Wednesday, 8 August 2012

देवत्व कल्पना समारोप

देवत्व कल्पना समारोप
आत्ता पर्यंत आपण देवत्वाच्या विविध कल्पना पहिल्या. त्यातून आपल्याला असे लक्ष्यात येईल कि देवत्व मानताना माणसाची मानसिकता व्यक्तिपरत्वे वेगवेगळी आहे. म्हणून प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टींना देव मानतो. म्हणजे प्रत्येक जण आपल्या कल्पनेत आपणच काही तरी ठरवतो, तो देव आहे असे मानतो असे दिसते. 
कारण ईश्वर (ईश्वरी शक्ती) तर एकच आहे तरीही अनेक प्रकारांना / गोष्टींना माणूस देव मानतो.
आणखीन एक गोष्ट लक्षात आली प्रत्येक जण वेगवेगळी कल्पना मांडून त्याला घट्ट पकडून ती कशी बरोबर आहे हे ठासून सांगत असतो. म्हणजे आपला देव आपल्या कल्पनेप्रमाणे बदलता म्हणजेच वेगवेगळा आहे असे दिसते. ह्याचाच दुसरा अर्थ देव एकच असला तरी मी माझ्या कल्पनेच्या बंधनात त्याला आपल्याला हवा तसा बांधून ठेवतो आणि दुस्र्यांनीही तसेच असावे करावे हि सुप्त इच्छा मनी बाळगतो. मुळात सर्वव्यापी ईश्वराला आपल्या चाकोरीत आपल्याच कल्पनेने बांधून त्याच्या कडे पाहतो. आणि अहंकार सोडून ज्या देवाकडे मन न्यायचे तेच मन आपल्या संकुचित कल्पनेच्या अहंकाराने भरून त्याच्या कडे जातो. आणि नेमके फसतो.
मी केलेल्या पोस्ट वर काही प्रतिक्रिया आल्या आहेत त्या शक्यतो त्यांच्याच शब्दात व जिथे पल्ल्हालिक आहे तिथे संशिक्प्त करून किंवा निव्वळ आशय आपल्या समोर मांडला आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आधी स्पष्ट शब्दात रेखांकित करून लिहिल्या आहेत
!!--- देव हि माणसाने निर्माण केलेली संकल्पना आहे देव आजवर कुणी पहिला नाही
##----- ह्याचा अर्थ देव पाहता येत नाही कारण पंचा महा भूतांची जाणीव ज्या पंच न्यानेन्द्रीयांनी माणसाला होते त्या पैकी कोणत्याही एका किंवा सर्व न्यानेन्द्रीयानी तो जनता येत नाही कारण तो पंच महा भुतांच्या पलीकडे आहे त्या हि पेक्षा शुक्ष्म आहे.
!!--- पण हे अद्भुत विश्व ज्याने कुणी निर्माण केले ती शक्ती म्हणजेच देव असे आपण म्हणू शकतो.
##----- ह्याचा अर्थ विश्वाच्या भव्यतेला आणि दिव्यातेला कारणीभूत होणाऱ्या शक्तीला मी देव मानतो
!!--- अस्थिरता अनिश्चितता पराधीनता ह्या जाणीवेमुळे संकटकाळी आधार म्हणून देव असावा असे मला वाटते त्या साठी देवावर श्रद्धा असावी आणि एक मस्तक झुकविण्यासाठी आणि दोन हात जोडण्यासाठी पुरतात.
## -----संकट कालचा आधार म्हणून मी देवाकडे पाहतो. तो संकटकाळी आपल्याला उपयोगी पडतो ह्या जाणीवेने मी त्याला देव मानतो पण मी आधी दमतो आणि मग त्याच्या पुढे नमतो. आणि दोन्ही हात बांधून शरण जातो पण तात्पुरते. तोंडाने म्हणतो अनंत अपराधी असा मी तुला अनन्य शरण आलो आहे. पण अहंकाराचा समूळ नाश झाल्याशिवाय अनन्न्यता शक्यच नाही.
