Monday, 17 October 2011

हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग ८ वा
विधी १५ वा ------- ऐरणी पूजन / झाल ठेवणे, --- म्हणजे वराकडील सर्व ज्येष्ठ व्यक्तींवर जबाबदारी देणे.   
केव्हा करावा ------ विवाह होमानंतर.
आवश्यक व्यक्ती -- गुरुजी,  वधु-वरचे आईवडील, व दोघांच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती.
माहिती ------------ वधूच्या आईवडिलांनी कन्यादानाची सांगता वाराकुलाची  वृद्धी व्हावी म्हणून उमम्हेश्वर व १६ दिव्यांची पूजा व ऐरणी दान करयचे असते. प्रार्थना झाल्यावर वधूच्या आईने क्रमाने वरच्या त्याच्या आईवडिलांच्या व वराकडील अन्य ज्येष्ठ व्यक्तींच्या मस्तकावर ब्लाउज पीस धरून त्यावर वडिलांनी दिव्याची परडी धरून झाल्यावर झाल (परडी) खाली ठेवायची वधूच्या आईने वरच्या आईला सौभाग्य वायन द्यावे. (ऐरणी पूजनाचा संकेत - वधूने १६ वर्ष नंतर माहेरी दीपपूजन करायचे असते. त्यालाच माहेर पूजन असे म्हणतात. तेव्हा वधूवरांनी वधूच्या माहेरी हि पूजा करून वधूच्या माहेरच्यांचा सन्मान करायचा) दुपारचे भोजन -- या वेळी वधु पित्याने वराकडील सर्वांना भोजनाचे निमंत्रण द्यावे. ऐरणी पूजनानंतर वराकडील वराचे आई वडील काका मामा मावश्या भाऊ आत्या आदि मानकर्यांचा आजी आजोबा यांचा योग्यतो मान करावा. दुपारचे भोजन करावे. वधु व वर व वराकडील मानाच्या व्यक्तींची खास पंगत, हि पंगत झाल्यावर वरच्या आई व मानाच्या अन्य व्यक्तींना सुपारी साखर व चांदीच्या लवंग देतात. विहिणीला साडी. व्याह्यांना चान्देचे भांडे वरच्या भाऊ, भावजय व अन्य मानाच्या व्यक्तींना योग्यतो मानसन्मान देतात. विशेष सूचना ---- उभय पक्षामध्ये जे ठरले सेल त्या प्रमाणे मानपान ऐरणी पूजनाचे वेळीच किंवा भोजनानंतर देतात.

विधी १६ वा -------- वधूची पाठवणी  
केव्हा करावा ------- लग्न मंडपातील हा शेवटचा विधी 
आवश्यक व्यक्ती --- वधु / वर, वरची बहिण करवली, वधूचे आई / वडील प्रत्येक वधूच्या आईवडिलांच्या आयुष्यातला गहीवार्णारा क्षण.
माहिती ------------- वधु-वरांना गौरीहाराजाव्ल बसवून वधूच्या आईने वधूची मालत्यांनी ओटी भरावी. दोघांच्या हातावर दही घालून खावयास सांगावे.  वराचे उपरणे व वधूचा शेला यांच्या टोकांची वरच्या करवलीने गाठ मारावी व वराकडून वधूकडील ज्येष्ट व्यक्तींचा यथाशक्ती मानपान करावा. वराने गौरीहराच्या मखरात असलेली देवी व लाडूगडू घ्यावा व वधूसह स्वग्रही निघण्यापूर्वी सर्वांना दोघांनी नमस्कार करावा. व सर्वांचा निरोप घ्यावा. गौरीची मूर्ती उचलल्यावर त्या ठिकाणी वरमातेने साडी ठेवावी. देवीजवळ पूर्वी ठेवलेले सौभाग्य वायन व यावेळी ठेवलेली साडी से सर्व वधूच्या मामीला द्यावे.

विघी १७ वा -------- वराचे वधूसह स्वग्रही आगमन, गृहप्रवेश लक्ष्मी पूजन नाम क्षमी  पूजन, नाव ठेवणे 
केव्हा करावा ------- वधूसह वराचा ग्रह प्रवेश 
आवश्यक व्यक्ती --- वधु/वर वराकडील घरची नातेवाईक. मुलीची पाठ राखीन/ आईवडील  
माहिती ------------- ग्रह  प्रवेश  करतांना वधूने उंबरठ्यावर तांदळाने भरून ठेवलेले माप सांडवून मग घरात प्रवेश करावा. बरोबर आणलेल्या देवीची तांदूळ पसरून ठेवलेल्या ताटात ठेऊन पूजा करावी  त्याचवेळी ताटात नववधूचे सासरचे नाव ताटातील तांदुळावर लिहावे, व देवी व नाम लक्ष्मी या दोघींची पूजा करावी. देवीला नवा दागिना घालावा. पूजा झाल्यावर वधूचे नाव सांगून साखर/पेढा घ्यावा. वधूची सासूने ओटी भरावी. वधूवरांनी देवांना व उपस्थित ज्येष्ट व्यक्तींना नमस्कार करावा. वराचे आईने सुनेला शालू द्यायचा असतो. तसेच अन्य दागीनही द्यायचा असतो. सुनमुख पाहणे --- या वेळी मुलाच्या आईने मुलगा व सून यांना आपल्या मांडीवर बसवून त्या दोघांचे आरश्यात तोंड पहावयाचे व दोघांना पेढा/ साखर भरवून तोंड गोड करायचे वरच्या आई वडिलांचा व काका मामा मावशी आत्या भाऊ भावजय व अन्य ज्येष्ठ व्यक्तींचा (आजी आजोबा ) योग्यतो मानपान करायचा सातो. या वेळी आईला दिलेल्या साडीला पोट झाकण्याची साडी म्हणतात. हा मानपानाचा कार्यक्रम आटोपल्यावर / सुरु असतांना वधूवरांनी घरच्या ज्येष्ट व्यक्तींना नमस्कार करावा. पेढे वाटावेत सुवासिनींना हळद कुंकू लाऊन वधूचे सासरचे नाव सांगावे.

विघी १८ वा --------- सर्व कार्यक्रम आटोपल्यावर --- देव देवल उठवणे, सूप पाखडणे  
केव्हा करावा ------- घरी आल्यावर शेवटी समाप्ती -- पान आजकाल वधूच्या घरी करवयाचे हे सर्व कार्यक्रम हॉल वरच करतात. 
आवश्यक व्यक्ती --- गुरुजी वधु/वर वराकडील घरची नातेवाइक आपापल्या घरी / अलीकडे एकत्र हॉलवर   
माहिती ------------- आता वधु -वरांकडे ठेवलेले देवक उठवणे आईवडिलांनी देवक उठवणे. वराकडे वधूवरांनी त्यांच्या आईवदिलान्सामावेत देवाकाच्या पुजेस बसावे. देवक उठल्या नंतर कार्य समाप्ती निमित्त गुरुजींनी सूप वाजवून कार्य समाप्तीची घोषणा करावी. गुरुजींनी वधु वरांच्या पित्यांना कार्याप्रीत्यार्थ नारळ व आशीर्वादाचे तांदूळ द्यावेत. वधु-वरांच्या पित्यांनी गुरुजींची दक्षिणा  देऊन त्यांची पाठवणी करावी. कार्य निमित्त आलेले पाहुणे स्वग्रही जाऊ शकतात. रात्री वधु-वरांची मीठ - मोहोर्या घेऊन द्रिष्ट काढावी

अशा रीतीने हे कार्य समाप्त समाप्त झाले ---- सर्व -----होतकरू---- तरुण तरुणींना हे वर्ष आपापल्या लग्नाच्या कार्याने संपन्न होवो. आपल्या सर्वांचे सहजीवन संसार सुखाचा आनंदाचा आणि समुद्धीचा होवो हिच  शुभेच्छा

हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग ७ वा
विधी १२  वा ------- कन्या दान 
केव्हा करावा ------- लग्नानंतर
आवश्यक व्यक्ती --- वधु-वर व वधूचे आईवडील .
माहिती ------------- आपल्या समस्त पूर्वजांना निरंतर सुख मिळावे म्हणून संकल्पपूर्वक, कन्येचे दान करावयाचे असते. (एखाद्या वस्तूवर असलेला अधिकार सोडून देऊन दुसऱ्याचा अधिकार प्रस्थापित करणे म्हणजे दान होय.) कन्या दानाच्या निमित्ताने वधूपिता वधूवरांना संसारोपयोगी वस्तू देतो. समई तांब्या, फुलपात्र वगैरे (संध्येची पळी देऊ नये )
विशेष माहिती ---- कोणतेही दान करतांना देणाऱ्याचे हात वर पालथे व घेणार्याचे हात खालती उताणे असतात. इथे महत्वाचा फरक आहे वधूच्या वडिलांचे हात सर्वात खालती मद्ध्ये वधूचे हात आणि वरती वराचे हात आणि तीनही हात उताणे असतात. आणि पाणी सोडायला वधूची आई असते. ह्या मागचा हेतू असा आहे कि मुलगी हि वस्तू नव्हे. आईवडिलांनी तिचे जन्मापासून प्रेमाने पालन पोषण केलेले असते अश्या मुलीला उचलून देणे मनानी शक्यच नसते म्हणून तिचे वडील तिला आपल्या ओंजळीत घेऊन (तिचा हात ओंजळीत घेऊन) वाराला विनंती करतो कि तू हिला वर्चाय्वर माझ्या ओंजळीतून तुझ्या ओंजळीत अलगद उचलून घे. 

विधी १३ वा -------- कंकण बंधन 
केव्हा करावा ------- कन्यादानानंतर
आवश्यक व्यक्ती ---गुरुजी, वधू- वर 
माहिती ------------- सुत गुंडी, गाठीची हळकुंडे, वधूवरांनी कायम स्वरुपात एकमेकांच्या बंधनात पवित्र मानाने राहावे हा हेतू. विवाह होमाची तयारी झाल्यावर वराकडून वधूला शालू दागिने जोडवी विरोल्या मंगळसूत्र वगैरे द्यायचे असते ते आणून ठेवावे. ते पुढे विवाह होमाच्या आरंभी वधूला वरच्या आईने द्यायचे असते.
विघी १४ वा --------- विवाह होम  --------- ह्या होमांतर्गत एकूण ३ प्रमुख कार्य असतात. १ - लाजा होम-(अग्नीला लाह्या अर्पण करणे) २- सप्त पदी - पत्नी समवेत सात पाऊले चालणे व ३ - पाणिग्रहण - वधूचा हात वराने कायम स्वरूपासाठी स्वीकारणे.
केव्हा करावा ------- आताचे सर्व विधी कर्मानेच दिलेले आहेत
आवश्यक व्यक्ती --- गुरुजी, वधु/वर वधूचा भाऊ, सुवासिनी.
माहिती ------------- वधूच्या हातात वधूचा भाऊ लाह्या घालतो. नंतर वर आपल्या दोन्ही हाताने वधूची ओंजळ धरून त्या लाह्या अग्नीला अर्पण करतो. समृद्धीसाठी लाजा होम सांगितला आहे. वधूवरांनी लाह्यांच्या तीन आहुती द्याव्या. नंतर वधूचा कान पकडून, माझ्या बहिणीचा नीट सांभाळ करा असे सांगतो. वराने वधूच्या भावाला मान द्यावा शर्ट  पीस / पाकीट द्यावे. ७ पाऊले चालण्या मागचा हेतू १)आपल्या दोघांना भरपूर अन्न मिळावे, २)शरीर सामर्थ्य लाभावे, ३)धनवृद्धी व्हावी, सौख्य वृद्धी व्हावी, ५ प्रजा वृद्धी व्हावी, ६)वासंतादी ऋतू आनंददायक व्हावेत, ७)आत्यंतिक सख्या लाभावे. या वेळी वधूची बहिण वधूच्या पायाचा अंगठा आपल्या उजव्या हाताने धरून मर्यादा नीट राख असे सुचविते. बहिणीचा मान द्यावा तिला ब्लाउज पीस / पाकीट द्यावे.    
साप्त्पादिंची करणे वर दिली आहेत. त्यावर आपल्याकडे अनेकांनी अनेक प्रकार काव्य सुद्धा केली आहेत. पान मी पूज विधीच्या वेळी ज्या वैण्यानिक व मानसिक दृष्टीकोनातून त्या विषयाची मांडणी केली, त्या दृष्टीकोनातून सप्तपदी ह्या विधीमागाचे कार्य  कारण असे आहे कि आपण एखाद्या व्यक्ती बरोबर अनेकदा भेटलो बोललो तरी बरोबर चालत सहवास घडतो तेव्हाच मैत्री हि भावना प्रगल्भतेने जाणवते म्हणून सोबतीने फिरणे ह्याचे हे प्रतिक आहे. आपण अनुभव घेऊन पाहावे.  
पाणी ग्रहण चिरकाल सहजीवनासाठी पाणिग्रहण सांगितले आहे.
वरच्या आईने वधूला हळद कुंकू लाऊन शालू दागिने, जोडवी विरोल्या वधूला देणे. मंगल सूत्राच्या वाटीत दाबून भरावे व नंतर गुरुजी सांगतील तेव्हा वराने वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालावे, वराने सोवळे नेसून पत्नी सह विवाह होम करावा

क्रमशः ------------- पुढील भागात - ऐरणी पूजन / झाल ठेवणे वधूची पाठवणी वराचे वधूसह स्वगृही आगमन, गृहप्रवेश लक्ष्मिपुजन नाम लक्ष्मी पूजन - नाव ठेवणे, देवक उठवणे. सूप पाखडणे


हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग ६ वा
विधी ९ वा -------------- रुखवत ----------- हा सामाजिक / लौकिक विधी आहे.  विधी १० वा -- मधुपर्क
केव्हा करावा ------- लग्नापूर्वी
आवश्यक व्यक्ती --- करवली वर व वरची भावंडे तसेच मनाच्या अन्य व्यक्ती.
माहिती -------------  करवलीने किंवा अन्य महिलेने वरच्या डोळ्यात काजल घालावे. वरच्या गालाला गालबोट लावावे. नंतर वराची आई, करवली व अन्य व्यक्तींनी रुखवताच्या भोजनास बसावे, वधूच्या आईने वारला तुपाची आपोष्णी (आपोशन) द्यावी. केळे व दुध दये. नंतर वराने भोजनास आरंभ करावा. भोजन होईपर्यंत, वारला देऊन शल्लक राहिलेले दुध व केळे गौरीहर जवळ बसलेल्या वधूला नेऊन द्यावे. वधूने केळे खावे, दुध प्यावे, वराचे भोजन झाल्यावर हस्त मुख प्रक्षालन झाल्यावर वधूच्या आईने चांदीचा रुपया घालून केलेला ५ पानांचा गोविंद विडा वराला द्यावा. वधूच्या वडिलांनी वाराला मुख्य प्रवेशद्वाराजवळ न्यावे. गड्याकडून दहीभात ओवाळून टाकावा (दृष्ट काढावी) वधूच्या आईने वरच्या पायावर दुध, पाणी घालावे, लामण दिव्याने ओवाळावे, वधूच्या पित्याने आपल्या उजव्या हाताने वरचा उजवा हात धरून वाराला लग्नाच्या बोहोल्यावर न्यावे, व खुर्चीत बसवावे.

विधी १० मधुपर्क ----- लग्न मंडपात आलेल्या वराचे स्वागत (पूजन)
केव्हा करावा ------- बोहोल्यावर 
आवश्यक व्यक्ती ---गुरुजी, वधूचे आई वडील
माहिती ------------- वराचे स्वागत करून त्याला वस्त्र (सोवळे) जानवे, हार, दही, मध, तूप, एकत्र देणे. विडा दक्षिणा, फुलांची मुंडावळ, हे देऊन उपस्थितांना मंगलाक्षता देणे.
विघी ११ वा --------- मंगलाष्टके ---------- मुख्य लग्न (वधूच्या मातापित्याने मंगलाष्टके ऐकायची नसतात)
केव्हा करावा ------- ठरवलेल्या मुहूर्ताच्या वेळी
आवश्यक व्यक्ती ---(वधूच्या मातापित्याने मंगलाष्टके ऐकायची नसतात) गुरुजी, वधु/वर त्या दोघांच्या कडे करा व दिवा धरायला एक  एक करवली व एक एक सुवासिनी. अन्तः पट धरण्यासाठी वधूचे मामा किंवा अन्य नातेवाईक व इतर सर्व नातेवाईक आप्त मित्र परिवार
माहिती -------------मंगलाष्टके पूर्ण झाल्यावर अन्तः पात दूर करावा. प्रथम वधूने व नंतर वराने आपापल्या हातातील हार एकमेकांना अर्पण करावेत. करवलीने वधु/वरच्या डोळ्यांना कार्यातील पाणी लावावे. सुवासिनीने हातातील लामण दिव्याने दोघांना ओवाळावे. वधूवरांना व गुरुजीनंना पेढा अत्तर गुलाबपाणी फुल वगैरे द्यावे नंतर विवाहास उपस्थित स्त्रीपुरुषांना पेढा पुष्प वगैरे द्यावे. वर्मातेचा मान -- लग्न झाल्यावर लगेच वधूच्या आईने विहिणीची (वरमातेची) साडी व नारळाने व साखरेने ओटी भरावी      
क्रमशः ------------- पुढील भागात -  कान्ण्यादान, कंकण बंधन, विवाह होम.


