Wednesday, 1 February 2012

भावनांतून मुक्ती ---- ब --- आपल्याच भावनांना रिपू न मानता त्यांच्याकडे जर प्रेमाने पाहिले तर

भावनांतून मुक्ती ---- ब --- आपल्याच भावनांना रिपू न मानता त्यांच्याकडे  जर प्रेमाने पाहिले तर त्यांच्या बंधनातून आपण लवकर मोकळे होऊ कारण मग त्या भावनाही  आपल्याशी  मैत्रीने वागतील आपले ऐकतील आपल्यावर जबरदस्ती करणार नाहीत. कारण ज्याला आपण शत्रू मानतो  त्याचा आपण स्वाभाविक  पणे तिरस्कार  करतो राग धरतो मानापमान  बाळगतो म्हणजेच पर्यायाने क्रोधाचा क्रोध मत्सराचा मत्सर अहंकाराचा  अहंकार  अशी भयंक अवस्था माणसाच्या मनाची होते. मुळात हे भाव तर आपल्यापासून वेगळे नाहीत ते आपल्याला चिकटलेले असतात म्हणजेच जोपर्यंत आपण त्यांना आपल्यापासून वेगळे करत नाही तो पर्यंत पर्यायाने आपण त्यांचा नाही आपलाच स्वतःचाच राग, मत्सर, तिरस्कार करतो. हि माणसाच्या मनाची सर्वात वाईट अत्म्हत्यारी अवस्था आहे.  आज समाजात १२-१५ वर्षांची मुले आत्महत्येला प्रवृत्त होतात ते ह्याच मानसिकतेचे लक्षण आहे मी फक्त शास्त्रीय शब्दात मांडले आहे. इतरत्र दिसणारी अ सहिष्णुता सुद्धा ह्याच प्रवृत्तीचे परिणाम आहेत.
एक छोटी गोष्ट सांगतो नारद मुनींनी एकदा भगवान विष्णूंना विचारले कि तुला सर्वात प्रिय काय आहे? त्यावर भगवान म्हणाले म्हणाला तू सुज्ञ आणि न्यानीही आहेस तूच सांग मला काय प्रिय असेल ते? नारदांनी राधा, रुक्मिणी, तू स्वतः तरी??? असे बरेच पर्याय सांगितले त्यावर भगवान म्हणाले मला माझा भक्त सर्वात प्रिय आहे कारण त्याला सोडविण्यासाठी मी ज्याच्याशी युद्ध करतो. त्याचा मला राग धरावालागतो. म्हणजे मीहि रागाने लिप्त असतो. माझ्या शिष्याच्या मनात मात्र त्याचाही राग नसतो म्हणून मला माझा भक्त सर्वात जास्त आवडतो. हि रूपक कथा आहे. पण मनाचे निर्लेपपण म्हणजे काय हे सुंदर रीतीने सांगितले आहे.  

No comments:

Post a Comment