!!--- मी एखाद्या व्यक्तिरेखेला देव मानतो त्या मागील माझी भूमिका काय आहे ? कारण काय आहे? --- प्रसंगानुरूप बदलते ----- सांगणे कठीण आहे. ##----- मी व्यक्ती रेखेला मानतो पण ती व्यक्ती रेखा प्रसंगानुरूप बदलते. ह्याचा अर्थ कोणतीही एक व्यक्ती देव म्हणून मी स्वीकारू शकत नाही म्हणजेच माझी देवा बद्दलची कल्पना नक्की नाही. पर्यायाने देवही नक्की नाही. अर्थात तो आहे कि नाही ह्या विषयी सुद्धा संभ्रम आहे असे ह्यातून दिसते. असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
##----- अर्थात हे वास्तव सुद्धा ढोंगी अस्तीकते पेक्षा नास्तिकता नास्तिकता मान्य करण्याचा प्रामाणिक पणा दर्शवते. अर्थात कोणत्याही ढोंगी माणसापेक्षा अशी माणसे ईश्वराच्या जवळ असतात ह्यात वाद नाही. ईश्वराकडे ढोंगाचा लवलेश हि चालत नाही. संकट त्यातून प्रयत्नांना आलेले अपयश त्यामुळे मिळालेली निराशा यातून अशा एका शक्तीला आपण आव्हाहन करतो त्याला आपले सर्वस्व अर्पण करतो. आपली मदत त्याच्याशिवाय कुणीच करू शकत नाही हि भावना. त्यामुळे परमेश्वर आपली इच्छा पूर्ण करतो. आणि त्या रूपावर आपण श्रद्धा समर्पित करतो. संकट कालचा आधार जो देतो तो मला देव वाटतो.
##----- आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी आपल्या स्वतःच्या शक्तीच्या अपूर्णतेच्या जाणीवेतून मी बाह्य शक्तीचा आधार शोधतो. अशा कोणत्या तरी शक्ती च्या मदती शिवाय आपल्याला यश येणे साक्यचं नाही हि जाणीव ठाम होते म्हनुये परमेश्वर आपली इच्छा पुरी करतो. म्हणजे माझी इच्छा म्हजेच वासना पूर्ण करतो त्याला मी देव मानतो. आणि मग त्याच्या रूपावर आपली शरद्ध समर्पित करतो.
!!--- ईश्वर कोणत्याही रुपात असला तरी तो आईच आहे        ##----- ईश्वर मला आई वाटतो कारण तो आई प्रमाणे माझे सर्व लाड पुरवणारा आहे, माझे अपराध पोटात घालणारा आहे. मृदू भाव आहे. आपले सर्व काही सहन करणारा आहे. प्रचंड धारण शक्ती असलेला असा आहे.
##----- माणूस वर्ण भेदाप्रमाणे शक्ती गुरु शिव उपासक असतो.     ##----- देव हा शक्तिमान आहे आणि त्याची उपासना केल्यास आपल्याला (काही प्रमाणात तरी) शक्ती प्राप्त होईल म्हणून मी त्याची उपासना करतो. ते करत असतांना मी माझ्या वर्णामुळे सहज असलेल्या वृत्ती प्रमाणे व ज्या प्रकारच्या शक्ती मला स्वाधीन व्हाव्यात अशी अपेक्षा आहे त्या प्रमाणे देव निवडतो आणि त्याची उपासना करतो.  
!!--- गणेशजी म्हणतात मी आदी, अंत,      ##----- गणेशजी - (देव) हा विश्वाची सुरुवात आहे आणि मीच शेवट आहे. आणि त्या मध्ये आपल्याला दिसणारा विश्वाचा प्रसारा मांडला आहे ज्याचे आपण एक भाग आहोत औश आहोत.  
!!--- परिस्थिती प्रमाणे भगवंत अवतार घेतो.     ##----- सामाजिक परिस्थिती प्रमाणे भगवंत अवतार घेतो कारण ती त्या त्या काळाची गरज असते. काही व्यक्ती जन्मतःच सिद्ध असतात त्यांना तप अर्चनाची गरज नाही.  
पूर्व जन्मानुसार प्रत्येक माणूस जिथे जसा जन्मायला हवा तसा जन्म घेतो. म्हणजेच पूर्व जन्मीच्या साधनेच्या कमी अधिक प्रमाणानुसार व कमीअधिक प्रती नुसार माणूस कमी अधिक शक्ती घेऊन जन्माला येतो. जो आपल्याला आपल्या पेक्षा जास्त शक्तिमान असतो त्याला आम्ही सिद्ध मानतो आणि आपल्याला जास्त उपयोगी पडतो त्याला मग आपण देवत्व देतो. अशा व्यक्तींना आणखी कोणत्याही साधनेची जरूर नाही असे आम्ही समजतो.
