण ते ठेवल्यावर वधु अथवा वराने घराच्या बाहेर जाऊ नये अशी अपेक्षा असते म्हणून आजकाल ते आदल्या दिवशी किंवा लाग्नाच्याच दिवशी लग्नापूर्वी ठेवतात. सर्व कार्य पुरे झाल्यावर हे उठवतात म्हणजे त्या देवतांच्या साक्षीने सर्व कार्य केले जावे असा संकेत आहे.
आवश्यक व्यक्ती ----- गुरुजी, वधु/वर, त्यांचे आई/वडील, कुंकू लावण्यासाठी सुवासिनी, करवली, दोन्ही पक्षी स्वतंत्र पणे करयचे असते.
माहिती -------------- आज सोयीसाठी हा विधी हॉलवरच केला जातो. खर तर हा विधी वधूवरांच्या आई वडिलांनी आपापल्या घरी करायचा असतो. आणि लग्नाचा सर्व विघी पूर्ण झाल्यावर देवक उठवायचे असते. ह्या विधीच्या वेळी मुलाच्या व मुलीच्या घरी वेगवेगळा संकल्प असतो.
वरपित्याचा संकल्प असा --------- माझा मुलगा ह्याच देव व ऋषी व पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी त्याच प्रमाणे धार्मिक संस्काराची बैठक घेऊन प्रजोत्पादन करण्यासाठी श्री पर्मेश्वर्प्रीत्यार्थम मी विवाह संस्कार करतो आहे.
वधु पित्याचा संकल्प असा ------- माझी मुलगी हिने भ्र्त्रासह आपल्या पतीसह कोणत्या गोष्टी स्वीकारायच्या आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या तसेच धर्माचरण करण्याकरिता अधिकार मिळण्यासाठी श्री परमेश्वराप्रीत्यार्थम विवाह संस्कार करतो आहे.
१) गणपती पूजन
२) पुंण्याः ह वाचन ----- वरुण पूजा
३) मातृका पूजन ----- या एकूण २७ देवता आहेत गौरी आदी १६ देवता, ब्राम्ही आदी ७ देवता, गणपती, दुर्गा, क्षेत्रपाल वस्तू अशा २७ देवता आहेत. ह्या सर्व देवतांची पूजा सुपात सुपारी स्वरुपात मांडून करावयाची असते.
४) नांदी श्राद्ध ----- म्हणजे कोणतेही मंगल कार्य करण्यापूर्वी पूर्वजांचे स्मरण होय. कर्त्याची आई, आजी, पणजी, वडील, आजोबा, पणजोबा, व कर्त्याच्या आईचे वडील, आजोबा, पणजोबा, व आईची आई, आजी, पणजी यांचे स्मरण असते. (नामोच्चार नाही) त्याच बरोबर मंडप पूजा करयची असते. त्याच्या ६ देवता आहेत नंदिनी, नलिनी, मैत्र, उमा, पशुवार्धिनी, शास्त्रागार्भा,-भगवती (दर्भ आंब्याच्या पानात गुंडाळून उंबराचे पान व दुर्वा गुंडाळून दोऱ्याने बांधून) त्याची पूजा करायची असते. (हे मांडवाचे खांब कल्पिलेले आहेत) खरा मांडव घातला असेल तर मांडवाच्या आग्नेय कोपऱ्यातील खांबांची- मेथीकादेवीची पूजा करावी. तांदूळ, हळकुंड, सुपारी, रुमालात बांधून त्या खांबाला बांधून ठेवावी. देवक उठवल्यावर त्याचे विसर्जन करावे. अविघ्न कलश म्हणजे गणपतीची पूजा सुगड व त्यावर झाकण त्यात तांदूळ सुपारी खारीक बदाम हळकुंड तिलाच लाडू, कुलदेवतेचा नारळ पुजावा. अश्तागरात म्हणजे अलिबाग तालुक्यात मातृकापुजानात कुलदेवता असतेच म्हणून वेगळ्या नारळाची कुलदेवता म्हणून पूजा करण्याची प्रथा नाही. अन्य ठिकाणी कुलदेवता म्हणून नारळाची पूजा करण्याची प्रथा आहे. त्या वेळी सुग्डला व नारळाला सुत गुंडाळायचे असते.
क्रमशः ------------------------ गौरी हार पूजा
No comments:
Post a Comment