हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग ८ वा
विधी १५ वा ------- ऐरणी पूजन / झाल ठेवणे, --- म्हणजे वराकडील सर्व ज्येष्ठ व्यक्तींवर जबाबदारी देणे.
केव्हा करावा ------ विवाह होमानंतर.
आवश्यक व्यक्ती -- गुरुजी, वधु-वरचे आईवडील, व दोघांच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती.
माहिती ------------ वधूच्या आईवडिलांनी कन्यादानाची सांगता वाराकुलाची वृद्धी व्हावी म्हणून उमम्हेश्वर व १६ दिव्यांची पूजा व ऐरणी दान करयचे असते. प्रार्थना झाल्यावर वधूच्या आईने क्रमाने वरच्या त्याच्या आईवडिलांच्या व वराकडील अन्य ज्येष्ठ व्यक्तींच्या मस्तकावर ब्लाउज पीस धरून त्यावर वडिलांनी दिव्याची परडी धरून झाल्यावर झाल (परडी) खाली ठेवायची वधूच्या आईने वरच्या आईला सौभाग्य वायन द्यावे. (ऐरणी पूजनाचा संकेत - वधूने १६ वर्ष नंतर माहेरी दीपपूजन करायचे असते. त्यालाच माहेर पूजन असे म्हणतात. तेव्हा वधूवरांनी वधूच्या माहेरी हि पूजा करून वधूच्या माहेरच्यांचा सन्मान करायचा) दुपारचे भोजन -- या वेळी वधु पित्याने वराकडील सर्वांना भोजनाचे निमंत्रण द्यावे. ऐरणी पूजनानंतर वराकडील वराचे आई वडील काका मामा मावश्या भाऊ आत्या आदि मानकर्यांचा आजी आजोबा यांचा योग्यतो मान करावा. दुपारचे भोजन करावे. वधु व वर व वराकडील मानाच्या व्यक्तींची खास पंगत, हि पंगत झाल्यावर वरच्या आई व मानाच्या अन्य व्यक्तींना सुपारी साखर व चांदीच्या लवंग देतात. विहिणीला साडी. व्याह्यांना चान्देचे भांडे वरच्या भाऊ, भावजय व अन्य मानाच्या व्यक्तींना योग्यतो मानसन्मान देतात. विशेष सूचना ---- उभय पक्षामध्ये जे ठरले सेल त्या प्रमाणे मानपान ऐरणी पूजनाचे वेळीच किंवा भोजनानंतर देतात.
विधी १६ वा -------- वधूची पाठवणी
केव्हा करावा ------- लग्न मंडपातील हा शेवटचा विधी
आवश्यक व्यक्ती --- वधु / वर, वरची बहिण करवली, वधूचे आई / वडील प्रत्येक वधूच्या आईवडिलांच्या आयुष्यातला गहीवार्णारा क्षण.
माहिती ------------- वधु-वरांना गौरीहाराजाव्ल बसवून वधूच्या आईने वधूची मालत्यांनी ओटी भरावी. दोघांच्या हातावर दही घालून खावयास सांगावे. वराचे उपरणे व वधूचा शेला यांच्या टोकांची वरच्या करवलीने गाठ मारावी व वराकडून वधूकडील ज्येष्ट व्यक्तींचा यथाशक्ती मानपान करावा. वराने गौरीहराच्या मखरात असलेली देवी व लाडूगडू घ्यावा व वधूसह स्वग्रही निघण्यापूर्वी सर्वांना दोघांनी नमस्कार करावा. व सर्वांचा निरोप घ्यावा. गौरीची मूर्ती उचलल्यावर त्या ठिकाणी वरमातेने साडी ठेवावी. देवीजवळ पूर्वी ठेवलेले सौभाग्य वायन व यावेळी ठेवलेली साडी से सर्व वधूच्या मामीला द्यावे.
