ब ----- राजयोग प्रवेश ----- अष्टांग योग --- १-यम, २-नियम, ३-आसन, ४-प्राणायाम, ५-प्रत्याहार, ६-धारणा, ७-ध्यान, ८-समाधी हि ह्या योगाची ८ अंगे आहेत.
राजयोग म्हणजे समाधी असे जणु समीकरण आहे म्हटले तर वावगे होणार नाही. समाधी हे शेवटचे अंग गूढ प्रांतात प्रवेश करते. समाधी पर्यंतची अंगे समजून घेण्यासारखी आहेत. समजण्यासारखी आहेत. साधना मात्र रोज नियमाने आणि कठोरपणेच करायला लागते. लटकेपणा औंशताहा हि चालत नाही. ह्याची इतर कोणत्याही योगाशी सांगड घालता येत नाही. म्हणूनच ह्या प्रकारची योग साधना संन्याश्यासाठीच आहे. त्याची पहिली ५ अंगे संसारी माणूस आचारु शकतो ----- किंबहुना ----- ज्याची आज सामाजिक स्वास्थ्यासाठी आज नितांत गरज आहे. माणसाला महंत होण्यासाठीहि ह्याची गरज आहे. त्यादृष्टीने मात्र हा योग महत्वाचा आहे म्हणून सविस्तर देणार आहे. पुढील २ अंगे आजकाल आपल्याकडे आचरण्याचा प्रघात आला आहे आजच्या काळातील हा सामाजिक मानिया आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण पहिल्या पाच अंगांची कठोर वृत्तीने आचरण सिद्धीता न करता ६वे व ७वे अंग पुढील कोणतीही अंगे आचरणे हे निरुपयोगी अथवा / किंवा / किंबहुना धोकादायक सुद्धा बनू शकते. पण आजच्या (समाजात पूर्वीची बुवाबाजी आणि आता गुरुबाजी प्रमाणेच) ह्या अंगांचा प्रचारहि जरा अवास्तव पणे होतो आहे. ह्याचे अर्धाचारण हे सुद्धा धोकादायक आहे. म्हणूनच हि माहिती एक लाल कंदील म्हणूनच मानवी. मन आणि शरीर दोन्ही समर्थ बनवायचे आहेत म्हणजे मानाच्या शक्ती पेलणारे शरीर बनवायचे आहे. त्यात मोठ्ठा भाग सुक्ष्मत्ला आहे व्यायामाने शरीर सुधृढ बनवणे आणि इथे शरीर सुधृढ बनवणे ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ब्रम्हचर्य हा ह्याची सुरुवात मद्ध्य आणि शेवट आहे. त्याला पर्याय नाही. इथे पास किंवा नापास ०% नाहीतर १००% मध्ये काही नाही. म्हणूनच साधनेतील चिवटपणा टिकवणे कठीण असते. कोणत्याही साधनेत मद्ध्ये काही वर्ग आहेत. पण त्याचा व्यावहारिक उपयोग असतो इथे अर्धवट करून फायदा नाही. असो सामाजिक भान म्हणून आपण ह्याचा अभ्यास करूया. शुभम भवतु.
No comments:
Post a Comment