दू मराठी लग्न पद्धती ----- भाग ५ 
विधी ८ वा-------------- गौरीहर पूजा  ------- हि अन्नपूर्णा देवीची पूजा असते. ती केवळ वधूने करायची असते.
प्रकार १ ----- गौरीहर सजवणे साखरेची किंवा लाकडाची एकावर एक चिकटवलेली ५ बोळकी असतात. हि गौरीहराची बोळकी पाटावर मांडावीत (चार कोपऱ्यात एक एक) मुलीबरोबर देण्यासाठी (चांदीची) अन्नपूर्णेची मूर्ती आणावी. ती पाटावर माद्ध्याभागी ठेवावी. बाजूला वधूच्या आईने लाडू गडू ठेवावे. अशा प्रकारे आपल्या हौशीनुसार गौरीहर सजवावा.
प्रकार २ ----- वर व वधुकडून एकावर एक अशी ४ बोळकी चार कोपर्यावर शेजारी शेजारी ठेवावी. त्यावर मुलाकडून मंडपी (लहान मंडप) ठेवावा.
केव्हा करावा -------- लग्नापूर्वी - त्याच दिवशी
आवश्यक व्यक्ती ----- वधु व वधूची आई, वरची आई व अन्य ५ सुवासिनी यांनी हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, दागिना असोला  नारळ या वस्तू वरच्या आईने वधूची ओटी भरावी. या वेळी वधु मामाकडील पिवळी साडी नेसून गौरीच्या पूजेला बसलेली असते. ती साडी नेसूनच लग्न लागायचे असते.
तेल्फालाच्या वेळी गौरीहरा जवळील दिव्यामाद्ध्ये तेल घालण्यासाठी तेल भरून तपेली व डाव (मोठ्ठा चमचा) गौरीहरा जवळ वरमातेने ठेवावा.
मूर्तीची पूजा करतांना "गौरी गौरी सौभाग्य दे, दारी आलेल्या वारला दिर्घुष्य दे." असे म्हणून हळद कुंकू वाहून नमस्कार करावा. व एकाग्र चित्ताने कोणाशीही न बोलता वर लिहिलेली प्रार्थना (मंत्र) म्हणत एकत्र केलेले पांढरे तीळ व तांदूळ दोन्ही हातांनी चिमटीने वाहण्यास आरंभ करावा. हे कार्य मामा तेथे येऊन बोहोल्यावर जायला सूचना देईपर्यंत करीत राहावे.
क्रमशः ---------- विधी ९) रुखवत व १०) मधुपर्क





हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग ४ ----- देवक ठेवणे
विधी ७ वा  -------------- देवक ठेवणे ---- ह्याला देवदेवक ठेवणे असेही म्हणतात. हा धार्मिक विधी आहे. ह्यात गणपती पूजन, पुंण्याहवाचन मातृका पूजन व नांदीश्राद्ध एव्हढे विधी अंतर्भूत आहेत.
केव्हा करावा -------- लग्नापूर्वी किंवा सोयीनुसार १, ४, ५, दिवस आगोदर ठेवता येते. काही संकट समयी अपरिहार्य कारण असल्यास विवाहाच्या आधी १० दिवस सुद्धा थेत येते. पण ते ठेवल्यावर वधु अथवा वराने घराच्या बाहेर जाऊ नये अशी अपेक्षा असते म्हणून आजकाल ते आदल्या दिवशी किंवा लाग्नाच्याच दिवशी लग्नापूर्वी ठेवतात. सर्व कार्य पुरे झाल्यावर हे उठवतात म्हणजे त्या देवतांच्या साक्षीने सर्व कार्य केले जावे असा संकेत आहे.
आवश्यक व्यक्ती ----- गुरुजी, वधु/वर, त्यांचे आई/वडील, कुंकू लावण्यासाठी सुवासिनी, करवली, दोन्ही पक्षी स्वतंत्र पणे करयचे असते.
माहिती --------------  आज सोयीसाठी हा विधी हॉलवरच केला जातो. खर तर हा विधी वधूवरांच्या आई वडिलांनी आपापल्या घरी करायचा असतो. आणि लग्नाचा सर्व विघी पूर्ण झाल्यावर देवक उठवायचे असते.  ह्या विधीच्या वेळी मुलाच्या व मुलीच्या घरी वेगवेगळा संकल्प असतो.
वरपित्याचा संकल्प असा --------- माझा मुलगा ह्याच  देव व ऋषी व पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी त्याच प्रमाणे धार्मिक संस्काराची बैठक घेऊन प्रजोत्पादन करण्यासाठी श्री पर्मेश्वर्प्रीत्यार्थम मी विवाह संस्कार करतो आहे.
वधु पित्याचा संकल्प असा ------- माझी मुलगी हिने भ्र्त्रासह आपल्या पतीसह कोणत्या गोष्टी स्वीकारायच्या आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या तसेच धर्माचरण करण्याकरिता अधिकार मिळण्यासाठी श्री परमेश्वराप्रीत्यार्थम विवाह संस्कार करतो आहे.
१) गणपती पूजन
२) पुंण्याः ह वाचन ----- वरुण पूजा
३) मातृका पूजन ----- या एकूण २७ देवता आहेत गौरी आदी १६ देवता, ब्राम्ही आदी ७ देवता, गणपती, दुर्गा, क्षेत्रपाल वस्तू अशा २७ देवता आहेत. ह्या सर्व देवतांची पूजा सुपात सुपारी स्वरुपात मांडून करावयाची असते.
४) नांदी श्राद्ध ----- म्हणजे कोणतेही मंगल कार्य करण्यापूर्वी पूर्वजांचे स्मरण होय. कर्त्याची आई, आजी, पणजी, वडील, आजोबा, पणजोबा, व कर्त्याच्या आईचे वडील, आजोबा, पणजोबा, व आईची आई, आजी, पणजी यांचे स्मरण असते. (नामोच्चार नाही) त्याच बरोबर मंडप पूजा करयची असते. त्याच्या ६ देवता आहेत नंदिनी, नलिनी, मैत्र, उमा, पशुवार्धिनी, शास्त्रागार्भा,-भगवती (दर्भ आंब्याच्या पानात गुंडाळून उंबराचे पान व दुर्वा गुंडाळून दोऱ्याने बांधून) त्याची पूजा करायची असते. (हे मांडवाचे खांब कल्पिलेले आहेत) खरा मांडव घातला असेल तर मांडवाच्या आग्नेय कोपऱ्यातील खांबांची- मेथीकादेवीची  पूजा करावी. तांदूळ, हळकुंड, सुपारी, रुमालात बांधून त्या खांबाला बांधून ठेवावी. देवक उठवल्यावर त्याचे विसर्जन करावे. अविघ्न कलश म्हणजे गणपतीची पूजा सुगड व त्यावर झाकण त्यात तांदूळ सुपारी खारीक बदाम हळकुंड तिलाच लाडू, कुलदेवतेचा नारळ पुजावा. अश्तागरात म्हणजे अलिबाग तालुक्यात मातृकापुजानात कुलदेवता असतेच म्हणून वेगळ्या नारळाची कुलदेवता म्हणून पूजा करण्याची प्रथा नाही. अन्य ठिकाणी कुलदेवता म्हणून नारळाची पूजा करण्याची प्रथा आहे. त्या वेळी सुग्डला व नारळाला सुत गुंडाळायचे असते.
क्रमशः ------------------------ गौरी हार पूजा




   
हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग ३ ----- वांग निश्चय, मुहूर्त पत्रिका पूजन,
विधी ४ था -------------- वांग निश्चय - आजच्या काळी साखरपुडा - रिंग सेरिमनी  ------- हा धार्मिक व सामाजिक दोनही प्रकारचा विधी आहे.
केव्हा करावा -------- वांग निश्चय म्हणजे विवाहाचा निश्चय. आजच्या कळत साखरपुडा. हा विधी विवाह ठरल्यावर विवाहाच्या आगोदर करावा. त्यावेळीही वाईट दिवस नाहीना एव्हढे पाहावे. काही जण हा विधी विवाहाच्या दिवशीच विवाहापूर्वी करतात.
आवश्यक व्यक्ती ----- गुरुजी, वधु/वर, त्यांचे आई/वडील, कुंकू लावण्यासाठी सुवासिनी, करवली, दोन्ही बाजूंचे काका मामा इत्यादी ज्येष्ठ व्यक्ती.
माहिती --------------  गणपती, वरून व शची म्हणजे इंद्राणी म्हणजे इंद्राची पत्नी हिची पूजा करून त्यांच्या साक्षीने वधु वडिलांनी वरच्या वडिलांना सांगायचे कि मी माझी मुलगी तुमच्या मुलाला देत आहे हे परस्परांना मान्य असून दोनही पक्षी आता तुम्ही मुलगी व आम्ही मुलगा पाहण्याची गरज नाही असे सांगायचे. वधु व वराकडील ज्येष्ठ पुरुष व्यक्तींचा व नातेवैकानंचा एकमेकांशी परिचय करणे, ह्यालाच व्याहीभेत असेही म्हणतात. याच वेळी वधूला दागिना देतात, साडी व ब्लाउजपीस, व मुंडावळ्या देतात.
विधी ५ वा - मुहूर्त पत्रिका पूजन  - हा धार्मिक / सामाजिक विधी आहे. गुरुजींची गरज असते.
केव्हा करावा -------- विवाहा पूर्वी सोयीनुसार साधारण कोणत्याही शुभ दिनी करावा. आपण ज्या पत्रिका वाटतो त्या वाटणे सुरु करण्या पूर्वी करावा.
आवश्यक व्यक्ती -----वधु व वर त्यांच्या आपापल्या घरी. त्यांचे आई वडील.
माहिती -------------- मुहूर्ताच्या वेळेची पत्रिका म्हणजे कुंडली मांडून तिचे पूजन करतात तशी केलेली नसल्यास वर व वधूची जन्मपत्रिका एकत्र पूजतात.
विघी ६ वा - सीमांत पूजन - सीमंती- श्रीमंत पूजन  - हेच जावी पूजन होय.
केव्हा करावा -------- लग्नाआधी त्याच दिवशी किंवा आदल्या दिवशी करावे.
आवश्यक व्यक्ती ----- गुरुजी, वधूच्या  आई/वडीलांसामावेत वधु व वरची मोठ्ठी बहिण लग्न झालेली असल्यास आपल्या पती समवेत (ज्येष्टजामातापूजन) व जवळची घरची नातेवाईक म्हणजे वधूची भावंडे वगैरे भोजनाला बोलावावीत.
माहिती -------------- गुरुजींच्या साक्षीने वधूच्या आईवडिलांनी जावी ज्येष्ठ जावई वराचे आई वडील भाऊ यांचा मान सन्मान करणे. त्याच वेळी वराचे पूजन करून पाय धुऊन पायावर स्वस्तिक काढून पोशाख, मुंडावळ, हार, वरदक्षिणा, सजवलेला नारळ देतात, अत्तर लाऊन गुलाबपाणी शिम्पाद्ल्यावर प्रथम मुलाच्या आईने व अन्य चार सुवासिंनिनी लामण दिव्याने (निरांजनाने) मुलाला औक्षण करावे. औक्षनानंतर प्रत्येकीने मुलाला पेढा भरवावा(बालविवाहाच्या काळी )/ द्यावा. वरच्या आईची, करवलीची (सुवासिनी असल्यास) ओटी भरावी. आईला गुळाची ढेप द्यावी. चांदीच्या वाटीत  हलवा द्यावा. उपस्थितांना अत्तर गुलाबपाणी पेढा द्यावा. तसेच मनाच्या (स्त्री / पुरुष ) सन्मान करावा.     
क्रमशः ------------- पुढील भागात - देवक ठेवणे


हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग २
विधी १ ला  --------------ग्रहमख / ग्रहयज्ञ
केव्हा करावा --------विवाह ठरल्यावर वधु व वर दोघांच्या घरी विवाहाच्या ५, ४, किंवा १ दिवस आगोदर करावा. त्यावेळीही वाईट दिवस नाहीना एव्हढे पाहावे. आपल्या कार्याला सर्व ग्रहांची अनुकुलता लाभावी म्हणून हि ग्रहांची शांत असते.
आवश्यक व्यक्ती ----- गुरुजी, वधु/वर, त्यांचे आई/वडील, कुंकू लावण्यासाठी सुवासिनी, करवली,
माहिती -------------- ग्रहमख - ह्यात सूर्यादी नवग्रह देवता, प्रत्येक ग्रहाच्या उजव्या बाजूला एक व डाव्या बाजूला एक ह्या प्रमाणे ९ * ३ = २७ देवता, ७ क्रतु साद गुंण्य्कार देवता. आणि अष्ट द्विक्पाल मिळून एकूण ४२ सुपाऱ्या देवता म्हणून पूजतात. सर्व्सामान्ण्यातः देवांची पूजा करतांना त्यांना नैवेद्य अर्पण करावयाचा असतो. मूर्ती पूजेत हा नैवेद्द्य म्हणजे आपण जे अन्न ग्रहण करतो त्याच प्रकारचा नैवेद्य किंवा देव देव्तान्न्च्या आवडीचा पदार्थ त्याला अर्पण करणे असे त्याचे स्वरूप असते. ग्रह हे अंतराळात आपल्या भोवताली फिरतांना दिसतात त्याच्या साठी जो नैवेद्द्य अर्पण करायचा तो हवन केल्याने त्यांना पोहोचतो अशी आपल्या शास्त्राची श्रद्धा आहे. सर्व देव्तान्न्च्या बाबतीत (अग्निमुखावैदेवाः) अग्नी हे देवांचे मुख आहे अशी कल्पना आहे. म्हणून कोणतेही हवन / यज्ञ हे ग्रह नैवेद्द्य होय 
विधी २ रा - केळवण - हा सामाजिक विधी आहे. गुरुजींची गरज नसते.
केव्हा करावा -------- विवाहा पूर्वी सोयीनुसार साधारण कोणत्याही शुभ दिनी करावा
आवश्यक व्यक्ती -----वधु व वर त्यांच्या आपापल्या घरी. त्यांचे आई वडील इष्ट मित्र व नातेवाईकांसमवेत यथाशक्ती एक अगर पंचा पक्वान्ने करून भोजन करावे.
माहिती -------------- खर तर वधूकडील मंडळींना केळवण भावनिक दृष्ट्या विशेष महत्वाचे वाटते. कारण त्या नंतर त्यांची मुलगी कायमची दुसरीकडे राहायला जाणार असते. वधु- वर लग्नाच्या दिवशी कार्यात एव्हढे व्यस्त असतात कि त्यांना निवांतपणे भोजन  करणे कठीण असते. म्हणून निवांतपणे सर्वांसमवेत भोजन कर्वे एव्हढाच लौकिक संकेत केल्वानामागे आहे. 
विघी ३ रा - व्याही भोजन - वराच्या आईवडिलांनी वधूच्या आईवडिलांना जेवायला बोलवायचे असते.
केव्हा करावा -------- लग्नापूर्वी सोयीनुसार कोणत्याही शुभ दिनी करावे.
आवश्यक व्यक्ती ----- वधूचे आई/वडील व जवळची घरची नातेवाईक म्हणजे वधूची भावंडे वगैरे भोजनाला बोलावावीत.
माहिती -------------- पूर्वी एकदा मुलेचे लग्न झाले कि तिला मुल होईपर्यंत मुलीचे आई/वडील तिच्याकडे अन्न ग्रहण करीत नसत. म्हणून लग्नापूर्वी त्यांना वरच्या आई/वडिलांनी जावायला बोलावण्याची प्रथा आहे ह्या वेळी वधूला मात्र बोलावत नसत हल्ली बोलावतात.
क्रमशः ------------- पुढील भागात वांग- निश्चय, मुहूर्त - पत्रिका पूजन, सीमांत पूजन - सिमान्न्ती

हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग १ प्रस्तावना व माहिती
हिंदू समाजात पूर्वी एकत्र कुटुंब बद्धती होती त्यामुळे घरात दर ३ -  ४ महिन्ण्यानी काहीनाकाहीतरी कार्य घडत असे. त्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी पहिल्या पिढी कडून पुढच्या पिढी कडे सहज न्यात होत जायच्या. आता विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे घरात कार्य काढले कि कोणकोणत्या गोष्टी लागतात हे माहित नसते. मला खुद्ध माझ्या मुलीच्या लग्नात हा अनुभव आला आणि तारांबळ झाली. त्यातून हे लिखाण करावे असे सुचले. कि जेणेकरून कार्य करतांना आपल्याला सर्व माहिती असावी. विविध विधींच्या साठी वेगवेगळी माणसे लागतात आणि ती ती माणसे त्या त्या वेळी हजर नसतील तर तारांबळ उडते म्हणून माहिती देतांना विधी - तो कधी करावा - त्या साठी लागणाऱ्या आवश्यक व्यक्ती - आणि काही आवश्यक माहिती. 
अशा पद्धतीने हे लिखाण केले आहे. हे लिखाण करतांना आमचे गुरुजी श्री वैशंपायन ह्यांनी धार्मिक बाबतीत काय करावे ह्याबद्दल पूर्ण माहिती देवून हे लिखाण जास्तीतास्त परिपूर्ण करण्यास मदत केली त्या बद्दल त्यांचे इथे मी आभार मानतो आणि माहिती देण्यास सुरुवात करतो

काही सूचना व माहिती
सामाजिक व लौकिक विधींना गुरुजींची जरुरी नसते. मात्र धार्मिक विधींना गुरुजींची आवश्यकता असते. अशा वेळी सामानाची यादी व कार्याचा दिवस वेळ ह्यांची माहिती आपण जे गुरुजी बोलावतो त्यांच्याकडून वेळोवेळी घ्यावी.
शुभ दिवस व अशुभ दिवस अलीकडे कालनिर्णय सारख्या बऱ्याच दिनदर्शिकेमधून दिलेले असतात. सामाजिक व लौकिक कार्यासाठी दिवस ठरवतांना अशा दिनदर्शिकेचा आधार आपण घेऊ शकतो. विवाह संस्कारातील कार्याची माहिती देतांना मुलगा म्हणजे वर आणि मुलगी म्हणजे वधु हे प्रचलित शब्द वापरले आहेत.
वैदिक विवाह पद्धतीत मातृका पूजन, नांदी श्राद्ध, देवक, वांग-निश्चय, झा ल म्हणजे ऐरणी पूजन हे कार्यक्रम ऐच्छिक असतात. मंगलाष्टके शेवटी गाईली जातात.
विशेष सूचना ----- वधु व वर यांचे आई वडील उभयता हयात नसतील तर त्यांचे ऐवजी कार्य करणारी व्यक्तीच वधु वर यांचे आई वडील समजावेत
क्रमशः --------------- १)ग्रहमख २)केळवण ३)व्याही भोजन

Sunday, 9 October 2011

देवत्व कल्पना --- सजीवांच्या उत्र्क्रांतीवादाचा म्हणजेच दशावतार ---५) वामन, ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण ९) बौद्ध १०) कलंकी

ईश्वर / देवत्व कल्पना  --- सजीवांच्या उत्र्क्रांतीवादाचा म्हणजेच दशावतार ---५) वामन, ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण ९) बौद्ध १०) कलंकी  आणि सहव्वी कल्पना उपयुक्त सजीव उदाहरणार्थ गाय
आपल्याकडे देवत्वाच्या ६ कल्पना आहेत कल्पना असे मी अशासाठी म्हणतो जो पर्यंत मला ती गोष्ट स्पष्ट पणे जाणवत नाही तो पर्यंत माझ्यासाठी ती कल्पनाच असते. आणि मला अजून पर्यंत तरी देव जाणवलेला नाही म्हणून माझ्यासाठी ती कल्पना आहे.
आत्ता पर्यंत आपण ४ प्रकार पहिले १ ओमकार २ त्रिगुण ३ पंचा महाभूते ४सजीवांच्या उत्क्रांतीच्या पहिल्या ४ अवस्था ज्या प्राणी प्रकारात मोडतात. सजीवांच्या पहिल्या चार प्रकारात आपल्याला असे लक्ष्यात येईल कि त्यात देहाची उत्क्रांती होत गेली आहे. आणि एकदा मानव देह मिळाल्यावर त्याच्यातील बदल हा
प्रथम शारीरिक पण त्याच आकारात --- ५)वामन
नंतर बौद्धिक ------------------------------ ६)परशुराम
मग मानसिक ----------------------------- ७)राम
आणि बुद्धी आणि मनाचा सुरेख संगम -- ८)कृष्ण
हे बदल होत होत पुढे संहाराच्या जाणीवेतून एकदम विरक्ती ----- ९)बौद्ध 
आणि शेवट आत्ता चालू असलेला अराजक अस्थिर द्विधा मनसस्थितीतील माणूस --------- १०)कलंकी
ह्या सर्वांचा उंचावरून विचार करता असे लक्षात येते कि पहिले ३ मुळात देह नाहीत अद्वैत-एकटा, वृत्ती व निर्जीव पण निसर्गातील शक्ती आहेत. त्यांना मानव रूप कोणी कधी व का दिले ते कळत नाही. कदाचित निव्वळ अद्वैताची, वृत्तीची किंवा निव्वळ शक्तीची उपासना मानत स्थिर होणे कठीण असल्याने मानवी देह कल्पून त्यांना पूजणे सुरु झाले असावे. 
सजीवातील ज्या प्राण्यांना आपण देव मानतो तरी त्यांचे आजचे वास्तवातील स्थान मर्यादित दिसते.
आत्ता फक्त मानवी देहरूपी देव प्राधान्याने पूजले जातात असे जाणवते.
आज पर्यंत आपण देवत्वाचे प्रमुख प्रकार पहिले
आज मी काही प्रश्नावली आपल्या समोर ठेवत आहे.
अ) मी एखाद्या व्यक्तिरेखेला देव मानतो त्या मागील माझी भूमिका काय आहे? का र ण काय आहेत?
ब) मला देव हवा असे खरोखर मनापासून वाटते का? त्या साठी मी काय केले पाहिजे आणि ते मी करतो का?
क) माझ्या देवाकडून काही अपेक्षा आहे का? त्या पुऱ्या झाल्या का?
ड) देवत्व हे मी नेमके कुणाकुणाला बहाल करीन