विघी १७ वा -------- वराचे वधूसह स्वग्रही आगमन, गृहप्रवेश लक्ष्मी पूजन नाम क्षमी पूजन, नाव ठेवणे
केव्हा करावा ------- वधूसह वराचा ग्रह प्रवेश
आवश्यक व्यक्ती --- वधु/वर वराकडील घरची नातेवाईक. मुलीची पाठ राखीन/ आईवडील
माहिती ------------- ग्रह प्रवेश करतांना वधूने उंबरठ्यावर तांदळाने भरून ठेवलेले माप सांडवून मग घरात प्रवेश करावा. बरोबर आणलेल्या देवीची तांदूळ पसरून ठेवलेल्या ताटात ठेऊन पूजा करावी त्याचवेळी ताटात नववधूचे सासरचे नाव ताटातील तांदुळावर लिहावे, व देवी व नाम लक्ष्मी या दोघींची पूजा करावी. देवीला नवा दागिना घालावा. पूजा झाल्यावर वधूचे नाव सांगून साखर/पेढा घ्यावा. वधूची सासूने ओटी भरावी. वधूवरांनी देवांना व उपस्थित ज्येष्ट व्यक्तींना नमस्कार करावा. वराचे आईने सुनेला शालू द्यायचा असतो. तसेच अन्य दागीनही द्यायचा असतो. सुनमुख पाहणे --- या वेळी मुलाच्या आईने मुलगा व सून यांना आपल्या मांडीवर बसवून त्या दोघांचे आरश्यात तोंड पहावयाचे व दोघांना पेढा/ साखर भरवून तोंड गोड करायचे वरच्या आई वडिलांचा व काका मामा मावशी आत्या भाऊ भावजय व अन्य ज्येष्ठ व्यक्तींचा (आजी आजोबा ) योग्यतो मानपान करायचा सातो. या वेळी आईला दिलेल्या साडीला पोट झाकण्याची साडी म्हणतात. हा मानपानाचा कार्यक्रम आटोपल्यावर / सुरु असतांना वधूवरांनी घरच्या ज्येष्ट व्यक्तींना नमस्कार करावा. पेढे वाटावेत सुवासिनींना हळद कुंकू लाऊन वधूचे सासरचे नाव सांगावे.
विघी १८ वा --------- सर्व कार्यक्रम आटोपल्यावर --- देव देवल उठवणे, सूप पाखडणे
केव्हा करावा ------- घरी आल्यावर शेवटी समाप्ती -- पान आजकाल वधूच्या घरी करवयाचे हे सर्व कार्यक्रम हॉल वरच करतात.
आवश्यक व्यक्ती --- गुरुजी वधु/वर वराकडील घरची नातेवाइक आपापल्या घरी / अलीकडे एकत्र हॉलवर
माहिती ------------- आता वधु -वरांकडे ठेवलेले देवक उठवणे आईवडिलांनी देवक उठवणे. वराकडे वधूवरांनी त्यांच्या आईवदिलान्सामावेत देवाकाच्या पुजेस बसावे. देवक उठल्या नंतर कार्य समाप्ती निमित्त गुरुजींनी सूप वाजवून कार्य समाप्तीची घोषणा करावी. गुरुजींनी वधु वरांच्या पित्यांना कार्याप्रीत्यार्थ नारळ व आशीर्वादाचे तांदूळ द्यावेत. वधु-वरांच्या पित्यांनी गुरुजींची दक्षिणा देऊन त्यांची पाठवणी करावी. कार्य निमित्त आलेले पाहुणे स्वग्रही जाऊ शकतात. रात्री वधु-वरांची मीठ - मोहोर्या घेऊन द्रिष्ट काढावी
अशा रीतीने हे कार्य समाप्त समाप्त झाले ---- सर्व -----होतकरू---- तरुण तरुणींना हे वर्ष आपापल्या लग्नाच्या कार्याने संपन्न होवो. आपल्या सर्वांचे सहजीवन संसार सुखाचा आनंदाचा आणि समुद्धीचा होवो हिच शुभेच्छा
विधी १५ वा ------- ऐरणी पूजन / झाल ठेवणे, --- म्हणजे वराकडील सर्व ज्येष्ठ व्यक्तींवर जबाबदारी देणे.
