षड्रिपू प्रेम --- इ --- मग रीपुयुक्त ओढ हि प्रेम नाही का? ------ ओढ आहे म्हणजे प्रेम नक्की आहेच आहे. किंबहुना यच्चयावत सर्व सामान्न्य मानव त्यासहितच प्रेम करत असतो. कारण त्याच्या शिवाय प्रेम करण्याची त्याला सवयच नाहीये. किंबहुना ह्यालाच सर्वसामान्य माणूस प्रेम म्हणतो. आणि ते अयशस्वी झाले कि विरहाने दुक्खी होतो. देह आणि त्याचे सुख दुखः त्यामुळे होणाऱ्या इच्छा हवेनाकोपण रुपात जी ओढ निर्माण करतात, त्यालाच आपण प्रेम म्हणतो ते प्रेम तर आहेच पण अपेक्षे सहित आहे म्हणून यशस्वी होईलच असे नाही. कारण त्याचे यश हे ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्या इच्छेवर अवलंबून असते. म्हणूनच होणार नाही असेही नाही. त्यातील अपेक्षा जसजशा कमी होत जातील तसतशी प्रेमाची जाणीव माणसाला जास्त स्पष्ट स्वच्छ होईल.
१) कामामुळे ओढ निर्माण होते. त्याच प्रमाणे ५)लोभ, ६)मोह हे ओढ निर्माण करतात हे सर्वच जण जाणतात. पण ----------------
पण २)क्रोध, ३)मद, ४)मत्सर ह्यातूनही ओढ निर्माण होते. हे कित्येकदा माणसाला जाणवतच नाही. वास्तविक कित्येकदा आपण ज्या व्यक्ती बद्दल आपल्याला राग येतो मत्सर वाटतो मी पणा वाटतो त्याला आपल्या प्रिय व्यक्तीपेक्षाहि जास्त आठवत राहतो हे आठवत राहणे म्हणजेच प्रेम. ज्याच्या बद्दल आपल्याला काहीच वाटत नाही त्याच्या बद्दल आपल्याला राग मत्सर मी पणा हि वाटत नाही, म्हणजे पर्यायाने प्रेम नाही कारण ओढ नाही. ह्या प्रेमाला परमार्थात विरोध भक्ती - प्रेम म्हणतात. म्हणजे पर्मार्थालाही हि भक्ती म्हणूनच मान्य आहे. हे निर्विवाद आहे. मग ह्या रीपुंकडे जर आपण मत्सराने पाहिले तर ते आपल्याला अधिकच चिकटतील. त्यांच्याकडे प्रेमाने पाहता आले तर???? त्यांना शरण जाऊन नव्हे पण प्रेमाने.
१) कामामुळे ओढ निर्माण होते. त्याच प्रमाणे ५)लोभ, ६)मोह हे ओढ निर्माण करतात हे सर्वच जण जाणतात. पण ----------------
पण २)क्रोध, ३)मद, ४)मत्सर ह्यातूनही ओढ निर्माण होते. हे कित्येकदा माणसाला जाणवतच नाही. वास्तविक कित्येकदा आपण ज्या व्यक्ती बद्दल आपल्याला राग येतो मत्सर वाटतो मी पणा वाटतो त्याला आपल्या प्रिय व्यक्तीपेक्षाहि जास्त आठवत राहतो हे आठवत राहणे म्हणजेच प्रेम. ज्याच्या बद्दल आपल्याला काहीच वाटत नाही त्याच्या बद्दल आपल्याला राग मत्सर मी पणा हि वाटत नाही, म्हणजे पर्यायाने प्रेम नाही कारण ओढ नाही. ह्या प्रेमाला परमार्थात विरोध भक्ती - प्रेम म्हणतात. म्हणजे पर्मार्थालाही हि भक्ती म्हणूनच मान्य आहे. हे निर्विवाद आहे. मग ह्या रीपुंकडे जर आपण मत्सराने पाहिले तर ते आपल्याला अधिकच चिकटतील. त्यांच्याकडे प्रेमाने पाहता आले तर???? त्यांना शरण जाऊन नव्हे पण प्रेमाने.
No comments:
Post a Comment