Monday, 26 March 2012

नवविधा भक्ती ------- (२-कीर्तन,३-नामस्मरण,) ह्या मद्ध्ये थोडेसे

नवविधा भक्ती ------- (२-कीर्तन,३-नामस्मरण,) ह्या मद्ध्ये थोडेसे   
आज माद्ध्येच एक वेगळ्या विचारवर भाष्य करत आहे कारण काही विनंती आली आणि अशा प्रकरची विनंती शंका कुशंका आल्यावर त्यांचे वेळीच निरसन होणे जास्त योग्य आहे असे मला वाटते म्हणून रोजच्या क्रमशः लिखाणात थोडा खंड  घेवून हे लिहित आहे.  
DNYAN VIDNYAN MANCH (ज्ञान विज्ञान मंच) --- मद्ध्ये  गजानन बोढे गुरूजी Vinayak Phadkeji 'अध्यात्म आणि विज्ञान' यावर एखादी POST टाकल्यास अतीव आनंद होईल ... गुरुजी खरोखर फारच सुंदर अपेक्षा केलीत. आपल्याला अनेक धन्ण्यावाद. आपल्या मुले मी हे लिहायला आज प्रवृत्त झालो.    आपल्याकडे आपले तत्वज्ञान, संस्कृती,  अद्ध्यात्म,  हे विज्ञाननिष्ठ आहे अशी नेहमी ओरड केली जाते. ते तसे खरोखरच आहे पण आपलाच समाजाकडून होणारा   सगळ्यात  कहर म्हणजे. आधुनिक  भौतिक  प्रगत  वैज्ञानिक  शोधांशी ते जोडण्याचा आटापिटा केला जातो. हे माझ्या मते वृथा आहे. कारण एकीकडे आम्ही भोगी नाही असे ठाम प्रतिपादन करतो आणि दुसरीकडे आमचीही भौतिक प्रगती किती आणि कशी आहे ते शोधण्याचा आटापिटा करतो. पूर्वी बोलणाऱ्याच्या सब्दात शाप उश्शाप वर देण्याचे सामर्थ्य होते. स्वतःच्या देहावर आणि मनावर संपूर्ण पणे स्वतःचा स्वतःच्या इच्छेप्रमाणे अंमल गाजविणे हे घडत होते. जो माणूस स्वयं सिद्ध असतो तो दुसऱ्याला ताब्यात ठेवू शकतो. ह्या सर्व शक्ती माणसाच्या मनात, विचार, भावना, कल्पना, विवेक बुद्धी, ह्या  रूपाने  वास करत असतात. परमार्थ हे मनाचे विज्ञान आहे. ते देहबुद्धी पासून दूर नेवून मनाला अंतर्मुख करून आत्मबुद्धी अवलंबायला शिकवते. मग त्या आपल्याच मनात उतरून काय शोध  लागतात ते पाहणे म्हणजेच परमार्थ. असे असतातंना भौतिक प्रगतिशी त्याची सांगड घालण्याचा आटापिटा करण्याची काहीच गरज नाही, नाही का? किंबहुना त्या शक्ती  घालवल्या  मुळेच माणूस आज जनावाराहून हीन होत गेला. आत असलेल्या शक्तीचा शोध घ्यायचे सोडून तो बाहेरून शक्ती, आधार, मदत, मिळवायच्या मागे लागला आणि मानसिक  दृष्ट्या  अपंग  झाला. लाचार झाला भिकारी झाला. त्यात आमची संस्कृती भोगी नाही असे ओरडून ओरडून प्रत्यक्षात मात्र भौतिक शोधान्न्च्या मागे लागतो ह्या पेक्षा वेगळी विसंगती नाही. का ह्याला ढोंगी पणा म्हणायचे? ते आपणच आपले ठरवावे. मानवी देह हा पंचा महा भूतानंचा बनला आहे. त्यामुळे त्या पंचा महा भुतानचं सर्व शक्ती व गुणधर्म मानवी देहातही  सदैव वास करून आहेत. त्याचा शोध घेणे अधिक शक्तीशाली आहे. त्याने मानवता अधिक वाढीला लागेल. पर्मार्ठीकता म्हणजे मानवी मनाची उत्क्रांती आहे. त्यात जे साधते ते देवादिकांनाही  साधत नाही. स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या धर्म परिषदेत स्पष्ट सांगितले होते कि. तुमचे प्रचंड वाटणारे भौतिक शोध हे मानवी मानाच्या  अंतर्मनात  लागणाऱ्या  शोधांचे  मंद  प्रतिध्वनी आहेत. ह्याच वाक्याने मी आयुष्यभर प्रभावित  होऊन त्या दृष्टीने विचार करू लागलो आणि कोणत्याही धार्मिक संस्कार मागे मानाच्या  सहज  शक्ती कश्या  वापरल्या जात  असाव्यात ह्याचा तर्कबुद्धीने शोध घेत गेलो त्यातूनच आजवर मी माझे सर्वच लिखाण करत आलो आहे. हे माणसाच्या मनाचे विज्ञान आहे ज्यावर सर्व अध्यात्म  आधरलेले आहे. हा एक दृष्टीकोन आहे जो मी अहं म्हणून सांगत नाही पण आजवर माझ्या तरी कधी वाचनात आलेला नाही म्हणून मी लिहिण्याचे धाडस केले.    

No comments:

Post a Comment