केव्हा करावा ------ विवाह होमानंतर.
आवश्यक व्यक्ती -- गुरुजी, वधु-वरचे आईवडील, व दोघांच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती.
माहिती ------------ वधूच्या आईवडिलांनी कन्यादानाची सांगता वाराकुलाची वृद्धी व्हावी म्हणून उमम्हेश्वर व १६ दिव्यांची पूजा व ऐरणी दान करयचे असते. प्रार्थना झाल्यावर वधूच्या आईने क्रमाने वरच्या त्याच्या आईवडिलांच्या व वराकडील अन्य ज्येष्ठ व्यक्तींच्या मस्तकावर ब्लाउज पीस धरून त्यावर वडिलांनी दिव्याची परडी धरून झाल्यावर झाल (परडी) खाली ठेवायची वधूच्या आईने वरच्या आईला सौभाग्य वायन द्यावे. (ऐरणी पूजनाचा संकेत - वधूने १६ वर्ष नंतर माहेरी दीपपूजन करायचे असते. त्यालाच माहेर पूजन असे म्हणतात. तेव्हा वधूवरांनी वधूच्या माहेरी हि पूजा करून वधूच्या माहेरच्यांचा सन्मान करायचा) दुपारचे भोजन -- या वेळी वधु पित्याने वराकडील सर्वांना भोजनाचे निमंत्रण द्यावे. ऐरणी पूजनानंतर वराकडील वराचे आई वडील काका मामा मावश्या भाऊ आत्या आदि मानकर्यांचा आजी आजोबा यांचा योग्यतो मान करावा. दुपारचे भोजन करावे. वधु व वर व वराकडील मानाच्या व्यक्तींची खास पंगत, हि पंगत झाल्यावर वरच्या आई व मानाच्या अन्य व्यक्तींना सुपारी साखर व चांदीच्या लवंग देतात. विहिणीला साडी. व्याह्यांना चान्देचे भांडे वरच्या भाऊ, भावजय व अन्य मानाच्या व्यक्तींना योग्यतो मानसन्मान देतात. विशेष सूचना ---- उभय पक्षामध्ये जे ठरले सेल त्या प्रमाणे मानपान ऐरणी पूजनाचे वेळीच किंवा भोजनानंतर देतात.
विधी १६ वा -------- वधूची पाठवणी
केव्हा करावा ------- लग्न मंडपातील हा शेवटचा विधी
आवश्यक व्यक्ती --- वधु / वर, वरची बहिण करवली, वधूचे आई / वडील प्रत्येक वधूच्या आईवडिलांच्या आयुष्यातला गहीवार्णारा क्षण.
माहिती ------------- वधु-वरांना गौरीहाराजाव्ल बसवून वधूच्या आईने वधूची मालत्यांनी ओटी भरावी. दोघांच्या हातावर दही घालून खावयास सांगावे. वराचे उपरणे व वधूचा शेला यांच्या टोकांची वरच्या करवलीने गाठ मारावी व वराकडून वधूकडील ज्येष्ट व्यक्तींचा यथाशक्ती मानपान करावा. वराने गौरीहराच्या मखरात असलेली देवी व लाडूगडू घ्यावा व वधूसह स्वग्रही निघण्यापूर्वी सर्वांना दोघांनी नमस्कार करावा. व सर्वांचा निरोप घ्यावा. गौरीची मूर्ती उचलल्यावर त्या ठिकाणी वरमातेने साडी ठेवावी. देवीजवळ पूर्वी ठेवलेले सौभाग्य वायन व यावेळी ठेवलेली साडी से सर्व वधूच्या मामीला द्यावे.