देवत्व कल्पना -- चौथा प्रकार -- उत्र्क्रांतीवाद -- दशावतार -- १) मत्स्य, २) कूर्म, ३) वराह, ४) नारसिंह,

देवत्व कल्पना -- चौथा प्रकार -- उत्र्क्रांतीवाद -- दशावतार -- १) मत्स्य, २) कूर्म, ३) वराह, ४) नारसिंह,
आपल्याकडे देवत्वाच्या ६ कल्पना आहेत कल्पना असे मी अशासाठी म्हणतो जो पर्यंत मला ती गोष्ट स्पष्ट पणे जाणवत नाही तो पर्यंत माझ्यासाठी ती कल्पनाच असते. आणि मला अजून पर्यंत तरी देव जाणवलेला नाही म्हणून माझ्यासाठी ती कल्पना आहे.
पहिला प्रकार ----- ओंकार (गणपती),
दुसरा प्रकार ------- ब्रम्हा - विष्णू - महेश. ह्या देवत्वाच्या मूर्तीच्या कल्पना ------------ सत्व - रज - तम हे त्यांचे गुण  ---------- सात्विक -- राजस-- तामसी हे त्यांचे स्वभाव म्हणजेच वृत्ती
तिसरा प्रकार ----- पंचमहाभूते ----- पृथ्वी - आप (पाणी) - तेज - वायू - आकाश
चौथा प्रकार ----- सजीवांच्या उत्र्क्रांतीवादाचा म्हणजेच दशावतार १) मत्स्य, २) कूर्म, ३) वराह, ४) नारसिंह,
पाचवा प्रकार ----- सजीवांच्या उत्र्क्रांतीवादाचा म्हणजेच दशावतार ५) वामन, ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण,
सहव्वा प्रकार ----- सजीवांच्या उत्र्क्रांतीवादाचा म्हणजेच दशावतार ९) बौद्ध, १०) कलंकी (कली)
 
चौथा प्रकार ------ दशावतार  - उत्क्रांतिवाद जो डार्विन च्या उत्क्रांतीवादशी जुळणारा आहे. सजीवांची उत्क्रांती हा एक वर्षानुवर्षे घडत आलेली क्रिया आहे. ती आपण नाही निसर्ग करत आला. हे जरी खरे असले तरी त्यात सजीवाचा हि काही वाट आहे ह्यात वाद नाही आपल्याकडे ८४ लक्ष योनी  म्हणजे सजीव  प्रकार आहेत असा पौराणिक उल्लेख आढळतो. त्यातील महत्वाचे टप्पे म्हणजेच हे दश अवतार आहेत. हे मात्र नक्की. आणि हे विस्ञान सिद्ध हि आहे.
आत्ता पर्यंत जे प्रकार पहिले त्यात शब्द वृत्ती आणि पंचमहाभुते ह्या पैकी कोणताच प्रकार सजीव नाही सजीवांची उत्क्रांती हि ह्या श्रुष्टीच्या उत्क्रांतीच्या पुढचा टप्पा आहे त्या मूळे त्याला हि देवत्व मानण्याची पद्धत आपल्याकडे दिसते. ह्याचे मी तीन भाग केले आहेत पहिले चार अवतार प्राण्यातील प्रगती दर्शवते पाच ते आठ हे मानवाची उत्क्रांती दर्शवते आणि पुढे नऊ व दहा हे आधुनिक आहेत जे जे वर जाते ते ते खाली येते त्याची प्रचीती देते   
दशव्तारांना देवत्व मानण्याची कल्पना हि सजीवांची सुरुवात ते आजचा मानव ह्या दोन प्रमुख स्थितींना जोडणारी महत्वाची कल्पना आहे.
१ ला अवतार- मत्स्य. आपल्याकडे ८४ लक्ष सजीव प्रकार आहेत अशी काल्पन आहे. आणि त्यांची प्रगती सुद्धा जलचर उभयचर भूचर अश्या क्रमाने झालेली आजच्या विज्ञान प्रधान युगालाही जान आहे. त्यातील बदलत्या टप्प्यातील शेवटचा टप्पा हा देवत्व मानला गेलेला दिसतो. मत्स्याच्या पुढची पायरी उभयचर २ रा अवतार कूर्म  ३ रा भूचर वराह व ४ था नरसिंह हे रूप मात्र विज्ञानाच्या उत्क्रांती वादाशी थोडे वेगळे दिसते.
ह्या उत्क्रांती वादाच्या मागची मानसिकता काय असावी ह्याचा आता विचार करू श्रुष्टीतील याच्या यावत सजीव मुक्ती साठी तडफडत आहे. त्याच्या अनेक इच्छांपैकी मुक्ती हि इच्छा आगदी प्रत्येकात अखंड आहे पण त्या साठी आपल्याला नेमके काय घडले म्हणजे आपण मुक्त होऊ? आपल्याला मोकळे वाटेल? असा विचार ज्या ज्या वेळी मनात घर करतो त्या त्या वेळी त्याला न लाभलेली गोष्ट लाभली तर आपल्याला मुक्त वाटेल हि सहज प्रवृत्ती निर्माण होते आगदी प्रत्येक सजीवत. हि मुक्तीची तीव्र इच्छाच त्याला उत्क्रांतीला मदत करते. आणि त्यातूनच त्याच्या प्रत्येक पूर्वीच्या योनिपेक्षा जरा उच्च योनी त्याला प्राप्त होते. ह्या बदलाचा वेग कमी असतो पण आन आपण प्रगत मानव विचार करू शकतो म्हणून ह्या मागच्या प्रगतीच्या आलेखाची आपल्याला करपणा येऊ शकते. त्यातील महत्वाचे टप्पे म्हणजेच दहाव्तारातील पहिले ४ अवतार होत.
   
     

देवत्व कल्पना- पंचमहाभूते ----- पृथ्वी - आप (पाणी) - तेज - वायू - आकाश

ईश्वर / देवत्व कल्पना- पंचमहाभूते ----- पृथ्वी - आप (पाणी) - तेज - वायू - आकाश
आपल्याकडे देवत्वाच्या ५ कल्पना आहेत कल्पना असे मी अशासाठी म्हणतो जो पर्यंत मला ती गोष्ट स्पष्ट पणे जाणवत नाही तो पर्यंत माझ्यासाठी ती कल्पनाच असते. आणि मला अजून पर्यंत तरी देव जाणवलेला नाही म्हणून माझ्यासाठी ती कल्पना आहे.
पहिला प्रकार ----- ओंकार (गणपती),
दुसरा प्रकार ------- ब्रम्हा - विष्णू - महेश. ह्या देवत्वाच्या मूर्तीच्या कल्पना ------------ सत्व - रज - तम हे त्यांचे गुण  ---------- सात्विक -- राजस-- तामसी हे त्यांचे स्वभाव म्हणजेच वृत्ती 
तिसरा प्रकार ----- पंचमहाभूते ----- पृथ्वी - आप (पाणी) - तेज - वायू - आकाश
चौथा प्रकार ----- सजीवांच्या उत्र्क्रांतीवादाचा म्हणजेच दशावतार १) मत्स्य, २) कूर्म, ३) वराह, ४) नारसिंह, ५) वामन, ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण, ९) बौद्ध, १०) कलंकी (कली)
पाचवा प्रकार ----- युगपुरुष ----- महान पुरुष ----- कालपरत्वे समाजाला लाभलेले विविध प्रकारचे नेते. उत्क्रांतीवादाच्या मधील दशावतारांपैकी शेवटचे ५ हे ह्याच प्रकारतहि येतात.
 
आता आपण पाहणार आहोत तिसरा प्रकार ----- पंचमहाभूते ----- पृथ्वी - आप (पाणी) - तेज - वायू - आकाश
(पहिला प्रकार ----- ओंकार (गणपती) हि पहिला शब्द पहिला देव, दुसरा प्रकार ------- ब्रम्हा - विष्णू - महेश. ह्या देवत्वाच्या मूर्तीच्या कल्पना ------------ सत्व - रज - तम हे त्यांचे गुण  ---------- सात्विक -- राजस-- तामसी हे त्यांचे स्वभाव म्हणजेच वृत्ती ह्यांनाच देव मानलेले आहे. 
ह्या प्रकारामाद्ध्ये आपल्याला असे लक्षात येईल कि पंचाम्हाभूतांनाच देव मानले आहे. पृथ्वी- माता, आई, जननी, धारण करती  -स्थूलतम, जड  ----- आप- पाणी, स्थूल, प्रवाही  ----- तेज- सूर्य, इंद्र, अग्नी स्थूल, प्रवाही+वाही स्थूल+सूक्ष्म  ----- वायू- स्थूल+वाही+सूक्ष्म, आकाश -----सूक्ष्म, स्थिर, सर्वव्यापी, सूक्ष्म    
श्री  कृष्णांच्या काळात आपल्याला ह्याचा देव म्हणून स्वीकार केलेला आढळतो त्याच बरोबर त्या काळात इडा देवी असाही उल्लेख आढळतो त्याचा विचार पुढे दुसऱ्या कोणत्या तरी प्रकरणात विस्ताराने येईलच. 
ईश्वराला आपल्या एकले पणाचा कंटाळा. त्यातून द्यैताचा खेळ त्याने सुरु केला त्याच्या इछेचा पहिला शब्द आला ओम त्या  शब्दातून प्रकटले अ उ म वृत्ती त्या पोसल्या गेल्या ज्याच्या आधाराने त्या पंचाम्हाभूतांना हि देवत्व आले. पहिले दोन प्रकार मानवाच्या स्वतःच्या देहाशीच निगडीत होते पंचा महाभूते बाहेरील होती ती देहाच्या बाहेरील असली तरी आपला देहाच मुळात त्यांच्या पासून निर्मिला गेलेला असल्यामुळे त्याचे गुणधर्म देहात होते. मन हे माणसाचा सूक्ष्म देहच असल्याने ते गुणधर्म मनातही स्पष्ट दिसतात. आणि आपला देह त्यांच्यापासून बनला आहे हि जाणीव असूनही त्याच्या अफाट शक्तीची जाणीव आणि त्याच बरोबर आपल्या अगतिकतेची जाणीव ह्यातून हा देवत्व प्रकार उत्पन्न झालेला दिसतो. नर देह पंच्म्हाभूतानंचा बनलेला आहे म्हणूनच त्यांचे सर्व गुणधर्म माणसात आहेत. माणसाच्या स्थूल देहात त्याचे भौतिक गुणधर्म आढळतात आणि माणसाचा सूक्ष्म देह जो त्याचे मन त्यात पान्चाचाम्हाभूतांच्या शक्तींचे गुणधर्म आढळतात. आणि ते सर्व गुणधर्म आपल्यात असूनही आपण त्या पंच्म्हाभूत्न्च्या आधीन आहोत. त्यातून स्वतःच्या कमीपणाची सुप्त जाणीवच त्यांना म्हणजे पंचाम्हाभूतांना देवत्व बहाल करते.
 
सूक्ष्मातून आलेला माणूस जडाच्या  विचारात गुरफटून जातो. जादाचीच आसक्ती बाळगतो  ह्यातूनच षड्रिपू प्रकट होतात. षड्रिपू म्हणजे देही विचार देहाच्या स्वार्थाचे विचार. स्वतःहून जडाच्या बंधनात पडतो आणि मग अडकल्याची जाणीव होते पण सुटायचे कसे कळत नाही म्हणून त्याच्याच कडे म्हणजे जादाकडेच मुक्तीसाठी आक्रोश करतो. ह्याचेच नाव अज्ञान.  
 
ह्या एकूण विस्तारावरू आपल्याला श्रुष्टीच्या विस्ताराची सुरुवात कशी झाली ह्याची थोडीशी कल्पना येईल आणि एकच एक  ईश्वर अनेक कसा झाला ह्याची आपल्याला कल्पना येईल इथे नुसती सुरवात आहे. एक गुणिले ३गुण गुणिले ५ महाभूते गुणिले त्यांच्या पाचपेक्षा जास्त शक्ती.  आणि ह्या सर्वांच्या वर्गातून निर्माण झाले दशावतार म्हणजे पृथ्वीवरचा सजीवांचा उत्क्रांतिवाद मग काय आकडे वर्गाच्या प्रमाणात वाढत गेले आणि मग सहजच मुळातल्या एकाच विसरला तो माणूस त्याला पुंन्हा त्याच्या स्व रुपाची जाणीव करून देणे जागे करणे म्हणजेच परमार्थ म्हणजेच स्वार्थ्शुन्न्यता.   

/ देवत्व कल्पना-ब्रम्हा - विष्णू - महेश. ह्या देवत्वाच्या मूर्तीच्या कल्पना

ईश्वर / देवत्व कल्पना-ब्रम्हा - विष्णू - महेश. ह्या देवत्वाच्या मूर्तीच्या कल्पना
आपल्याकडे देवत्वाच्या ६ कल्पना आहेत कल्पना असे मी अशासाठी म्हणतो जो पर्यंत मला ती गोष्ट स्पष्ट पणे जाणवत नाही तो पर्यंत माझ्यासाठी ती कल्पनाच असते. आणि मला अजून पर्यंत तरी देव जाणवलेला नाही म्हणून माझ्यासाठी ती कल्पना आहे.
पहिला प्रकार ----- ओंकार (गणपती),
दुसरा प्रकार ------- ब्रम्हा - विष्णू - महेश. ह्या देवत्वाच्या मूर्तीच्या कल्पना ------------ सत्व - रज - तम हे त्यांचे गुण  ---------- सात्विक -- राजस-- तामसी हे त्यांचे स्वभाव म्हणजेच वृत्ती 
तिसरा प्रकार ----- पंचमहाभूते ----- पृथ्वी - आप (पाणी) - तेज - वायू - आकाश
चौथा प्रकार ----- सजीवांच्या उत्र्क्रांतीवादाचा म्हणजेच दशावतार १) मत्स्य, २) कूर्म, ३) वराह, ४) नारसिंह, ५) वामन, ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण, ९) बौद्ध, १०) कलंकी (कली)
पाचवा प्रकार ----- युगपुरुष ----- महान पुरुष ----- कालपरत्वे समाजाला लाभलेले विविध प्रकारचे नेते. उत्क्रांतीवादाच्या मधील दशावतारांपैकी शेवटचे ५ हे ह्याच प्रकारतहि येतात.
 
आता दुसरा प्रकार ----- (पहिला प्रकार ----- ओंकार (गणपती), झाला) ----- ब्रम्हा - विष्णू - महेश. -----ह्या देवत्वाच्या मूर्तीच्या कल्पना आपल्या सर्वांना परिचित आहेत ह्या मागच्या संकल्पनांचा आता विचार करू. ह्या दुसर्या प्रकारात वृतींचा विचार केलेला दिसतो, आणि त्या वृत्तींनाच देव मानले आहे 
१) ब्रम्हा म्हणजे a कार ----- निर्मिणारा, निर्मितीचा आनंद मिळाल्यामुळे सदा प्रसन्न ----- सत्वगुणी. ह्या वेळी गुणांच्या बरोबर आणखीन एक जाणीव निर्माण झाली ती म्हणजे गती आणि काल. कारण निर्मिती म्हणजे कर्माबरोबर प्रवाह गती व काल संकल्पना हि निर्माण झाली म्हणजे गात काल-भूत काल, वर्तमान काल, व भविष्य काल म्हणजे तीनही काळाचे भान ठेऊन निर्मिती करायची. मागेहि पहायचे वर्तमानही लक्ष ठेवायचे  आणि भविष्याचे भान ठेवायचे म्हणजे तिथेही लक्ष ठेवायचे.   
२ विष्णू म्हणजे उकार ----- पालनकर्ता, पालन करणे म्हणजे जबाबदारी आली आणि जबाबदारी आली कि गांभीर्य आलच म्हणून गंभीर -------- राजसगुणी. इथे देह बुद्धी मन न्यानेद्रीये कर्मेंद्रिये सर्वांचा विकास साधायचा हे जबाबदारी माणसावर आहे. मग विश्व चालवणाऱ्या त्या ईश्वरावर केव्हढी जबाबदारी असेल आणि तो किती गंभीर असायला हवा. तसा तो नसेल तर आजच्या आपल्या राज्या/देश सारखी पूर्ण विश्वाची काय अवस्था होईल कल्पना करू शकाल आपण. तरीही तो त्याचे नियम सोडत नाही. म्हणूनच त्याला कृपाळू म्हणतात.
३ महेश म्हणजे मकार -----  नष्ट करणारा रागीट कारण राग आल्याशिवाय नाश करता येणार नाही  ----- तामसगुणी. तीनही गुणांचा समन्वय तो गजानन ओंम्कर स्वरूप ह्या ओंकार स्वरुपाची मी दिलेल्या माहितीखेरीज भरपूर माहिती आधीच उपलब्ध आहे त्यामुळे तीच मी परत देत नाही. आणि माझ्या दृष्टीकोनातून जी माहिती द्यायची ती ओमकार मद्ध्ये दिलीच आहे.  
आता ह्या दुसऱ्या प्रकारात ब्रम्हा विष्णू व महेश ह्यांना देव मानले आहे सत्व - रज - तम हे त्यांचे गुण  ---- सात्विक - राजस - तामस --- ह्या वृत्ती आहेत. अति पूर्व काळात हे देव मानले गेलेले दिसतात एकूण वास्तवाचा विचार केला तर त्रिगुणांनाच आदरणीय मानण्यात आलेले आहे. आणि त्यांनाच देवत्व बहाल केले आहे. हेच त्रिगुण माणसात कायम असतात. फक्त त्यांचे प्रमाण प्रत्येकात वेगवेगळे असते त्या मूळे त्यांच्या  त्यांच्या  अधिकात्वा वरून आपण व्यक्तीचा स्वभाव ठरवतो . समाज व्यवस्थेचा विचार करता माणसाला नेहमीच समोरून चांगला माणूस ---- सात्विक माणूस भेटावा/लाभावा  असे वाटत असते पण आपणही पूर्णपणे सात्विक नसतो. ईश्वर संकल्पना करतांना मात्र तीनही गुणांना समान प्राधान्य दिले गेलेले  आढळते.
ह्या देवत्वाच्या कल्पनान मद्ध्ये सजीव नाहीये. वृत्ती किंवा जडलाच कल्पनेने मानवी देह योजलेले आहेत. ब्रम्हा तीनही काळाचे भान असलेला म्हणून तीन तोंडे कल्पिली. विष्णू अत्यंत धीरागाम्भ्रपणे कर्तव्य पालन करणारा नागावर आरूढ होऊनही शांत. आणि शंकर तर क्रोधी म्हणजे तो क्राध दोन डोळ्यातून बाहेर येण्याला कमी पडेल म्हणून तिसरा डोळा त्याला आहे त्यातून तो आग बाहेर सोडतो आणि सर्व भस्मसात होत हि कल्पना. पण त्यांना मानवी रूपे देण्याचे कधी सुरु झाले हे इतिहास किंवा पुराने कुठेही नमूद करत नाहीत. पण त्याच बरोबर हे हि सत्य आहे कि
सृष्टीच्या अस्तित्वासाठी सर्वांची सारखीच गरज आहे ह्या गोष्टीची जाणीव मात्र त्या कालच्या मानवी कल्पना करणाऱ्या मानवालाही आहे. 
आज मात्र आपण माणूस त्या वृत्तींना उच्च नीच भेदाने स्वीकारतो. त्यातल्या त्यात उच्च नीच ठरवतो. आणि त्यामुळेच निसर्गाने देलेल्या देणगीचा  आपल्याला नीट वापर करता येत नाही.
वृत्तींना देव मानायचे म्हणजे त्यांना जाणायचे. राजयोगाच्या साधनेत समाधीचे ३-४ प्रकार सांगितले आहेत त्यातील निर्विकल्प समाधी च्या पूर्वी  सविकल्प समाधीत पर्यंतच्या सर्व प्रकारात ह्या स्वतःच्या वृत्तींवर  मन एकाग्र करायचे असते. स्वतःच्याच वृत्तींवर स्वतःच मन एकाग्र करणे हे सोपे नाही. मनावर प्रचंड ताण येतो. मेंदूला थकवा येतो. मुळात ते समजायलाच कठीण आहे अशक्य नाही  भौतिक जाणीवेचा तो शेवटचा टप्पा आहे. तामसी विचार दूर सारून सात्विक विचार जाणीवपूर्वक करायचा. अशा सतत प्रयत्नाने आपण आपल्या मनाला सतत सात्विक विचार करायला शिकवतो होतो आणि शेवटी तो हि सोडून द्यायचा. तेव्हा निर्विकल्प समाधीकडे आपला प्रवास सुरु होतो. ह्यालाच  अनन्य म्हणजे निव्वळ बिनतक्रार विना अट शरणागती म्हणतात. हे पूजा, आरती करतांना आपण रोज तोंडाने म्हणतो पण मुळात हा मनाचा भाव आहे तो जमला तर उपयोग नाहीतर नुसताच आरतीतील घंटानाद. स्वानुभव घेऊन बघायच्या ह्या गोष्टी आहेत. असो   हे सर्व प्रकार सर्व सामान्न्यांसाठी कठीण (अशक्य नाहीत) आहेत. त्यामुळेच मूर्ती कल्पना आल्या आणि त्या जास्तीतजास्त रुजल्या. त्याचे कारण माणसाला दृश्याची जाणीव सवय जन्मापासून आहे. त्यामुळे त्याला ते  जाणणे  सोपे  जाते ती सवय इतकी आहे कि त्याला त्या गोष्टी स्वप्नातही दिसतात. ह्यातूनच पुढे भक्ती मार्गाची व्यवस्था झाली. हा सूक्ष्म कडून स्थूलाकडे नेणारा विचार आहे --- जडाकडे नेणारा  प्रवास आहे. आणि त्याचे आचरण हा त्याच जादाकडून सूक्ष्म जो परमात्मा त्याच्या कडे नेणारा प्रवास आपण प्रत्यक्षात करायचा आहे. म्हणजेच साधना करतांना त्या सहज जाणवणाऱ्या जादाचा आधार घेऊन सूक्ष्म पर्यंत जाणे म्हणजे परमार्थाचा प्रवास होय. आमची अडचण हि आहे कि आपण त्यात प्रवास करतच नाही फक्त जडताच घुटमळत राहतो. म्हणून अनुभव येत नाही निर्भेळ आनंद मिळत नाही. आयुष्याचे प्रश्न तर मुळीच सुटत नाहीत. कारण आम्ही ढोंगी आहोत. आपण बहुतांशी धार्मिक कृत्य  आपण धार्मिक आहोत असे जगाला दाखवण्यासाठी करतो. समाजात आपले थोडे तरी स्थान राहावे म्हणून करतो. चार लोक आपल्याला आस्तिक आहात असे म्हणावीत म्हणून करतो. स्वतःच्या मानसिक उत्कर्षासाठी करत नाही म्हणून अनुभव येत नाहीत. पुन्हा एकदा विवेकानंदांचे वाक्य नामुद   करतो  ""अन सेल्फिश नेस इस मोर पेइंग यु बट पिपल डोन्ट हाएव पेशंस टू प्रेक्टीस इट"" ------ हाएव पेशंस.शुभम भवतु         
 
 
 
 
 
   

देवत्व कल्पना ----- पहिला प्रकार ----- ओमकार

देवत्व कल्पना ----- पहिला प्रकार  ----- ओमकार
श्री गणेशाला वंदन करून मला जे जाणवले ते मी आपल्या समोर मांडत आहे. आपल्या सर्वांना तो सिद्धी विनायक प्रसन्न होऊदे.
श्री गणेश ओंकार ----- मी ओंकारामधील ध्वनी शास्त्राची माहिती  देणार आहे. जे पूर्ण पणे भौतीकावर आधारित असून साधनेचे मूळ आहे भौतिक आणि सूक्ष्म ह्यांना जोडणारा हा दुवा आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.  म्हणून ह्याला पर्यायी शब्द कोणत्याही भाषेत जातीत किंवा धर्मात कुठेही नाही. हे समजण्यासाठी काही प्रस्तावानेची गरज आहे. प्रथम हे लक्षात घ्या कि जगातील फक्त  भारतीय भाषा  उच्चार शास्त्रावर आधारलेल्या आहेत, बाकी कोणत्याही देशातील भाषा उच्चार शास्त्रावर आधारलेल्या नाहीत.उच्चारातून निर्माण होणाऱ्या  प्रत्येक ध्वनीला आपल्या  लिपीत स्वतंत्र अक्षर आहे. ओमकार हा हि पूर्ण ध्वनी शास्त्रावर आधारलेला शब्द आहे. आपल्याडील मुळाक्षरे हीच मुळात ध्वनी शास्त्रावर आधारित आहेत म्हणजे ओष्ठ, तालव्य, मुर्घ्न्य, आणि  कंठ्य ह्या पैकी तोंडात ज्या ठिकाणी स्वरांची निर्मिती होते त्या प्रमाणे त्या त्या प्रकारच्या अक्षरांचे गट केलेले आहेत. शिवाय अनुनासिक आहेत. आणि ह्या सर्वांवर स्वरांचे लेणे आहे ते म्हणजे बाराखडी अ ते अः मुख्य ५ स्वर व एकूण १२ स्वर प्रत्येक व्यंजन स्वरासाहित उच्चारले जातात.  ध्यानिचा आपल्या शरीरवर  मनावर तातडीने  परिणाम होतो  त्यामुळे ध्वनीला आपल्या परमार्थ शास्त्रात फार महत्व आहे. ध्वनीतून  निर्माण होणारे शास्त्र म्हणजे संगीत शास्त्र. स्वामी विवेकानंद म्हणत संगीत हा परमेश्वराकडे जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे.
कंठात आकाराची उत्पत्ती होते निर्मिती होते अर्थात निर्मितीचा आनंद तोच ब्रम्हानंद सात्विक वृत्ती. चांगल्या गायकाच्या तोंडून आपण असा स्वर ऐकलात तर गाणार्याला  आणि ऐकणाऱ्याला खरोखरच अत्यंत आनंद होतो. हा स्वर कंठातून येतो आणि बाहेर पर्यंत ऐकू येतो. उकराची उत्पत्ती तोंडाच्या माद्ध्यात होते तो स्वर तिथेच राहतो व अतिरिक्त स्वर बाहेर ऐकला येतो तो गंभीरच असतो म्हणून पालन करता राजस वृत्ती विष्णू (कल्पना) मकार  - हे व्यंजन आहे - संपणारा  नाशाचे प्रतिक तामसी वृत्ती महेश (कल्पना) शंकर  शब्दाची उत्पत्ती आकाशातून होते पंचमहा भूतांपैकी पहिले ४ जाणायला सोपे आहेत त्यामुळे त्यांचे मानाने ध्यान करणे फार कठीण जात नाही पण आकाश हे सर्वात सूक्ष्म आहे त्यामुळे त्याच्याची तादात्म्य पावण्यासाठी शब्द हेच प्रभावी साधन आहे ओम हा पहिला शब्द आहे.  
संत वान्ग्मायात आपल्याला अनेक ठिकाणी हा उल्लेख आढळेल  कि प्रत्येक सजीव देहात एक अखंड नाद चालू असतो  त्याला अनाहत नाद असे म्हणतात.ह्याचाच भौतिक उच्चार ओमकार. ओम्कारच का?  ह्या शब्द/अक्षराच्या उत्पात्तीमागील कार्य कारण मीमांसा. प्रत्येक शक्ती हे एक पूर्ण वर्तुळ असते ती जिथून सुरु होते तिथेच येऊन परत मिळते तेव्हाच तिचा परिणाम व्यक्त होतो. हा भौतिक विज्ञानाचा सर्वांना माहित असलेला गुणधर्म आहे.  उदाहरणार्थ वीज.

हेच तत्व विचारलाहि लागू होते.  विचार /व/ इच्छा हि सुद्धा अशीच एक शक्ती आहे कि ती जिथून सुरु होते इथेच प्रत येते.  हा भौतिकाचा नियम आहे. म्हणजेच  माझ्यापर्यंत बाहेरून आलेले प्रत्येक विचार हे मुळात माझेच आहेत. म्हणजेच माझा कोणी त्वेष करत असेल तर तो मुळात मीच करत आहे आणि नंतर तोच फिरून माझ्याकडे येत आहे. ह्याच कारणाने स्वतःचे चांगले करण्याचा मार्ग म्हणजे दुसऱ्याचे चागले चिंतने. तसेच ग्ञान आत आहे बाहेरून आघात होतो तेव्हा ते बाहेर येते जसे नाद हा घंटे माद्ध्येच आहे बाहेरून आघात केल्यावर तो आपल्याला ऐकू येतो इतकेच. तीच अवस्था कलेची आणि प्रतिभेची कला आतून बाहेर येते प्रतिभाहि  आतून बाहेर येते. ह्या ग्ञान, कला, इच्छा, सर्वच  गोष्टी लोक कल्याणाला पूरक  आहेत. अश्या सर्व गोष्टींना समाईक  असा शब्द/ अक्षर म्हणजे ओमकार होय. कारण त्याची उत्पत्ती हि आतून बाहेर होते.

ओम्काराची उत्पत्ती आतून बाहेर अशी होते. अ ची उत्पत्ती कंठातून होते. उ हा तोंडाच्या माद्ध्यात निनादतो आणि म कार हा ओठावर येऊन ओठ बंद होऊन संपतो पण त्यातही अशी गम्मत आहे कि मकार पूर्ण म्हटल्यास त्यातून आकार बाहेर येतो म्हणजेच आतून बाहेर येणारा, आणि अनंत, न संपणारा (अन एंडिंग) असा हा एकाच शब्द/अक्षर आहे कि ह्याला दुसरा शब्द नाही. अक्षर नाही. म्हणूनच  हा शब्द/अक्षर पवित्र आहे कारण फक्त आतून बाहेर येणारा म्हणजेच अपेक्षा विरहिततेचे प्रतिक. म्हणूनच ओंकाराचे हे भौतिक रूप आहे. म्हणूनच  हा सिद्ध मन्त्र हि आहे.
 ह्या शब्दात २ स्वर आहेत व म हे व्यंजन आहे. ह्याचा उच्चार  करतांना   जिभेचा कुठेही वापर होत नाही. म्हटले तर तीन अक्षरे पण उच्चार एकच म्हणून हा एकाक्षर मंत्र होतो आपल्याकडे राज्योगाच्या  साधनेसाठी प्राधान्याने उपयोगात आला आहे.  

वास्तविक ह्याला प्रतिशब्द नाही पण आपल्याकडे देव देवता अनेक आहेत. जपासाठी राम प्राधान्याने वापरला जातो कारण  आता राम ह्या शब्दाचे ओम्कारशी साधर्म्य काय ते पाहू राम ह्या शब्दाचा उच्चार र+आ  - म अशा प्रकारे होतो व शेवट म असल्याने प्रत्यक्ष उच्चारल्यावर आपल्या लक्षात येईल कि याचा उच्चार हि ओम्कार समान आहे. आधुनिक शास्त्रात काही लोकांचे   म्हणणे  आहे कि  ह्या राम शब्दा ऐवजी र्हीम म्हटले कि त्यातील र ला जोडून हाकार म्हटला तर त्या हकारामुळे होणाऱ्या आघातामुळे मूळ मन्त्र अधिक प्रभावी होतो. आणि पुढे जाऊन पहिले तर र्हीम शब्द  रहीम शब्दाच्या जवळ जातो राम शब्दाची जुळणारा आहे. अर्थात हे इतर शब्द हे अनेकेश्वर देवत्वाच्या  कल्पनेतून आले मूळ  अ उ म ----- ओम हा अव्यक्ताचे प्रतिक आहे. म्हणूनच हा आद्य व अंतिम मूलमंत्र आहे.
ह्याचे चिंतन करून आपण सर्व त्या गणेशाची साधना करूया शुभम भवतु.

Friday, 2 September 2011

यंदा कर्तव्य आहे

फेस बुक मधील माझ्या एकल मित्रांसाठी ------- आत्ताचे निमित्त ------- अनिकेत कानडे ------- यंदा कर्तव्य आहे  / सोबत विषय आदर्श
यंदा कर्तव्य आहे आपल्याकडे ठरवून लग्न करतांना वधूवर मंडळात नावे नोंदणी होते त्यात प्राधान्याने अजूनही लग्न पत्रिका आणि जात पाहिली जाते. अर्थात त्याबद्दल मी काहीच  वाक्त्यव्य करत नाही, कारण हा ज्यात्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पत्ता घरच्यांची माहिती हे हि सर्वच जण देतात. त्यामुळे त्यात मी काही आणखीन लिहिण्याचा प्रश्नच नाही.
मी एका संस्थेच्या निमित्ताने एक फॉर्म बनवला होत त्यातील घरगुती माहिती सोडून बाकीचा सोबत देत आहे. संबंधितांनी त्याच्यात भर टाकून तो अधिक समृद्ध बनवावा.
मला सुचलेली माहितीची लिस्ट देतो आहे त्या प्रत्येक माहितीच्या समोर स्वतःची व जोडीदाराची माहिती समोरासमोर लिहावी म्हणजे आपली आपली भविष्यातील जोडीदाराबरोबर नीट तुलना करता येईल. आपण कागदावर लिहितांना किंवा कॉम्पुटर वर टाकतांना टेबल करून टाकावी. म्हणजे परस्परांना समजायला सोपे जाईल.
१ वय                              २ उंची                              ३ वजन                              ४ जाड/ मद्ध्यं/ बारीक
५ रंग                             ६ केसांचा रंग                    ७ डोळ्यांचा रंग                    ८ जन्माखून
९ व्यंग                           १० अनुवौशिक दोष              ११ रक्त गट                          १२

शिक्षण ///  नोकरी  /// धंदा ///  स्वतःपुरता धंदा ///  दर महा पगार किंवा धंद्यातील आवक  ///  परदेशातील वास्तव्य ///  बायकोनी नोकरी करावी का  ///
 घर ///   भाड्याची जागा - चाळ चालेल ///  स्वतःचा  ब्लोक ---  केव्हढा अपेक्षित आहे  ///   स्व प्रांत   ///   परप्रांत  ///   परदेश    
 आवड निवड
१ खाणे पिणे         ४ करमणुकीचे प्रकार ----- फिरणे / प्रवास / शोप्पिंग / सिनेमा / नाटक / ट्रेकिंग / हैकिंग  /  परदेशी सहल
स्वभाव / वृत्ती
१ कामुक ----- नेहमी / कधी कधी / क्वचित ------ साधारण
२ रागीट -----  नेहमी / कधी कधी / क्वचित ------- मृदू
३ लोभी ------ नेहमी / कधी कधी / क्वचित ------- अनासक्त
४ मोही ------ नेहमी / कधी कधी / क्वचित ------- समाधानी
५ मद अहं ----नेहमी / कधी कधी / क्वचित ------ निरःन्कारी
६ मत्सर ------ नेहमी / कधी कधी / क्वचित ------ प्रेमळ
७ दांभिक ----- नेहमी / कधी कधी / क्वचित ----- प्रामाणिक 
८ व्यसन         अ सुपारी ------ नेहमी / कधी कधी / क्वचित             ब तंबाखू ------ नेहमी / कधी कधी / क्वचित
                      क सिगारेट ---- नेहमी / कधी कधी / क्वचित            ख दारू --------- नेहमी / कधी कधी / क्वचित
आदर्श ------------ आदर्शाचा विसंवाद
आता लग्न जुळवतांच्या वास्तवाचा विचार करू. आदर्श म्हणजे काय? समाजातल्या अनिष्ट रुढींच्या विरोधी प्रत्यक्ष वागून समाजाला   योग्य वाट दाखवतात त्यांना बहुधा आदर्श मानतात ---  म्हणतात. श्री रामांना मानणारे त्याच्या नावाचे स्मरण  करणारे सुद्धा लग्नाच्या वेळी मग तो  कोणत्याही जातीतील असेल तरी तो आपल्याच जातीतील  जोडीदारीन  हवा असेच म्हणतो. ज्या श्री रामचंद्रांनी  जात तर सोडाच  कुळ हि   पहिले नाही. त्यांनाच मानतो आणि त्याच्या विरोधी वागतो हा विरोध भास आहेच आज. आम्ही पत्रिका बघतो श्री रामांचा ज्या मुहूर्तावर  राज्ज्याभिषेक होणार होता त्याच मुहूर्तावर वनवासाला जायची त्यांना वेळ आली.  प्रारब्ध कोणालाच चुकलेले नाही. अगदी देवादिकांना  सुद्धा हेच आम्ही एकीकडे वारंवार स्वतःला समजावतोआणि बरोबर विरुद्ध वागतो. कसे वागायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे पण. आपले अनेक प्रश्न ह्याच प्रकारच्या अनेक वृत्तीतून निर्माण झालेले आहेत आणि होत आहेत. म्हणून ह्यावर विचार व्हावा.
आता एक निवेदन करतो  आजपासून मी एक दिवस रोगांची करणे व उपाय अर्थात मानसिक व एक दिवस माझे लिखाण असे लिहिणार आहे कारण वाचक वर्ग वाढला आहे सुरवातीला वाचक नुसते लाईक क्लिक करायचे आता प्रतिक्रिया आणि संभाषण करतात काल मी खरोखर ८ तास कोम्पुतर वर होतो तरीही आज्साठी कसेबसे लिखाण झाले. अखंड लेख होऊ शकला नाही छोटे छोटे दोन प्रकार लिहिले आहेत. त्यामुळे हा निर्णय मी घेत आहे. अर्थात प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात हा विषय पुढे गेला तर ते अधिक चांगले होईल त्यामुळे मी लिहिले आहे त्या व्यतिरिक्त काही पैलू आहेत का हे हि लक्ष्यात येईल आणि विषय अधिक चांगला समजेल आणि संवादामुळे खरी मैत्री वाढेल.