विघी १७ वा -------- वराचे वधूसह स्वग्रही आगमन, गृहप्रवेश लक्ष्मी पूजन नाम क्षमी पूजन, नाव ठेवणे
केव्हा करावा ------- वधूसह वराचा ग्रह प्रवेश
आवश्यक व्यक्ती --- वधु/वर वराकडील घरची नातेवाईक. मुलीची पाठ राखीन/ आईवडील
माहिती ------------- ग्रह प्रवेश करतांना वधूने उंबरठ्यावर तांदळाने भरून ठेवलेले माप सांडवून मग घरात प्रवेश करावा. बरोबर आणलेल्या देवीची तांदूळ पसरून ठेवलेल्या ताटात ठेऊन पूजा करावी त्याचवेळी ताटात नववधूचे सासरचे नाव ताटातील तांदुळावर लिहावे, व देवी व नाम लक्ष्मी या दोघींची पूजा करावी. देवीला नवा दागिना घालावा. पूजा झाल्यावर वधूचे नाव सांगून साखर/पेढा घ्यावा. वधूची सासूने ओटी भरावी. वधूवरांनी देवांना व उपस्थित ज्येष्ट व्यक्तींना नमस्कार करावा. वराचे आईने सुनेला शालू द्यायचा असतो. तसेच अन्य दागीनही द्यायचा असतो. सुनमुख पाहणे --- या वेळी मुलाच्या आईने मुलगा व सून यांना आपल्या मांडीवर बसवून त्या दोघांचे आरश्यात तोंड पहावयाचे व दोघांना पेढा/ साखर भरवून तोंड गोड करायचे वरच्या आई वडिलांचा व काका मामा मावशी आत्या भाऊ भावजय व अन्य ज्येष्ठ व्यक्तींचा (आजी आजोबा ) योग्यतो मानपान करायचा सातो. या वेळी आईला दिलेल्या साडीला पोट झाकण्याची साडी म्हणतात. हा मानपानाचा कार्यक्रम आटोपल्यावर / सुरु असतांना वधूवरांनी घरच्या ज्येष्ट व्यक्तींना नमस्कार करावा. पेढे वाटावेत सुवासिनींना हळद कुंकू लाऊन वधूचे सासरचे नाव सांगावे.
विघी १८ वा --------- सर्व कार्यक्रम आटोपल्यावर --- देव देवल उठवणे, सूप पाखडणे
केव्हा करावा ------- घरी आल्यावर शेवटी समाप्ती -- पान आजकाल वधूच्या घरी करवयाचे हे सर्व कार्यक्रम हॉल वरच करतात.
आवश्यक व्यक्ती --- गुरुजी वधु/वर वराकडील घरची नातेवाइक आपापल्या घरी / अलीकडे एकत्र हॉलवर
माहिती ------------- आता वधु -वरांकडे ठेवलेले देवक उठवणे आईवडिलांनी देवक उठवणे. वराकडे वधूवरांनी त्यांच्या आईवदिलान्सामावेत देवाकाच्या पुजेस बसावे. देवक उठल्या नंतर कार्य समाप्ती निमित्त गुरुजींनी सूप वाजवून कार्य समाप्तीची घोषणा करावी. गुरुजींनी वधु वरांच्या पित्यांना कार्याप्रीत्यार्थ नारळ व आशीर्वादाचे तांदूळ द्यावेत. वधु-वरांच्या पित्यांनी गुरुजींची दक्षिणा देऊन त्यांची पाठवणी करावी. कार्य निमित्त आलेले पाहुणे स्वग्रही जाऊ शकतात. रात्री वधु-वरांची मीठ - मोहोर्या घेऊन द्रिष्ट काढावी
अशा रीतीने हे कार्य समाप्त समाप्त झाले ---- सर्व -----होतकरू---- तरुण तरुणींना हे वर्ष आपापल्या लग्नाच्या कार्याने संपन्न होवो. आपल्या सर्वांचे सहजीवन संसार सुखाचा आनंदाचा आणि समुद्धीचा होवो हिच शुभेच्छा