 गणेश चतुर्थी मिमित्त मी ओमकार ह्या विषयावर लिहिणार आहे. आपण माझे लिखाण नेहमीच वाचता आणि प्रतिसादही चांगला आहे. त्याबद्दल प्रथम धन्ण्यावाद. तरीही मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे कि ओमकार ह्या विषयावरचे लिखाण प्रत्येकांनी ----- मनापासून ----- शांतपणे ----- समजून घेत घेत  ------ वाचावे. कारण ओमकार हा प्रयेक सजीवाचा प्राण आहे. गणेश हा सिद्धीचा नायक आहे. चौदा विद्या चौसष्ट कलांचा स्वामी आहे. असा ह्या गणेशाला आपण एका अक्षरात कसे सामावले आहे ते पाहणार आहोत. अश्या ह्या गणेशाला शब्दांनी जाणायचे आहे. त्या नंतर त्याला जोडून देवत्व त्याचे प्रकार असा नवीन विषय सुरु करत आहे





 

प्रारब्ध म्हणजे --- पूर्व कर्म --- पूर्वीचे कर्म --- पूर्व जन्मीचे / जन्मांचे कर्म

प्रारब्ध
प्रारब्ध म्हणजे --- पूर्व कर्म --- पूर्वीचे कर्म --- पूर्व जन्मीचे / जन्मांचे कर्म वर्तमान हा त्याचा परिणाम आहे. म्हणजे कर्माचे महत्व किती आहे ह्याची आपल्याला कल्पना येईल. म्हणून कर्म करत राहणे हे आवश्यक आहे. कारण ह्याच नियमाने आजचे कर्म हे उद्याचे प्रारब्ध आहे. आजचे कर्म माझ्या हातात आहे म्हणजे उद्याचे प्रारब्ध हि पर्यायाने माझ्या हातात आही पण आजचे परार्ब्ध माझ्या हातात नाही आणि ते टाळताही येत नाही. प्रारब्ध कोणालाच टाळता आलेले नाही. हे वास्तव जर नीट कळले तर निव्वळ प्रारब्धावर अवलंबून न राहता कर्म करण्याची जिद्द टिकून राहील. प्रारब्ध मानणे म्हणजे कर्म टाळणे नाही. प्रारब्ध हे बँकेतल्या सेविंग खात्यासारख आहे पण एक फरक आहे सेविंग खात्यात जमा मधून खर्चाची आपापसात वजाबाकी होऊन शिल्लक बाकी राहते प्रारब्धात मात्र थोडेसे वेगळे आहे त्यात पाप आणि पुंण्याची वजाबाकी होत नाही दोन्हींचे परिणाम भोगायला लागतात. ह्याच कारणाने एखाद्या सरळ माणसाला सोसणार नाहीत इतके भोग भोगायला लागतात आणि एखादा निव्वळ भोगासाठीच जन्माला आलेला दिसतो. म्हणूनच सामान्न्य माणूस गोंधळतो. आणि त्याची कर्म आणि सत्त्यावरची श्रद्धा डळमळीत होते. इतकेच काय त्याचा जन्माचे जन्माच्या ठिकाणाचे त्या वेळच्या परिस्थितीचे कारणच त्याचे पूर्व कर्म असते म्हणूनच आपल्याकडे जन्मापेक्ष्या मरणकाळ साधावा असे संत महंत  वारंवार सांगतांना आढळतात.
भोग आणि उपभोगाचे असे का तर काही गोष्टी खरेदी केल्या सारख्या असतात त्यांचे फळ आपल्याला ताबडतोप मिळते पण काही झाड लावण्या सारखे असते त्याचे फळ यायला आपल्याला वाट हि पाहायलाच हवी नाही का?

माणसाच्या बाबतीत एखादा यशस्वी झाला कि तो स्वतःला कर्तृत्ववान समजतो आणि इतर अनेक जण त्याच्या यशात आपला वाट असल्याचे दर्शवितात यशाला अनेक आईबाप असतात आणि अपयश पोरकं असत हे म्हण त्यातूनच आली अपयशी माणूस ह्याच्या नेमके उलट नेहमी आपल्याखेरीज दुसर्यावर आपल्या अपयशाचे खापर फोडत असतो. कर्म करायचेच पण प्रारब्धावर सोडून द्यायचे म्हणजेच फळाची अपेक्षा करायची नाही.

आता कर्म चांगले कोणते आणि वाईट कोणते हे कसे ओळखायचे ?? कर्म ते करणाऱ्याच्या साठी त्याच्या उद्देशाप्रमाणे त्याच्यावर परिणाम करते. एक प्रत्यक्ष घडलेले उदाहरण देतो १४ मार्च २०१० ला माझ्या नातीचा पहिल्या वर्षाचा वाढदिवस होता. तो सोसायटीच्या गच्चीत होता त्याची जिन्यात वरच्या शेवटच्या लांदिंग मद्ध्ये दोन पोपटाची पिल्ले पडली होती एक मेलेलेच होते दुर्यात धुगधुग होती मी त्याला टिशू पेपर घालून बोक्ष मद्ध्ये घालून घरी आणले रोज कॉम्प्लान फळांचा रस वर्ण वगैरे ड्रोपर ने भरवून वाढवला एका नेत्चुर लवर आणि डॉक्टर मुलाला त्याला कसा सांभाळायचा त्याची माहिती घेतली व हे हि विचारले त्याला कधी सोडून देऊ. त्यावर तो मुलगा म्हणाला आता तुम्हीच त्याचे आईबाप तो बाहेर जगू शकणार नाही कारण त्याला लवकर सोडलेत तर उडता येणार नाही आणि उशीर झाला तरी जन्मजात सवय नसल्याने उडता येणार नाही आणि मुख्य म्हणजे त्याला नैसर्गिक जगातून अन्न मिळवणे तुम्ही शिकवूच सक्त नाही म्हणजे जगायचे तर पिंजर्यात नाहीतर मरण. ह्या नाम प्रारब्ध त्या पोपटाचे. आणि माझी भूमिका काय तर मी माझ्या हौसेसाठी लहान पिल्लू आईपासून वेगळे करून विकतात/ विकत घेतात तो प्रकार केलेला नाही त्याचा जीव वाचवा म्हणून त्याला सांभाळला हा माझा हेतो तसे मला फळ. तोच डॉक्टर मुलगा माझ्याकडे नंतर आला होता त्याच्या मित्राला पोपट हवा आहे तो द्याल का विचारायला आणि आमचे त्या पोपटा बरोबरचे वागणे पाहून माझ्या आईला म्हणाला आजी हा इथेच राहूदे तुमच्या इतके प्रेमाने त्याचे कुठेच होणार नाही. ह्या वरून आपल्याला हेतूच्या सुद्धाशुद्धातेतील फरक आपल्या लक्षात येईल. तू ज्या ज्या भावनेने माझ्या पर्यंत येशील त्या त्या भावनेने मी तुझ्यावर कृपा करतो असे भगवंत म्हणतात म्हणजेच त्या त्या प्रमाणे मी तुला फळ देईन.

 

आपले सण आणि उत्सव

आपले सण आणि उत्सव
मंगला गौर
हा एक पूजेबरोबरच  खेळला जाणारा सामाजिक खेळ आहे. पूर्वी मुलांची लग्न बालवयात ६-८ वर्षांची असतांनाही केली जायची. त्याचं खेळायचे वय असायचे. त्या काळी निस्शंशय पुरुष प्रधान संस्कृती होती. आज ती आपल्याला काही अंशी कमी झालेली दिसते. ज्या समाजात मुलींना शिक्षणाचे प्रमाण कमी त्या प्रमाणात ती अजूनही घट्ट पाळे मूळे धरून आहे.
जुन्या काळी मुलींना बाहेरचे जगच  नव्हते. त्यांचे वयही खेळण्याचे असायचे. त्यातून मंगळागौर खेळणे हि संकल्पना आली.व एकूणच मूर्तिपूजक संस्कृती असल्यामुळे प्रत्येक कार्याच्या मागे काही देव देवतांच्या पूजेचे निमित्त केले जात असे.
लग्न झाल्यावर वयाखेरीज अनेक नाती जोडली जातात त्याबरोबर अनेक पोक्त प्रवृत्ती अंगी बाळगावया  लागतात. हे खर तर बालविवाह प्रकारामुळे मुलींवर समाजाने लादलेले अकाली पोक्त्मान असायचे. अश्या वेळी वर्ष्यातून एकदातरी त्यांच्या वयाच्या बागडण्याची मोकळीक मिळावी म्हणून हा सण आहे. आज मुलामुलींची लग्न त्यांना योग्य समज आल्यानंतर होतात. किंबहुना कधी कधी आर्थिक परिस्थितीमुळे त्याही पेक्षा उशिरा होतात. अशा वेळी वास्तविक ह्या सणाच्या सादरीकरणावर विचार करून वेगळ्या प्रकारचे सादरीकरण होण गरजेचे आहे. समस्त मुलूंनी ह्यावर विचार करून ह्या रूढीचे नुतानिकर्ण करावे.



नाग पंचमी
हिंदू संस्कृतीतील प्रत्येक सणांच्या मागे काही ना काहीतरी कार्य कारण भाव असतोच असतो. पण कोणत्याही गोष्टीमागचा कार्यकारण भाव नष्टं होतो तेव्हा त्यची रूढी होते. हि रूढी नेहमी समाजाला चुकीच्या दिशेने वाहवत नेते. कोणच्याही थोड्याश्याहि उपुक्त्तेबद्दल समारंभपूर्वक कृतज्ञता व्यक्त करणे व  कोणत्याही बाबतीत जराही कृतघ्न नसणे हा हिंदू धर्माचा पाया आहे. कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रमुख प्रकार म्हणजे पूजा करणे. याच भावनेतून नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात-
नाग हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. कारण ते शेतातील उंदीर खातात त्यामुळे शेताचे सहज रक्षण होते. विस्ताविक उंदीर हे नागाचे खाणच आहे. हा त्याचा निसर्ग धर्म असूनही, कळत नकळत त्यांच्याकडून होणाऱ्या सहकार्याबाद्दळी कृतज्ञता व्यक्त करणे हा नागपंचमीच्या सानामाग्चा हेतू आहे. 

नारळी पौर्णिमा
मानवाचा देह पंचाम्हाभूतांचा बनलेला आसतो. त्या पंचाम्हाभूतांच्या शक्तीची जाणीव माणसाला असते. त्या जाणिवेमुळेच जो समुद्र दर वर्षीच आषाढ श्रावणात खवळतो त्याला प्रार्थना करून नम्रपणे शांत राहण्याची विनंती करण्याचा  सोहळा नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने साजरा केला जातो.
माणसाने कितीही शोध लावले तरी तो त्या भौतिकाच्या शक्तीचे नियम बदलू शकत नाही. त्याचा योग्य तो उपयोग करूनच माणसाला पुढे जावे लागते. गुरुत्वाकर्षण भेदून जाणारे अग्निबाण निर्माण केले तरी गुरुत्वाकर्षण कायमच असते. अग्निबाण आपल्याला काही कालच पृथ्वीपासून दूर नेऊ शकतात. ह्या वास्तवाची जाणीव ठेउन माणसाने आपला नम्रपणा कधीही न सोडणे हा ह्या सानान्माग्चा मुख्य उद्देश आहे.


गोकुळाष्टमी
देवाच्या मुर्तीपुजेची संकल्पना फक्त हिंदू संस्कृतीतच आहे. त्याला व्यक्तिगत व सामाजिक दोनही अंगे आहेत. कोणत्याही देवांच्या पौराणिक कथेचा नीट अभ्यास केला तर असे लक्षात येईल कि प्रत्येक देवाने कधी आपल्या भक्ताला तर कधी आपल्या समाजाला कोणत्याना कोणत्या तरी मोठ्या संकटातून सोडविले आहे. मुक्त केले आहे. त्याचे पर्यवसान त्याच्याबद्दलची कृतज्ञता म्हणजेच पूजा. ती तर प्रत्येक माणूस आपापल्यापरीने रोजच करत असतो.

कंसाच्या अन्यायी हुकुमाची परवा न करता त्याच्या एकतंत्री राज्यसत्तेला उखडून टाकण्यासाठीच श्री क्रीश्नांचा जन्म झाला होता. त्याचाच एक भाग म्हणून जीजीया कारासारखा असणारा दहीदूध रुपी कर न भारता आधी घरातील अबल वृद्धांना पोटासाठी मिळाल्याशिवाय कोणीही कंसाकडे काहीही पाठवायचे नाही. हि स्पष्ट भूमिका श्री कृष्णाची होती ह्या भावनेतून शिंक्याला लावलेल्या हंडीतले दही दुध लोणी  हे सर्व बालगोपाळांसह आपण आधीच खावून टाकायचे. शिवाय गोपी दुध घेवून मथुरेला पोहोचवायला जातांना त्यांना अडवायचं हा त्याच कार्याचा एक भाग होता. अन्न्न्याय आणि हुकुमशाही विरुद्धची लढाई त्यांनी जन्मापासूनच सुरु केली होती. त्याच साठी त्याचा जन्म होता. त्याची प्रत्येक चाल निर्णय हा बहुजना हितायाच होता. आपल्या रावांना मी विनाणती करेन कि आपल्या मानतील देवत्वाची संकल्पना बाजूला ठेवून आपण श्रीकृष्ण वाचा म्हणजे तुम्हाला आपण कसे वागायचे ते तात्काळ कळेल. किंबुना तो तसा वागला म्हणूनच आपण आज त्याला देव मानतो  आणि  प्रेमाने एकारान्त हाक मारतो. 

हे करतांना आणखीन एक गोष्ट होती ती म्हणजे त्या वेळी श्री कृष्ण  बाल्ल्यावस्थेत होते. त्यामुळे त्यांच्या ह्या कृतीकडे बाललीला म्हणूनच बघणे कंसालाही भागच होते. कारण इतक्या लहान मुलावर त्यांनी कारवाई करण्याची कल्पनाही केली असती तरी त्याच्या इतर राज्ज्यात छी थू झाली असती. त्याला ते परवडला नसत अर्थात कपटाने त्याने शक्य तेव्हढे सर्व प्रयत्न केले पण राजा म्हणून त्याला कोणतीच कारवाई करता आली नाही आणि कर अर्थात तो जाचक होता म्हणून बुडवला जाणे हे सहन करण्याखेरीच गत्यंतरच नव्हते. 

आपल्या आदर व्यक्त करण्याचं प्रकारत आपण पूजा करतो त्याच प्रमाणे प्रतीकात्मक घटना साजरी करून आपल्या आदरणीय व्यक्तींबद्दल आपले प्रेम व्यक्त करतो. याचीच प्रतीकात्मक कृती म्हणजे दहीहंडी हा सण आहे. पण हा सण साजरा करतांना आज मात्र जी कृती श्री कृष्णांनी सत्तेचे विकेंद्रीकर्ण करण्यासाठी केली त्याच्या नेमके उलट तीच कृती आपल्या समाजात सत्तेच्या केंद्रीकार्नासाठी केली जात आहे. समाजात परस्पर प्रेमभाव उत्पन्न करण्या ऐवजी अवास्तव स्पर्धा लाऊन ईर्षेला खतपाणी घातले जात आहे. ह्या विकृती पासून सर्वांनीच  विशेषतः तरुणांनी संपूर्ण पणे दूर राहिले पाहिजे तरच खरी दहीहंडी साजरी होईल. खरी दहीहंडी आपल्या सभोवताली अश्या प्रकारची हुकुम शाही चालत असेल तर त्याला तोंड देण्याची क्षमता असणे हीच खरी दहीहंडी आहे. आज तर तरुणांसमोर प्रच्न्नड आव्हान आहे. आणि त्याला शांत पणे विचार पूर्वक सामोरे जाणे आवश्यक आहे.
आजची परिस्थिती कंसाच्या काला पेक्षा वेगळी नाही पण आज शत्रू नेमका कोण ह्या बाबतीत प्रचंड द्विधा अवस्था आहे. आणि प्रत्येक जण लाटेवर स्वर होऊन वाहत जातो आहे पोहत नाहीये हा काळजीचा भाग आहे. त्या श्रीक्रीश्नाकडे एकाच मागणी मागतो आजच्या तरुणांना कंस कोण ते कळूदे. श्रीक्रीश्णारपनावस्तू . शुभम भवतु.



 

भिक्षा

Prasad Joshi ‎Vinayak Phadke : Sir Maharajani Bhiksha magun khanyachehi mahatwa sangitale aahe tyacha kai uddesh aahe.
Vinayak Phadke ‎Prasad Joshi --- ho aahe te pudhe savistr dile tr sarvannach te kalel chlel na 14 hours ago ·
दान हा विषय लिहितांना मी दानाचे सर्व प्रकार सांगितले त्यात अन्न दान महाराज प्राधान्याने करत आणि करवून घेत. कारण अन्नाने वृत्ती बदलते. म्हणून संतांघरचे मागून खावे असेही सांगितले. पण असे आहे दान हे शेवटी दान आहे. दात्याचे वर्चस्व दान घेणाऱ्यावर येते. घेणारा ऋणको हे स्वाभाविकच होते. पण अनेक घरी भिक्षा मागितल्याने तसे होत नाही कारण देणाऱ्याला मी देतो हा मीपणा राहत नाही कारण मला देणारा तो एकच नाही अनेक आहे आणि त्या अनेकांना बुद्धी देणारा भगवंत आहे म्हणून अनेकांकडून घेतल्याने लाचारी येत नाही म्हणून भिक्षा मागून खावे असे महाराज म्हणत आणि त्यामागची मानसिकता हि आहे. पूर्वी आपल्याकडे एकूणच गरिबी फार होती त्यामुळे लोकांना वर लाऊन जेवावे लागत असे तेव्हा सुद्धा काही लोक वर लावण्या ऐवजी  चार पाच घरी माधुकरी मागून जेवत असत त्या मागचा उद्देश सुद्धा वर सांगितला तोच आहे. त्यातही रोजचे मिळालेले अन्न खावून झाल्यावर उरलेले आपल्या पेक्षा गरिबांना देवून टाकायचे साठवून ठेवायचे नाही तिला भिक्षा म्हणतात साठवतो तो भिकारी. ह्या योगाने महाराजांच्याच चारीत्राटली एक कथा सांगतो. महारज म्हणायचे गरिबातला गरीब माणूसही महंत असू शकतो (महंत हि वृत्ती आहे) आणि त्यांच्या नेहमीच्या सवाई प्रमाणे एकदा संधी आल्यावर महाराज म्हणतात आज आपण भिक्षा मागायला जाऊ. बरीच घरे भिक्षा मागून होते जो तो आपापल्या क्षमते प्रमाणे भिक्षा घालतो शेवटी एका नदीजवळ एका साधूकडे भिक्षा मागायला जातात तो स्वतः भिक्षा मागून रोज जेवत असतो महाराज भिक्षा मागायला आलेले पाहिल्यावर तो मागचा पुढचा विचार न करता त्याला मिळालेली सर्व भिक्षा महाराजांच्या झोळीत टाकतो. त्यावर महाराज आपल्या  बरोबर आलेल्या लोकांना सांगतात हा खरा महंत ह्याने त्याला मिळालेली सर्व च्या सर्व भिक्षा माझ्या झोळीत तत्कालीन आज आता तो उपाशी राहणार आत्ता पर्यंत प्रत्येकांनी भिक्षा देतांना बरेच आपल्याकडे ठेवून थोडेसेच दिले होते अर्थात संसारीकाने सर्व द्यावे असे मी म्हणत नाही पण वेळ आल्यास द्यायची तयारी ठेवावी. 

 

उपास - उपवास

उपास - उपवास
अजून श्रावण महिना सुरु आहे. ह्या महिन्यात सणानबरोबर  आपल्याकडे उपवासही केले जातात. तसे आपल्याकडे वर्षभरही अनेक प्रकारचे उपास केले जातात. उपवास ह्या शब्दाचे दोन अर्थ आहेत एक अर्थ उपवास (उपास हा त्याचा अपभ्रौंश आहे) म्हणजे लंघन आणि दुसरा अर्थ उप वास म्हणजे ईश्वराजवळ वास म्हणजे वास्तव्य. हे वास्तव्य हि अर्थात मनाचेच आहे.

आज पर्यंत आपण मनाचा शरीरावर परिणाम होतो म्हणून मन स्वच्छ ठेवणे का आवश्यक आहे त्याचा विचार केला. शरीर आणि मन हे एकमेकाला पूरक आहेत कारण शरीर हे स्थूल आहे तर मन हे सूक्ष्म शरीर आहे त्या मूळे ते दोन्हीही परस्परावलंबी आहेतच. म्हणजेच शरीर आजारी असेल तरी माणसाचे मन स्थिर राहत नाही हा हि अनुभव आपल्या सर्वांना आहे. म्हणून केवळ मनाचे शुद्धीकरण पुरेसे नाही पण शरीर सुद्धा स्वश्च शुद्ध ठेवायला पाहिजे. शरीर आतून शुद्ध ठेवण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे लंघन करणे.

आपण नीट पहिले असेल तर जनावर सुद्धा आजारी असतील तर लंघन करतात. पूर्वी डॉक्टर सुद्धा आपण आजारी पडल्यास लंघन करण्याचा सल्ला देत असत. आपल्याकडे आणखीन एक म्हण आहे भुकी तो सुखी. आणि जेवतांना सुद्धा सावकाश जेवा म्हणायची पद्धत आहे ते प्रत्यक्षात सावकाश नसून स अवकाश आहे म्हणजे पोटात आवकाश म्हणजेच जागा ठेऊन जेवावे. पोटाला तडस लागेपर्यंत जेऊ जाये  कारण  खालेल पचन होण्यासाठी ते जठरात नीट ढवळले गेले पाहिजे. ते धवालाण्यासाठी  थोडी जागा ठेवणे आवश्यक आहे. ह्या सर्व वरून उपवासाचे   म्हणजे लंघन करण्यामागचे महत्व आपल्याला सहज कळेल. जगायला माणसाला थोडासाच आहार लागतो वर खातो ते रोगांसाठी.

 आता उपवास म्हणजे त्याच्या (ईश्वरा) जवळ वास म्हणजे वास्तव्य. आता ईश्वराजवळ वास्तव्य म्हणजे अर्थातच मनाचे. आपल्याला  देह भान विसरण्याचा अनुभव आहे. आपण आपल्या कामात मनापासून मग्न असलो कि आपण देहभान विसरतो म्हणजे तहान भूक विसरतो. त्याच प्रमाणे ईश्वराच्या चिंतनात देहभान विसरून जेव्हा उपवासाने उपास घडतो तो खरा उपवास होय. श्रावण भाद्रपद ह्या  काळात आपल्याकडे  उपवास जास्त प्रमाणात केले जातात त्याचे कारण तो काल पावसाचा असतो व सर्वसामांन्य पणे पचन क्रिया मंदावते   म्हणून पोटाला  जरा  विश्रांती देणे हे हि आवश्यक असते हे एक कारण आहे.
नवग्रहांचा माणसाच्या आयुष्यावर परिणाम होतो त्यातून जे शास्त्र निर्माण झाले ते ज्योतिष शास्त्र त्या बद्दल इथे मी काहीच बोलत नाहीये. पण सूर्य चंद्राच्या गतीचा आपल्या रोजच्या जीवनावर सरळ सरळ परिणाम होतो हे मात्र आपण सर्वच जाणतो. सूर्याचा पावसावर, वाऱ्यावर, परिणाम होतो. चंद्राचा समुद्राच्या भारतीवर परिणाम होतो. हे सर्व परिणाम आपल्याला तत्काळ जाणवतात. त्याच प्रमाणे एकादशीला उपवास का करतात असा प्रश्न एकाने श्री के वी बेलसरे यांना शंका समाधान मद्ध्ये विचारला होता त्याचे त्यांनी देलेले उत्तर सांगतो. एकादशीला पृथ्वीशी सूर्य आणि चंद्र यांचा १२० औशांचा कोण होतो हा काल साधनेला फार चांगला आहे म्हणून एकादशीला महत्व आहे. प्रवाहाच्या बरोबर वाहने हे केव्हाही विरुद्ध वाहण्यापेक्षा सोपेच असते. म्हणून हा काल साधायचा अर्थात रोज नामस्मरण करायचेच. कारण साधना करणे म्हणजे शरीराला आणि मनाला तशी सवय लावणे होय. साधनेची सुद्धा आपण आपल्याला सवय लावायची इतकी कि ती सहज झाली पाहिजे. पुनरावृत्तीने साधना दृढ होते आणि सिद्धी हे साधनेचे फळ माणसाला प्राप्त होते.   
 

दान आणि त्याग

 दान आणि त्याग
दान आणि दानाचे प्रकार आपण पहिले आता त्याग म्हणजे काय ह्याचा विचार करू. दान म्हणजे काय ते आपल्या सर्वांना माहित होतेच मी फक्त दानाचे प्रकार सांगितले. दान म्हणजे आपण कोणालातरी काहीतरी देणे हे आपण पहिलेच.

त्याग म्हणजे आपण काहीतरी सोडून देणे. त्यावेळेस आपण त्यागलेली वस्तू कोण घेतो त्याच्याशी त्याग करणाऱ्याला देणेघेणे काही नसते. म्हणजे त्याग हा व्यक्तिगत आहे. संपूर्णपणे स्वतःच्या व्यक्तिगत मुक्तीचा विचार त्यागात आहे. कारण त्याग म्हणजे ईश्वर प्राप्तीच्या आड जे जे येईल त्याचा त्याग करणे होय. मुख्य म्हणजे हा त्याग मनातून आणि मनापासून झाला पाहिजे. एक एक वस्तू त्यागतांना  शेवटी  संसाराचा त्याग करणे म्हणजे संन्यास. त्याग हा थोडा थोडा नाही सर्व संग परित्याग म्हणजेच  खरा त्याग. संपूर्ण संन्यस्त वृत्ती तो हि मनापासून हवा नाहीतर ----------------- 

एक माणूस होता त्याने संन्यास घ्यायचा ठरवला आणि घरदार सोडून जंगलात जाऊन झोपडी बांधून राहू लागला. अगदी पंचा नेसून राहू लागला.  काही काल गेला. एकदा त्याच्या लक्षात आले कि त्याचा पंचा कुणीतरी कुणीतरी कुर्ताद्लाय, म्हणजे झोपडीत उंदीर आहे, मग उंदराला पकडायला त्यांनी मांजर पाळले, पुढे मांजराला दुध हवे म्हणून गाय पाळली मग गाईचे करणार कोण म्हणून बाई ठेवली शेवटी हे काही बरे दिसत नाही म्हणून तिच्याशी लग्न केले. हे रूपक आहे.

दान हे कर्मयोगाचे लक्षण आहे त्याग हे सन्यसस्थाचे लक्षण आहे. दान हे समाजाभिमुख आहे संन्यास हा समाजापासून दूर जाणे आहे. दान देतांना दान घेणार्याची पात्रता विचारात घेणे अभिप्रेत आहे. आणि ती एक सामाजिक जबाबदारी आहे. संन्यासात स्वतःच्या  मनावर विलक्षण  ताबा मिळविण्याचा कठोर अभ्यास आहे.  कर्म योगात कर्म करून फळाचा त्याग करायचा आहे संन्यासात कर्माचा त्याग आहे पण तो निव्वळ बाह्य कर्माचा त्याग नाही मनातील कर्माचा त्याग अभिप्रेत आहे निव्वळ बाह्य कर्माचा त्याग म्हणजे वर देलेली गोष्ट. मग अंतर कर्माचा त्याग म्हणजे काय?
माणसाचे मन हे क्षणभरही कर्माशिवाय राहू शकत नाही. ते जास्त करून भूत आणि भविष्यात रमते व काही तरी मिळवायचे असेल तर मात्र वर्तमानात राहते. लंबकाच्या आंदोलना प्रमाणे भूत वर्तमान भविष्य असे त्याचे आंदोलन चालू असते. त्याच  बरोबर संकल्प विकल्पांचे  ओझे सोबत घेवून ते आंदोळत असते. त्या मूळे घड्याळाचा लंबक घड्याळाच्या गतीला नियमित करतो तर ह्या संकल्प विकल्पांच्या ओझ्यामुळे  मनाचे आंदोलन अनियमित होते. हि मनाची स्थिती म्हणजेच मनाचे कर्म होय. ह्या सगळ्या स्ठीतीबारोबरच मनाच्या इच्छा म्हणजेच अनेक वासनाही त्याच बरोबर त्याला आणखी निरनिराळ्या दिशेला ओढत असतात. हि असते सर्वसामान्य मनाची अवस्था ह्या अवस्थेतून मनाला सोडविणे. म्हणजेच कार्माक्रमाने वासना मग संकल्प विकल्प त्यानंतर भूत भविष्यात आंदोलने ह्यांचा स्वतःची बुद्धी वापरून त्याग करणे म्हणजे संन्यास आयकायला फार कठीण नाही पण अचारायला अत्यंत कठीण म्हणूनच भौत जनहिताय संनायासापेक्षा कर्मयोग सोपा व ते हि कठीण असेल तर भक्ती / प्रेम योग सोपा असे सर्व संतांनी आपल्याला सांगितले आहे.
कर्म संन्यास ह्या प्रकारात सर्वात धोका हा कि कर्माचा सन्यास घेतल्यामुळे माणूस आळशी ---  जड बंन्तोच कारण मानतील कर्म थांबवणे हे महत्वाचे आहे हे त्याला बहुतौशी माहीतच नसते हा ह्या मार्गातील सर्वात मोठ्ठा धोका आहे. कारण आधी मनाचे कर्म थांबविणे हेच माहित नसते नंतर कळले तर कसे हा प्रश्न पडतो. ह्यावर श्री गोंदवलेकर महाराजांनी एक छान माहिती सांगितली आहे ती सांगून आजचा भाग संपवतो महाराज म्हणाले संसार करणे म्हणजे जात्यातून पीठ दालने आहे. जात्यातील दोन दला पैकी एक स्थिर व एक फिरत असते. दोनही फिरायला लागली तर पीठ दळले जाणार नाही. आपली स्थिती तशी असते आमचे मन व शरीर दोनही फिरत असते किंवा मन फिरते आणि शरीर स्थिर राहते म्हणून परमार्थ नीट होत नाही मन स्थिर ठेऊन शरीराला फिरत ठेवा म्हणजे संसाराचे पीठ छान दळले जाईल. ---------------
संन्यासालाही हाच नियम लागू आहे म्हणजे आळस व जडता जाईल व खरा संन्यास त्याग घडेल शुभम भवतु
 
 

दान ------- १)द्रव्य दान, २)अन्न दान, ३)ग्ञान दान, ४)धर्म दान

दान ------- १)द्रव्य दान, २)अन्न दान, ३)ग्ञान दान, ४)धर्म दान
Harshal जोशी       श्रावणी सोमवारचे उपास किती लोकांनी केले आणि त्यापैकी दानधर्म किती लोकांनी केला हे जरी शोधले तरी धर्मावरील श्रद्धा आणि नितीमत्ता यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही हे पुराव्यासह सिद्ध करता येईल
दान ------- १)द्रव्य दान, २)अन्न दान, ३)ग्ञान  दान, ४)धर्म दान हे चार दानाचे प्रकार सांगितले आहेत त्यांची प्रत चढत्या क्रमाने आहे.
१)द्रव्य दान ---- सर्वात कमी दर्जाचे  पण कोणालाही  सहज करता येणारे. हे सर्वात कमी प्रतीचे कारण द्रव्य लवकर संपते देणारा देऊन देऊन किती देणार? म्हणजे उद्या संपल्यावर मी रिकामाच. हे एक कारण दुसरे कारण घेणारा हा याचक म्हणजे देणार्याचे  वर्चस्व  राहते  मिंधेपण राहते. 
२) अन्न दान ------- हे द्रव्य दानाहुन श्रेष्ठ. कारण देणार्याची वृत्ती घेणाऱ्यात येते, त्यामुळे अन्न देणारा किंबहुना अन्न बनवणारा प्रसन्न असला पाहिजे. कारण त्याच्या वृत्ती अन्न स्वीकाराणार्यात प्रवर्तित होतात. ह्याच कारणाने महाराज म्हणत कि संतांघरचे मागून खावे. तोच खरा प्रसाद असतो. प्रसादात आणखीन एक गोष्ट महत्वाची असते कि सर्वांना वाटून उरलेले खातो तो प्रसाद असतो. सर्व तृप्त झाल्यानंतर आपण तो ग्रहण करायचा असतो.  श्री गोंदवलेकर महाराजांनी अन्नादानाला अत्त्यंत  महत्व दिले त्यांनी  स्वतः तर प्रचंड प्रमाणात अन्न दान केलेच पण आपल्या चाह्त्यांकादुन व भक्तांकादुनही दान घडविले. आजही गोन्दाव्ल्याच्या त्यांच्या मठात कायम अन्न दान चालू असते हे सर्वग्न्यात आहे.
३) न्यान दान ----------- हे अन्न दानाहुन श्रेष्ठ. कारण न्यान म्हणजे कायमचा  ठेवा तो मरेपर्यंत टिकतो. न्यानाचा उपयोग माणूस त्याला हवा त्या वेळी योग्य प्रकारे करू शकतो आणि आपले कमी न होता दुसऱ्याला देऊही शकतो. दुसऱ्याला दिल्याने आपले कमी होत नाही. किंबुना त्याची खोली वाढतच जाते. कारण न्यान दोन प्रकारचे असते एक पृष्ठीय न्यान जे आज इन्फर्मेशन म्हणून वापरले जाते. पण ती इन्फर्मेशन कुठे कशी केव्हा वापरायची ह्याचे न्यान असणे म्हणजे नयनाला खोली असणे होय.  ते स्थळ काल वेळ उपयोग ह्या सर्व गोष्टी नीट विचारत घेऊन वापरता आले कि तो माणूस परिपक्व सखोल विचार करणारा समजावा. सुविचार माणसाला नेहमीच येग्य दिशा देतात. पण माणूस जेव्हा स्वतः विचार कार्याला लागतो तेव्हा त्याच्या बुद्धीची परिपक्वता वाढायला लागते. आज मार्कांवरून आपण मुलांची हुशारी ठरवतो पण तेच मुळात १० टक्के खरे आहे कारण आजच्या मितीला तरी १०वि -- १२वी प्रयान्त्चे मार्क ९० टक्के भाग पाठांतराचा असतो. मी स्वतः विज्ञान विचार शास्त्र असे शिबीर घेत असे तेव्हा एका मुलाबद्दल त्याची शिक्षिका व अर्थात पालकही  फार कौतुक करत होते. शिबीर झाल्यावर अपेक्षेप्रमाणे पालक विचारयला आले. आधी त्याच्या यशाचे कौतुक झाले नंतर विचारणे झाले त्यांना मी सांगितले कि तुमचा मुलगा १० वी १२ वी पर्यंत नक्की मेरीट मद्ध्ये येईल पण फुढे मात्र तो फारसा कुठेही दिसणार नाही. हे मी भविष्यकार म्हून केलेले भाकीत नव्हते तर सर्व मुलांच्या बरोबर त्याच्याशी केलेल्या संवादातून लक्ष्यात आलेला त्याच्या विचार शक्तीचा गुणांक मला तसे दर्शवित होता ते मी सांगितले आणि खरोख्कारच तो मुलगा पुढे ७० टक्के च्या वर जाऊ शकला नाही. म्हणजेच विचार शक्ती वाढवणे म्हणजेच नयनाची होळी वाढवणे आहे. त्याला सोपा उपाय आहे माझ्या आजपर्यंत च्या सर्व लिखाणाचे मर्म कार्या कारण सर्व काही म्हणजे प्रत्येक कार्याच्या कारणाचा शोध घेत मुळापर्यंत पोहोत्चले कि आपल्याला खरे वास्तव कळते नाहीतर निव्वळ इन्फर्मेशन म्हणजे पृष्ठभागावर तरंगणारे शेवाळे.  न्यान माणसाच्या स्व-उत्कार्ष्यालाही कारणीभूत होते. न्यान हे भौतिक आहे भौतिक उत्क्रांती साठी  उत्कर्षासाठी उपयोगी पडते.  
आता सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे धर्म दान वास्तविक मला माझ्या नियमाप्रमाणे ह्यावर बोलायचा अधिकार नाही पण फक्त वाचलेली माहिती देतो
४) धर्म दान ----- धर्माचे दान करणे आपण बहुतेक संतांची चरित्र अभ्यासालीत तर आपल्याला असे लक्ष्यात येईल कि त्यांनी त्यांच्या गुरूंकडून जे मिळवले असे ते म्हणतात तेच धर्म दान. अर्थात ते मिळवायलाही अधिकार लागतो. अधिकार हाच शब्द इथे वापरतात म्हणून तो जाणीवपूर्वक लिहिला आहे. आपण आज लौकिकात अधिकार ह्या शब्दाचा अर्थ सत्ता असा घेतो पण परमार्थात व अध्यात्मात ह्याचा अर्थ पात्रता असा आहे. आणि दान देणारा जरी कितीही दानशूर असला तरी घेणाऱ्याचा अधिकार नसेल तर तो ते स्वीकारू शकत नाही इक्तेच नाही तर जर अर्धवट पत्र्तेने त्याला काही मिळाले तर त्याचे फार नुकसान होऊ शकते.

 सर्वच प्रकारचे दान स्वीकारण्यासाठी पात्रता असणे हे वरील सर्व दानाच्या बाबतीत सुद्धा लागू आहे. कारण न्यान देणारे गुरु /शिक्षक हे एकाच वेळीस ४०--५० विद्यार्थ्यांना शिकवीत असतात पण सर्वांचे यश वेगळे असते कारण त्यांची धारण क्षमता वेगवेगळी असते. ह्याचा अर्थ न्यानार्जानात शिक्षकाला महत्व आहेच पण त्या पेक्षा जास्त महत्व विद्यार्थ्याला आहे कारण त्याची क्षमता असणे हेच महत्वाचे आहे नाहीतर पालथ्या घड्यावर पाणी किंवा खडकावर टाकलेले बीज ठरेल. म्हणजे विद्यार्थी सतत उत्सुक पाहिजे जिज्ञासू पाहिजे माहिती विचारणारा नाही तर शोधणारा पाहिजे म्हणजे न्यान प्राप्त होते जे खरे म्हणजे आतून बाहेर येते स्वामी विवेकानंद म्हणतात नाद घंणतेत असतोच आपण बाहेरून फक्त आघात करायचा असतो कि तो बाहेर येतो हे आतून बाहेर येणारे न्यान म्हणजेच खोली असलेले न्यान
दान हे कलियुगातील दर्माचे एकमेव साधन आहे कारण बरेच साधना प्रकार लोप पलेले आहेत. काही विकृत पद्धतीने समाजासमोर मांडले जातील आणि जाताहेत. काही साधनाप्रकार आपल्या आत्ताच्या समाजव्यवस्थेमूळे व मानवाच्या शारीरिक क्षमतेमुळे आचरणे कठीण होऊन बसेल म्हणून दान हेच शेवटचे साधन राहील.........  पण................ १) दान हे  सत्पात्री हवे २)दान ह्या हाताने दिलेले त्या हाताला कालताकामा नाही. ३) दिलेल्या दानाची कोठेही वाच्यता करताकामा नये ४) समजा आपली काही चोरी झाली तर त्याचे दान करा असे जॉयस मायर त्यांच्या व्याख्यानात म्हणाल्या होत्या त्याचा अर्थ असा कि ते तुम्ही मनातून दान करा, ती वस्तू दान केली आहे असेच समजा, मनापासून मनातून सोडून द्या, हे खरे दान आहे.  ढोल ताशे वाजवत बोंबलत  करतो  केल्या दानाची विविध प्रकारे प्रसिद्धी करत करतो ती जाहिरात झाली. ते दान फुकट जाते त्याने लौकिक मिळेल काही काल पण मानसिक समाधान शुन्य. म्हणून दान करणे हे ज्या गोष्टीचे दान करयचे आहे ती वस्तू मनातून पूर्णपणे काढू टाकणे मन पूर्ण मोकळे करणे म्हणजेच स्वच्छ करणे होय. प्रयत्न करून पाहूया प्रसन्नतेचा अनुभव घेऊया
   
 

स्वतंत्र्यता --------------- दिन विशेष

स्वतंत्र्यता ---------------  दिन विशेष
स्वतंत्र्य्तेची ओढ माणसाला जन्मापासूनच आहे. आईच्या गर्भात पारतंत्र्यात असलेला जीव बाहेर येताच स्वातंत्र्य अनुभवतो पण त्याचीही सवय नसल्याने रडू लागतो विश्वाला घाबरतो. आणि हळू हळू पारतंत्र्याच्या आठवणी विसरतो. आणि दत्त म्हणून मिळालेल्या स्वातंत्र्यातील पारतंत्र्याच्या आनंदात पुन्हा गुरफटून जातो. आईच्या गर्भात असतांना त्याला ते पारतंत्र्य वाटत नाही. तिथेही तो सुखावलेलाच असतो कि. कारण त्याला त्या अवस्थेत जे जे हवे आहे ते ते ईश्वर पुरवीत असतो. त्या पलीकडील विश्वाची त्याला जाणीवच नसते म्हणून तो त्याच त्या सुखाला चातावतो हि चटक म्हणजेच गुलामगिरी हि कल्पनाच त्याला नसते. म्हणजेच पारतंत्र्याची जाणीव जीवाला प्रथम स्वातंत्र्यात आल्यावर होते हा केव्हढा विरोधाभास आहे पण हे प्रत्येकाच्या जन्माचे सत्य आहे.
हे झाले माणसाचे पण संपूर्ण विश्व स्वातंत्र्यासाठी झटतेय. नवग्रह सूर्याच्या बंधनातून दूर जाऊ पाहताहेत. पृथ्वीचा अणुरेणु तिच्या माद्ध्यापासून दूर जातो आहे. याचाच परिणाम पृथ्वी फुगते आहे. हे वैज्ञानिक सत्य आहे. आणि आजच्या प्रगत विज्ञानाला हे मानण्य आहे. मोठाल्या आकाश गंगा तेजोमेघ सर्वांना हीच स्वातंत्र्याची ओढ आहे पण कोणीही पूर्ण मुक्त नाही म्हणूनच ओढ आहे मुक्ती झाली तर ओढ राहणारच नाही. म्हणजेच नकळत माणूस पारातान्त्र्यालाच धरून ठेवतो. एका मुक्तीसाठी धडपडतो त्यातून मुक्त होतो पण दुसऱ्या इछेच्या पारतंत्र्यात गुरफटून जातो. ते हि सहज, अलगद. ह्याचेच नाव संसार. सुखासाठी आधी स्वतःला बंधनात घालतो आणि मग त्यात गुर्फात्याला लागला कि मुक्तीचा ध्यास लागतो. हे चक्र चालूच राहत.
हे झाले माणसाच्या स्वातंत्र्याचे आज आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत. कारण कधीतरी आपला देश पारतंत्र्यात होता. पण आपण पहिला आहे माणूस पारतंत्र्याला कधीच नाही म्हणत नाही तो गुलामगिरीला नकार देतो. पैसा हवा म्हणून नोकरी करतोच कि सर्वच जण धंदा करू शकत नाहीत आणि त्यात गैरही काही नाही पण त्या जर काही कारणाने त्याला गुलामासारखी वागणूक कळत नकळत मिळायला लागली कि मग तो त्या नोकरीतून बाहेर पडतो व दुसरी नोकरी पारतंत्र्य स्वखुशीने स्वीकारतो त्याही रमतो पुन्हा वाढीव भूक लागेपर्यंत. मग मी ह्यातून खरोखर मुक्त कसा होईन? जर मी माझ्या इच्छांना थोड्या मर्यादा घातल्या तरच. स्वतंत्र हे देहाचे असते मनाचे असते जातीचे असते समाजाचे असते देशाचे असते ह्या सर्वातून मुक्त होण्यासाठी आहे त्याच अवस्थेत माझ्या वाट्याला आलेले कार्य प्रामाणिक पणे पार पडणे म्हणजे खरी मुक्ती. अनुभवून बघा. आपले काम चोख करणे म्हणजेच भ्रष्टाचार मुक्त स्वतः होणे. आपल्या महाराष्ट्रातील अनेक संतांच्या पैकी संत एकनाथ महाराज आणि संत गाडगे महाराज ह्यांची शिकवण आपण आचरणात आणली तर आज आपल्याला तरणोपाय आहे नाही तर निव्वळ भ्रस्ताचारा विरुद्ध आरडओरड करून काहीही होणार नाही हे त्रिवार सत्य आही आपल्या कडे लोक संतांची सेवा करतो असे म्हणतात. संतांची सेवा करणे म्हणजे त्यांचे विचार आचरणात आणणे होय. आज मी वर ह्याच दोन संतांचा उल्लेख केला कारण बाकीच्या संतांनी देवाची भक्ती सांगितली भक्तीला प्राधान्य दिले ह्या दोन संतांनी कर्मयोग समाजाला आचरून सांगितला नाथांना तर स्वतःच्या मुलाचा विरोध होता तरीही त्यांनी समाजकारण सोडले नाही. आपल काय होत आपल्याला समोरचा स्वच्छ हवाय.  कारण प्रत्येकजण दुसऱ्याला काहीतरी सुचवतोय. आणि माझ्या देशाचा झेंडा आणि   नकाशा अंगाखांद्यावर मिरवला कि स्वातंत्र्यदिन साजरा कसा होतो. मी माझ्या स्वतःच्या आर्थिक शारीरिक मानसिक स्वातंत्र्याचा मनोमन प्रयत्न केला तरच मी माझ्या देशाला स्वतंत्र ठेऊ शकेन. दुसर्यावर प्रेम करण्यापूर्वी प्रत्येकाला आधी स्वतःवर प्रेम करणेही शिकायला लागते. अनुभव घेऊन बघा. दुसर्याकडून स्वातंत्र्याच्या अपेक्षा करणे हा उन्माद आहे आणि स्वतःच्या मनाला दुष्ट विचारांच्या भोवर्यातून सोडवणे म्हणजे मनाची उन्मनी अवस्था आहे आज स्वातंत्र्य दिनी त्याचा शुभारंभ करूया आणि आजच्या स्वातंत्र्यातील भयाण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी समर्थ होऊया
ह्याच साठी आजवरचे लिखाण मी करत आलो आहे व पुढेही चलू ठेवीन आपल्या सर्वांना स्वतान्त्या दिनाच्या शुभेच्या  

 

भाग ४ --------उत्तम स्वभावाने रोगांना दूर ठेवा ------------ तुम्हीच आहात तुमच्या रोगांना किंवा निरोगी पणाला जबाबदार

भाग ४ --------उत्तम स्वभावाने रोगांना दूर ठेवा ------------ तुम्हीच आहात तुमच्या रोगांना किंवा निरोगी पणाला जबाबदार
आजपर्यंत मी जे लिखाण केले त्याचा हेतू प्रामुख्याने आजचा विचार स्पष्ट होण्यासाठी होते. देहाच्या आरोग्याचा नियम समाजदेहाच्या आरोग्याला लागू होतो, म्हणजेच प्रत्येक मी जर समर्थ झाला तर समाज अपोआप समर्थ होईल. आणि समर्थ तेव्हाच म्हणता येईल जसे रोगांच्या समोर शरीर समर्थ पणे उभे ठाकेल त्याच प्रमाणे रोग म्हणजेच शत्रूंच्या पुढे समाज समर्थपणे उभा ठाकलेला असेल मग ते बाहेरील शत्रू असोत किंवा अस्तनीतले निखारे असोत. कारण स्वतःच्या कल्याणासाठी जी विचारसरणी अपेक्षित आहे त्या विचारसरणीत परस्परांवर नितांत प्रेमभाव अभिप्रेत आहेच प्रेम हे मात्सारच्या विरुद्ध आहे प्रेमाशिवाय एकसंधता नाही एकी करा असे वर्षानुवर्ष ओरडून एकी झालेली तर दिसत नाही कारण ते निव्वळ उत्सव राबवणे असते, म्हणून मी तुम्हीच आहात तुमच्या रोगांना किंवा निरोगी पणाला जबाबदार हा प्रधान विचार मांडण्याचा निश्चय केला कारण मला निरोगी राहण्यासाठी जे करयचे आहे त्यातून समजतील आपलेपण आपसूकच वाढेल त्याचा वेगळा विचार करावाच लागणार नाही
 आपल्याला हे हि माहित आहे कि जेव्हा काही प्रमाणात रोगराई निर्माण होते आपल्या भोवतालची सर्व च्या सर्व माणसे आजारी पडत नाही काहीच जण आजारी पडतात ह्याचा सरळ सरळ अर्थ आहे कि काहीच जन्च्यात रोगप्रतिकार शक्ती कमी असते बाकी बऱ्याच जणांच्यात ती चांगली असते. म्हणजे बऱ्याच जणांच्या बाबतीत रोगजंतू एक तर शरीरात प्रवेशच करत नाहीत किंवा केला तर ते आपल्या शरीरचे काहीच नुकसान करू शकत नाहीत. हे सातत्य आपण प्रत्येकाने अनुभवलेले आहे. हि पोकळ आशा नाही ठोस आधारभूत सत्य आहे. हे जर खरे असेल तर आपली सुयेग्य विचाराने आपण आपले शरीर सुधरूढ ठेवतो कारण आपल्या पेशी न पेशी सुधृढ असतात.
आज पर्यंत ह्या विषयाचा जो उहापोह केला त्यातूनच आणखीन एक मुद्दा निर्माण होतो माझ्या आजारपणाचा दोष मी दुसऱ्या कोणावरही न ठेवता सर्व जबाबदारी स्वतः स्वीकारू शकतो. हा विचारही स्वप्न नाही सहज शक्य आहे. हा विचार भितीविरहित व प्रेमाने स्वीकार्ण्यासारखा आहे. म्हणजेच  मी सुधरूढ असेन तर परिस्थिती माझ्या देहाचे  काहीहि वाकडे करू शकत नाही. हे नक्की. आता ह्याच बरोबर आपल्याला हे हि लक्षात येईल कि  प्रीकोशन इस बेटर देन क्युर म्हणजेच सामर्थ्य लधाइलाच दूर ठेवते आणि हे सामर्थ्य आहे मनाचे विचारांचे कि ज्याची शक्ती देहाच्या सहक्तीपेक्ष्या खूपच जास्त आहे.
हाच विचार थोडा पुढे नेवून पाहूया माझ्या शरीरातील पेशी सुधृढ झाल्याने शरीर सुधृढ होते आणि हा आहे भौतिक परिणाम. अशा अनेक व्यक्तींचा समाज बनतो त्या समाजातील प्रत्येक व्यकी शरीरानेच नव्हे मनानेही सुधृढ असेल तर आमच्याकडे कोणीच वाकड्या नजरेने पाहणारच नाही. आजची आपली सामाजिक परिस्थिती पाहता मी म्हणतो तो निव्वळ आशावाद वाटेल पण शरीर सुधृढ होण्यासाठी मन नुसते सुधृढ नाही तर प्रेमळ सुद्धा असणे जरूर आहे प्रत्येकाची ती स्वाभाविक गरज आहे कारण चांगले वागण्याला पर्याय नाही मग हे नक्कीच शक्क्य  आहे. एका माणसाच्या शरीराचाच नियम समाज देहाला तंतोतंत लागू पडतो जर मला स्वतःला सुधृढ राखण्यासाठी मला सर्वांची चागले व प्रेमाने वागणे आवश्यक आहे तर माझे समाज शरीरही सावाभ्विक सुधृढ होईलच ना मग माझ्या समाज शरीराकडे वाकड्या नजरेने कोणताच रोगट माणूस पाहू शकणार नाही.
मला तरी असे वाटते हा एकच विचार आज समाजाला तारू शकेल म्हणजेच मी आता सर्वस्वी तुसार्याला दोष देणे थांबावेच पाहिजे चेरीती बिगिन्स वूईत यु तसेच भ्रष्टाचार थांबवणे हे हि माझ्याच पासून सुरु झाले पाहिजे माझ्याच सोबतच्या प्रत्येक नातेवाईक मित्र सर्वांच्यात हे सुक्ष्मतीश्क्ष्म असेल तेच थांबवणे आपल्या हातात आहे शक्य आहे निव्वळ आरोळ्या मारून स्टंट करुं माझे समाज शरीर निरोगी होणार नाही कधीही कारण तो मार्गाच नाही
म्हणून मी पुन्हः फ्न्हा सांगेन कि शरीर सुधृढ करण्यासाठी माझे मन सुधृढ होऊदे अशी सर्व मने सुधृढ होवून  माझा समाज मानाने सुधृढ होऊदे आणि आनंदी होऊदे प्रसन्न राहूदे त्यासाठी त्याने दुसर्याकडे बोटे दाखवणे तात्काळ थांबवले पाहिजे कारण दुसरा कोणीच माझे शरीर सुधारू शकत नाही तसेच समाज शरीर सुधारू शकत नाही. माझे काम मलाच केले पाहिजे जागतिक युवदिनापासून सुरु केलेले हे विचार सत्र आज संपवितो.माझ्या सर्व वाचकांना शुभेच्छा शुभम भवतु, सदर विचार आपल्याला पटले असतील तर लगेच आचरणात आणून नंदू सौख्यभरे. उद्यापासून दुसरा विषय विचार सुरु करूया.
 

भाग ३ -----------------उत्तम स्वभावाने रोगांना दूर ठेवा ------------ आजारपणाच नको

भाग ३ -----------------उत्तम स्वभावाने रोगांना दूर ठेवा ------------ आजारपणाच नको 
आत्तापर्यंत आपण ज्या विविध गोष्टी पहिल्या त्या वास्तव आहेत चमत्कार नाहीत. म्हणून आजारपण बरे होणे किंवा आजारपणाच  न होणे हे आपल्या हातात आहे. हे आपल्या लक्षात आले असेलच.
श्रीमती लुईस हे ह्या बाईंनी भीती, राग म्हणजे क्रोध, मद, मत्सर, आणि ह्या सर्वांवर प्रधान उपाय म्हणजे स्वतः सकट सर्वांवर प्रेम, परिस्थितीचा स्वीकार आणि निर्भयता ह्या गोष्टींना प्राधान्य दिले आहे, कामाबद्दल त्यांनी जे रोग सांगितले आहेत ते प्राधान्याने त्या त्या अवयावान्शीच निगडीत आहेत.
आपल्याकडे षड्रीपुंनाप्राधान्य दिले आहे. आपल्याला माहित आहेत १ काम २ क्रोध ३ लोभ ४ मोह ५ मद ६ मत्सर आणि त्याला जोड दंभ आणि भीती. वास्तविक ह्या सहा रिपून मद्ध्ये काम हि शक्ती आहे आणि बाकीच्या पाच वृत्ती आहेत. भीती हि पापाची म्हणजे वाईट विचारांची व सोबत आचारांची जननी आहे. दांभिकता रोगांवर पांघरून घालते पण शेवटी देहावर ते दिसतातच  किंबहुना मी जे निरीक्षण  केले त्यात  असे  लक्षात आले दाम्भिक्तेमुलेच रोग अधिक वेगाने वाढतात. आज ज्या चार रोगांचा उल्लेख मी मागे केला आहे त्या बाबतीत तरी  मला तसे  प्रामुख्याने जाणवले आहे. 
आज आपण एक वेगळाच दृष्टीकोन विचारात घेणार आहोत. सर्वसामान्णपणे माणूस आजारी पडला कि औषध घेतो. प्रामुख्याने अलिओपथिक. आपल्याला हे हि माहित आहे कि अन्तीबायोतीक्स हे विषासमान आहेत, नव्हे नव्हे विषच आहेत. औषधे घेऊन रोगांवर उपचार करणे म्हणजे शत्रू बरोबर लढाई करणे आहे आणि शत्रू एकदम समोर आला कि आपल्यालाही दुसरा इलाज नसतो तेही खरे आहे. पण लढाई करयचे म्हणजे दोन्हीबाजुचे सैनिक मरणारच म्हणजेच रोग्जान्तुन्बारोबारच आपल्या रक्तातील सैनिक पांढर्या पेशीही मरणारच. आणि आपले शरीर हे युद्ध भूमी म्हणजेच पर्यायाने त्याचे नुकसान होणारच होणार ते टाळणे अश्क्क्य. हे हि स्पष्ट आहे. त्या ऐवजी मी जर माझे शरीर सुधृढ बनविले तर???? हे सर्व नक्की टळू शकते. सुधृढ म्हणजे व्यायाम करून कमावलेले नव्हे आज तरुणानाच्यामाद्ध्ये स्वतःला सुंदर दिशाण्य्साठी सुडौल शरीराची गरज आहे अशी जाणीव झाल्यामुळे तरी बर्याच प्रमाणात व्यायामशाळा वाढलेल्या दिसतात. पण आयुर्वेदात वज्रदेही म्हणजे वज्रासारखा कठोर देह हे निरोगी ह्या अर्थी म्हटले आहे. तसे वज्रदेही होणे हे आपण प्रत्येकाने ठरवले तर????? शक्क्य आहे नाहीका??? आज पर्यंत ज्या विषयाचा उहापोह केला त्यावरून तरी आपल्याला ते नक्कीच जमेल.
आणि ते जमायला हवे असेल तर षड्रिपूंवर मात करायची असेल तर प्रेमाची जरूर आहे. आणि भीतीला दूर ठेवणे आवश्य आहे. श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे एकेक रिपू सोडणे कठीण तुम्ही मी पानच सोडा म्हणजे ज्याच्या आधारावर हे सर्वे वास करतात त्याचा आधारच गेला कि मग ते कुठे राहतील??? मी पानाच गेला षड्रिपू असून नसल्यासारखेच आहेत. षड्रिपू नाहीत म्हणजे शरीर निकोप आणि अहंकार नाही म्हणून परस्पर कलह, विद्रोह, त्वेष, तिरस्कार, दुरीत्व, एकटेपण, काही काही नाही. संत तुकारामांच्य भाषेत सांगायचे  झाले तर आनंदाचे डोही आनंद तरंग. हो आणि हे सर्व स्वार्थाने साधायचे कारण मला माझे शरीर वज्रदेही बनवायचे आहे. हे स्वप्न नाही प्रत्यक्ष शक्क्य आहे. तरच जर मला सुधरूढ व्हायचे असेल तर!!!!!!!!!!!! मनापासून विचार करून भाग सिरीअसली प्लीस
स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे कि अन्सेल्फिश्नेस इस मोर पेइंग यु बट पिपल डोन्ट हेव पेशेंस तू प्रक्तीस इट बघूया प्रयत्न करून

भाग २ उत्तम स्वभावाने रोगांना दूर ठेवा

भाग २  उत्तम स्वभावाने रोगांना दूर ठेवा
मन हा माणसाचा सूक्ष्म देह आहे तो त्याच्या स्थुलादेहापासून वेगळा नाही. त्या मनाचा देहावर परिणाम होतो कश्यावरु? हे समजायला शिक्षण लागत नाही भाषा सागत नाही जात कोणतीही असली तरी प्रत्येकाचे अनुभव सारखे असतात म्हणजे मनाचा शरीरावर सरळ सरळ डायरेक्ट परिणाम होतो हे समजावून द्याला कोण डॉक्टर किंवा मानसशास्त्रज्ञ लागत नाही कारण हा प्रत्येकाच्या अनुभवाचा भाग आहे. भावना  हे मनातील तरंग  असतात त्यांचा परिणाम शरीरावर होतो उदाहरणार्थ थोडेसेही दुक्ख आणि अत्यानंद  दोनही बाबतीत डोळ्यातून अश्रू येतात आवडता खाण्याचा प्र्दार्थाचा वास आला किंवा दिसला तरी तोंडाला पाणी सुटते. दुक्ख आणि अत्यानंद ह्या दोनही वेळी जठरातील अन्नरस कमी पाझरल्यामुळे भूक लागत नाही म्हणजे भावनांचा परिणाम देहातील अंतःस्त्रावी व बहिर्स्त्रावी ग्रंथींवर ताबडतोप (डायरेक्ट) होतो. हि क्रिया जर सातत्त्याने व्हायला लागली तर हेच स्त्राव अयोग्य वेळी अयोग्य प्रमाणात स्त्रावाल्यामुळे देहाच्या रोगाप्रतीकार्षाक्तीचा तोल जातो आणि देहावर रोग दिसायला लागतात. माणसाच्या देहावर रोग दिसायला लागतात त्याच वेळी ते झालेले नसतात त्या आधीच काही दिवस आठवडे महिने वर्ष सुद्धा  त्यांची सुरुवात करायला आपल्या  मानाने त्यांना साथ  दिलेली असते. हे सातत्य कोणीही नाकारू शकत नाही. मग बाहेर जरी आज दिसत अस्लाल तरी रोग जितका जुना तितका त्यावरचा उपाय कठीण किंवा जालीम. हे सर्व साग्न्ण्याचा उद्देश हाच कि मुळात मन प्रसन्न ठेवता आले तर रोगांना दूर ठेवता येईल ह्यात वाद नाही
हे वास्तव अधिक स्पष्ट करण्यासाठी मी आपल्याला एक गोष्ट दृष्टीस आणून देऊ इच्छितो मागे मी म्हटलेच आहे कि महाराष्ट्रात संतांना तोटा नाही खर्या आणि खोट्या सुद्धा पण जे खरोखर समाज कल्याण करणारे अनेक संत होऊन  गेले त्यात प्रत्येक सणांच्या नावावर  सुद्धा काहीनाकाहीतरी  चमत्कार नोंदले गेले आहेत. आपण त्यांची चमत्कारांची बाजू दूर ठेऊन त्यांच्या जीवनाचा अभ्यास केला तर आपल्याला असे लक्षात येईल कि त्या एकूण एक संतांच्यात चमत्कार नसलेली व वास्तववादी अशी एक समान गोष्ट आढळते ती म्हणजे प्रत्येक संतांनी अगदी जगातील सर्व म्हणजे महाराष्ट्रेतर संनातांनी सुद्धा बर्याच रोग्यांना बरे केले आहे
संत हे स्वच्छ मनाचे असतात नव्हे ते दुसऱ्याला आपल्या सारखे बनवू शकतात स्वामी विवेकान्नादांना एकदा त्यांच्या मित्रांनी विचारले कि तू संपूर्ण पाने बुद्धीजीवी विचारांचा आणि कोणतीही गोष्ट अनुभवल्याशिवाय न मानणारा आणि तू अश्या अशिक्षित माणसाला श्री राम्क्रीश्नांना गुरु कसा केलास त्यावर स्वामी विवेकानंदांनी दिलेलेले उत्तर अत्यंत महत्वाचे आहे ते म्हणाले कि जगात अनेक प्रकारची माणसे मी पाहिली पण माणसाचे मन बदलू शकणारा हा एकाच माणूस पहिला  
दुसरी एक गोष्ट सागतो ती श्री गोंदवलेकर महाराजांच्या चारीत्रातीलाच आहे ज्यांनी ते वाचले असेल त्यांना माहित असेलच त्यांच्याकडे एक कुटुंब यायचे नवरा बायको मुलगी त्या मुलीला कोड होत म्हणून ते महाराजांना म्हणाले कि मुलीचा कोडमुळे तिचे लग्न कस होणार काळजी वाटते महारज म्हणाले राम सर्व ठीक करेल तुम्ही त्याचे नाम घ्या आणि एखाद्या गरिबाला द्या त्यांनी त्याच्याकडे येणार एक तरुण मुलगा त्यांना सुचविला सुद्धा त्यांनी ते काबुल केले आणि काही दिवस मठात राहून घरी गेले काही महिन्ण्यानी त्यांच्या मुलीचे कोड गेले तेव्हा त्याच्या मनात वेगळे विचार येऊ लागले त्यांनी आता आपल्या मुलीसाठी दुसरा मुलगा बघायला सुरुवात केली आणि काही दिवसात त्यांच्या मुलीच्या अंगावर पुन्हा कोड दिसायला लागले तेव्हा मात्र ते घाबरले आणि महाराजांच्या कडे खर्या अर्थाने शरण गेले तेव्हा महाराजांनी त्यांनी सांगितलेल्या मुलाशी त्या मुलीचे लग्न लावले पुढे त्याचा संसार आनंदाचा झाला
ह्या चा कार्यकारण भाव असा आहे कि मनातील विचारांचा परिणाम शरीरावर होतो सर्वसामान्न्या माणूस हा शाद्रीपुंच्या ताब्यात असतो आणि षड्रिपू सत्पुरुषांच्या ताब्यात असतात त्यामुळे ते आपल्या मनावर राज्य करू शकता पण कोणताही सत-पुरुष दुसर्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाहीत जेव्हा आपली त्याचाजवळ अनन्य शरणागती होते तेव्हाच ते आपल्यावर म्हणजेच आपल्या मनावर राज्ज्य करणाऱ्या शाद्रीपुंना त्यांच्या ताब्यात घेतात आणि आपली त्यातून सुटका करतात पर्यायाने आपली रोगातुन्ही सुटका होते म्हणून संतांच्या संगतीने रोग बरे होतात (अनन्य शरणागताचे) हे भौतिक सातत्य आहे चमत्कार नाही
हीच गोष्ट जर आपण आपल्याला जाणून स्वतःहून केली तर आपणही रोगमुक्त होऊ नव्हे होऊच ----------हे त्रिवार सत्य आहे शुभम भवतु

षड्रिपू रोग

 षड्रिपू रोग
       
काम तो जाणावा विषयाचा ओघ आवेग तयाचा आवरेना
आवरतात्यासी उपजते प्रेम जैसे दुग्धामृत स्त्रीचे स्तन 1
 तुटता स्वामित्व उफाळतो क्रोध   वाताचे विकार कंप वात
आवरता त्यासी विश्व येई हाती जैसा अर्जुनाचा श्रीकृष्ण सारथी 2
 लोभ तो वाढावी हवेनाकोपणा हावची मनाची चौर्य कर्म
रक्तावरी दाब हृदयविकार सोडीताची लाभे दीर्घायुष्य 3
 मोह तो मोहवी दृश्यात जीवाला   विस्मृती आळस मधुमेह
सोडिता तयासी दुखः जाई लया   आनंदते मन जाणतेपणी 4
 मी पण मनाला दृढजरी करी आधार जो देई सर्व विकार
आधीभौतीकांच्या दहाला वेदना सोडिता निरसे वेदना संचित 5
 मत्सर तो करी अद्वैताचे द्वैत   पोखरी देहाला कर्क रोगे
त्यागिता तयासी प्रेम आणि मैत्री आनंदे संसार आणि जग 6
 दंभ हा पदर दिद्हातभर  झाकितो   मनाला उघडे शरीर
मानाविकाराला झाकितो परी जे      देहारोगे दावी जगाशी या 7

भाग १ आपल्या उत्तम स्वभावाने रोगांना दूर ठेवा

भाग १
आज जागतीक "युवादिन". ह्या युवा दिना निमित्त खास युवकांसाठी --------- आपल्या उत्तम स्वभावाने रोगांना दूर ठेवा
फेसबुक मद्ध्ये मी लिहायला सुरवात केली त्या वेळी सुरवातीला मित्र व नातेवाईक, मग त्यांचे  मित्र मग मित्रांचे मित्र असा गोतावळा गोळा केला सगळेच अनोळखी फेस माहित नसलेले फेसबुक फ्रेंड्स आणि सुमारे ४०० गोतावळा झाल्यावर लिहायला सुरुवात केली. सुरु कुठून करावे कळत नव्हते माझे काही लिखाण तयार होते पण राजकारण धर्मकारण हे टाळून लिहायचे होते म्हणून प्रथम मला आवडलेल्या एका पुस्तकातील काही भाग क्रमशः लिहायला सुरु केला. त्यात श्रावण सुरु झाला आणि हिंदू सणांची सुरुवात झाली. सणांच्या माहित्या   तर अनेक  जन  अनेक ठिकाणी लिहित असतात पौराणिक कथांनाही तोटा नाही. पण ती हि कॉपीच.  मग विषय तोच पण कार्य कारण मीमांसा शोधायची अशा भूमिकेतून ह्याच विषयावर लिहायचे असा विचार आला. मला प पु श्री के बेलसरेंनी स्वतः टीका केलेला दासबोध ग्रंथ दिला होता आणि त्यावर त्यांनी जो संदेश लिहिला होता तो असा  होता कि
जगदीशापरता लाभ नाही कार्या कारण सर्व काही संसार करीत असताना  हि समाधान आणि खाली समर्थ अशी सही केली होती (आहे) हा संदेश मला दासबोधा पेक्षा भावला आणि प्रत्येक गोष्टीमागील कार्य कारण भाव शोधाण्याचा छंदच लागला.
पुढची प्रत्येक पिढी अनुवौशिक्तेच्या उत्क्रांती वादाप्रमाणे अधिकाधिक बुद्धिवान आहे असे दिसते अशा वेळी त्यांच्या समोर आपण जे विषय ठेवणार आहोत ते तर्कशुद्ध असायला हवेत ते तसे नसेल तर एकतर  ती पिढी ते स्वीकारणार नाही नाहीतर मुद्दाम विरोध करेल म्हणून हि पद्धत अवलंबली. आणि चांगला प्रतिसाद मिळाला.
आजची युवा पिढी बर्याच औंशी दिशाहीन  आहे त्याला आपल्या भोवतालची आर्थिक अस्थिरता  राजकीय स्थिती व सुशिक्षित  प्रमाण वाढून  सुद्धा धार्मिक अंध श्रद्धा अशा विपरीत जाळीत गुंतत चाललेली दिसते जबाबदार आमची पिढी आहे हे मी का म्हणतो  मला आठवत कि माझ्या आजोबांच्या पिढीतील (आज हयात असती तर १०० ते १२० वर्ष्यांची असती)  म्हातारी माणसे  मरेपर्यंत सुधृढ  असायची.  माझ्या वडिलांच्या वयाची म्हणजे आज ७५ ते ९० व्र्ष्यांची जी पिढी हयात आहे त्यांत रोगांनी जर्ज्र्तेचे प्रमाण जास्त आहे. त्याहून आजच्या तरुण वयात सुद्धा हार्ट, मधुमेह, वात/ कंपवात आणि कर्क रोग अशा मोठ्ठ्या रोगांचे बळी होतांना दिसतात. त्याच वेळी दुसरीकडे देवाला सारख्या ठिकाणी माणसांचा ओघ वाढतोय आणि त्याच वेगाने रोगही वाढताहेत हि विसंगती मन विषनणं  करत होती त्यात वर दिलेलेल्या चार रोगान पैकी प्रत्येक रोगाचे बरेच रोगी पाहून त्याच्या मानासिक्तेमाद्ध्ये काय साम्म्या आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातील समीक भाग लिहून ठेवला. आणि त्या नंतर एक हौ तू हिल युअर लाईफ हे लुईस ल हे नावाच्या  बाईने लिहिलेले पुस्तक वाचनात आले. त्याने मी अत्यंत भारावून गेलो पुढच्या पिढीसाठी मला हे पुस्तक गीता दासबोध सर्व  काही  वाटले.  
हे ऐकून जरा विचित्र वाटेल पण हे असे का वाटले ते सांगतो आपण परमार्थाची कितीही बोंब आपण केली तरीही त्याचा प्रत्यक्ष परिणाम सामाजिकतेच्या दृष्टीने फारसा आशादायक नाही हे मानण्य करावेच लागेल. आणि स्वार्थ नाही तो परमार्थ हा सरळ सोत सत्य  नियम  विचारात घेतला तर एकीकडे  उत्सवाचे उधाण आणि त्याच बरोबर स्वर्थाचाही अतिरेक आणि त्याचे दुष्परिणाम प्रधान दिसतात. म्हणजे कुठे तरी चुकतंय हे नक्की. आपण आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतो. एकूण एक संतांनी परमार्थाचा प्रचार केला. स्वतः गरीब राहून समाजाला माणुसकीचा धडा देणाऱ्या संतांना आजचा समाज सोन्याने माद्ध्वतो ह्या पेक्षा वेगळी सामाजिक विकृती कोणती?  आणि मन मात्र सतत धुमसलेले दिसते. तेच करणा आहे आज माणसां मद्ध्ये  उद्भवणाऱ्या अनन्वित रोगांचे. हे आता शास्त्र सिद्ध झालेले आहे होत आहे ह्यात वाद नाही.  धुम्सलेली मन हि  स्वार्थाची  प्रतीक आहेत. संतांच्या मठात अनेक वाऱ्या करूनही त्यांची मूर्तीवर सोन्याचे मुकुथ घालूनही आमची  म न शांत नाहीत उद्विग्नाच आहेत. मग उपाय काय ?????
मी ठरवल परमार्थ करा म्हणण्याच्या ऐवजी स्वार्थच बारा  असे सांगितले तर??  आणि तो स्वार्थ प्रामाणिकपणे साधला तर??  परमार्थ घडेल??? असे म्हटले तर ऐकायला कसे वाटेल ??????    विचित्र ????         पण खरे आहे. स्वार्थ तर सुटता सुटत नाही मग तो तरी नीट साधावा.
मला माझ्या शरीराचा मोह विलक्षण आहे. त्याला त्याचा अहंकार आहे. त्याला राग येतो. लोभी तर मी आहेच  आहे काम हा माझा स्थायी भाव आहे आणि हे सर्व लपविण्याचा मी काठोकाठ  प्रयत्न करतो म्हणजेच मी दांभिक सुद्धा आहे ह्या सर्व गुणांच्या रसायनातून माझ्यात अनेक रोगांचे मिश्रण तयार होत आहे त्याला कोण काय करणार????? आणि मी जे जे म्हणून काही करतो ते सर्व ह्या शरीरासाठी करतो. मग त्याल उत्तम ठेवणे चागलेच  नाही का???  
माझे शरीर आजारी पडते कारण माझे मन चुकीचे विचार करते जर ते योग्य विचार करेल तर माझे शरीर निकोप राहायला नक्की मदत होईल. आणि कोणाचे हि मन निकोप झाले म्हणजे काय होईल ?????? अधिक  स्पष्ट करायची गरजच नाही निकोप मन / प्रसन्न मन हेच सिद्धीचे सागर असे स्वतः संत तुकाराम महाराज म्हणाले आहेत. संतांचे वचने  एव्हढ्यासाठी महत्वाची ---- कारण ----  ती अनुभवसिद्ध  असतात  निस्पृह  आचरणातून आलेली असतात. म्हणून त्रिकाला बाधित सत्य असतात. म्हणजे आता हे तर नक्की ठरले मला सुदृढ राहायचे असेल तर मानाने निकोप राहिले पाहिजे निकोप मनच खर्या अर्थाने पारमार्थिक असते हे हि निर्विवाद आहे.

मर्म ------ पुनर्जन्म

मर्म ------ पुनर्जन्म
सदर विषय व्यापक आहे. अव्याक्तातेचा असल्याने तर्काने साम्जाव्ण्यासही कठीण आहे. समाजात कोणत्याही अव्यक्त विषयाबद्दल जे अनेक गैर समज निर्माण होतात किंबहुना केले जातात त्या प्रमाणे ह्या विषायामाद्ध्येही स्वाभाविकपणे आहेत. ते मुळात दूर केल्या  शिवाय विषयाला हात घालता येणार नाही. त्यासाठी कदाचित मोठ्ठ्या प्रस्तावनेची गरजही लागेल. तेव्हा हा विषय ३-४ किंवा त्याहूनही अधिक भागात सदर करावा लागेल.
हा विषय घ्यावा किंवा नाही ह्या विषयी माझ्या मनात होकार व नकाराची अनेक वेळा द्वंद निर्माण झाली. कारण मर्मज्ञ मद्ध्ये लिखाण करतांना मी एक पथ्य प्रामाणिकपणे पाळले आहे ते म्हणजे
जे व्यासांनी श्री गणपती गजाननास सांगितले ते. श्री व्यास मुनींना साधनापुर्तीनंतर जे ज्ञान स्फुरले ते एव्हढे प्रचंड व वेगाने स्फुरत होते कि ते लिहिणे कठीण होते. त्यावर त्या शक्तीकदुनच संदेश आले कि ते लिहू शकणारा एकाच जण आहे तो म्हणजे श्री गजानन. म्हणून व्यासांनी श्री गजाननाला प्रार्थना करून आवाहन केले व माझ्यासाठी लेखणीस म्हणून काम करशील का? असे विचारले-विनंती केली. त्यावर श्री गजानन फाणले करीन पण सांगतांना थांबायचे नाही. थांबलास तर मी लिहिणे कायमचे बंद करीन. त्या वर श्री व्यास मुनी म्हणाले

समजल्याशिवाय लिहायचे नाही. काबुल? या वर श्री गाजनान्नानी स्मितहास्य करून ते कार्य स्वीकारले.

अव्यक्त विषयांबद्दल अनेकदा जे गैर समज निर्माण होतात ते व्यक्तिगत असतात उदाहरणार्थ शकून, अपशकून, द्रिष्ट, वगैरे बाबतचे गैरसमज हे बर्याचदा विविध प्रकारचे व परस्परांची विसंगत असे असतात व्यक्तिगतरित्या पसरतात. पण ह्या विषय बाबतचे गैर समज बऱ्याच वेळा समाज्यातील भोंदुगिरी करणारे, स्वतःला साधू, संत, गुरु वगैरे भासवून लोकांकडून मोठ्ठ्या प्रमाणात पसरवित असतात. त्यात अर्थातच बर्याचवेळा ते पसर्विनार्यांचा स्वार्थ असतो. अश्या वेळी अशा गोंधळलेल्या समाजाला तार्किक पद्धतीने एखादा विषय समजावून सांगणे अधिक अवघड होऊन बसते. कोणत्याही माणसाचे दुषित पूर्वग्रह पुसून टाकणे हि अत्यंत कठीण गोष्ट आसते. म्हणून हा विषय एक एक विचार समग्र सांगत वर्णन करावा लागणार आहे.
मग हा विषय कसा हाताळायचा हा प्रश्न पडला. कार्य कारण भाव हे लिखाण करतांना असे लक्षात आले कि कार्या कारण सर्व काही हा विचार करतांना भूतकाळातील करणे शोधता शोधता असा एक क्षण येतो कि याच्या मागे काय? कारण??? कसे कळणार.  कारण आत्ताच्या जन्मापर्यंत ठीक तरीही प्रश्नंची उत्तर मिळत नाहीत. तेव्हा त्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठीचे कारण म्हणजेच ह्याच जन्माचेच मुळात कारण काय ते शोधणे. म्हणजे ह्या जन्माआधी काही असे माझ्या हातून घडले आहे कि त्याचा परिणाम म्हणून मी हा आजचा जन्म उपभोगतोय. म्हणून त्याचे कारण पूर्व जन्मात जावून शोधणे आवश्यक आहे. तिथे काही या जन्मीच्या पूर्व घटनांवरून न मिळालेल्या प्रश्नांची उकल होते. हे खरे आहे का?
हा विचार व्यक्त करतांना कृपया आध्यत्मिक लोक मी कोण आहे हे शोधा. हे प्रत्येक सद्गुरू आपल्याला आवर्जून सांगत असतात, तो अध्यात्मिक मी इथे अभिप्रेत नाहीये एव्हढे ध्यानात ठेवावे. इथे मागचा मी म्हणजे माझा आत्ताच्या आधीचा जन्मात मी कोण होतो ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणे असे अभिप्रेत आहे. ह्याम्द्ध्ये कधी कधी एकापेक्षा जास्त जन्मांचा शोध घेऊन आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. प्रसंगी ती मिळतातही. ती कळली कि मन शांत होते यालाच कार्य करणात लीन होते असे म्हणतात.