!!---  सायन्स हे अलीकडचे आहे अध्यात्म हे अनादी आहे.     ##----- सायन्स हे विश्वाच्या सुरवातीपासून आहे कारण विश्व आपले गुण घेऊनच जन्माला आले. त्या गुणांची माहिती शब्दात मांडणे म्हणजे सायन्स. ते माणसाला अलीकडे व्यक्त झाले. सायन्स हे भौतिकाचे नियम सांगते. भौतिक म्हणजेच पंचमहाभुते. माझा देह सुद्धा पंच महा भूतांचाच बनलेला आहे. अर्थात त्या सर्व पंच महा भूतांचे गुणधर्म माझ्यात असलेच पाहिजेत. जसे वस्तू ज्या धातूची बनलेली असते त्या वस्तूचे गुणधर्म त्या वस्तुत असतातच.  
##----- दृष्य देह म्हजे स्थूल देह आणि माणसाचे मन हे त्याच्या सूक्ष्म देह असते. देह पंच महा भूतानंचा आणि त्याचे गुण व गुणधर्म म्हणजेच माणसाच्या मनाच्या स्थिती / अवस्था. हे वास्तव आपण नेहमी अनुभवत असतो. म्हणजे पंच महा भुतांच्या मर्यादेत आपण आपली प्रगती करू शकतो विचार पूर्वक जराशीही अंध श्रद्धा न ठेवता.
##----- देह तर नश्वर आहे मन हि नश्वर आहे तरीही देहाच्या प्रगतीला मर्यादा आहेत पण मनाच्या प्रगतीला मर्यादा नाहीत. तसेच शक्ती हि अधिक व्यापक असते. मन हे पंचा महाभूतांच्या शक्तींचे एकत्रित स्वरूप आहे. कोणतीही शक्ती अदृश्यच असते तिचे परिणाम दृश असतात तेच मनाचे आहे. म्हणजेच मन दिसत नाही पण त्याचे परिणाम शरीरावर दिसतात चांगले / वाईट जसे मन असेल तसे.  
!!--- ईश्वर शुद्धतम आहे त्याला जाणण्यासाठी शुद्दतम व्हायला हवे. ##----- तो लोह्चुम्बाका प्रमाणे प्रत्येक चराचरास आपल्याकडे सतत ओढत असतो. पण आपल्या लोखंडी देहावर देहबुद्धीच्या अहंकारच गंज चढलेला असल्यामुळे आपल्याला त्याची ओढ जाणवतच नाही. आणि आपण त्याच्या जवळ जितके जायला पाहिजे तितके जात नाही.
तो गंज काढणे म्हणजे स्वतःला शुद्धतम बनवणे. म्हणजे स्वतःचे मन शुद्धतम बनवणे. हि क्रिया भौतिकात मोडते. ह्या साठी प्रयत्न करणे म्हणजेच साधना ती करणारा तो साधक साद्ध्य होते ते ईश्वर सान्निध्य आणि हे साधते तो सिद्ध पूर्वीच्या कली मनुष्य पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता सायन्स मद्ध्ये एव्हढी प्रगती नव्हती निसर्गाच्या हातातले बाहुले तो त्यामुळेच देव जन्माला आला.
!!--- मानले तर देव नाही मानल तर दगड.          ##----- तर मग हे जाणून घेणे आवश्यक आहे कि ह्या वेग वेगळ्या कल्पन्न्माद्ध्ये अशी कोणती गोष्ट आहे कि ज्यामुळे माणूस त्या कोणत्यातरी गोष्टीला देव मानतो ??? ज्या अर्थी देव वेगवेगळे आहेत त्या अर्थी मान्नार्याची भूमिका वेग्व्गली असलीच पाहिजे.

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ४-ड - चौथा प्रकार (तिसरा प्रकार) --- सजीवांचा उत्र्क्रांतीवाद -- दशावतार -- ९) बौद्ध १०) कलंकी

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ४-ड - चौथा प्रकार (तिसरा प्रकार) --- सजीवांचा उत्र्क्रांतीवाद -- दशावतार -- ९) बौद्ध १०) कलंकी 
हे बदल होत होत पुढे संहाराच्या जाणीवेतून एकदम विरक्ती, त्या त्या काळाची गरज ----- ९)बौद्ध   
शेवट आत्ता चालू असलेला अराजक, अस्थिर, द्विधा मनसस्थितीतील, माणूस ------------- १०)कलंकी 
ह्या सर्वांचा उंचावरून व त्रयस्त पणे विचार करता असे लक्षात येते कि पहिले ३ मुळात देह नाहीत पहिला अद्वैत-एकटा, दुसरया वृत्ती व तिसर्या निर्जीव पण निसर्गातील शक्ती आहेत. त्यांना मानव रूप कोणी कधी व का दिले ते कळत नाही. कदाचित निव्वळ अद्वैताची, वृत्तीची किंवा निव्वळ शक्तीची म्हणजे अव्यक्ताची उपासना मानत स्थिर होणे कठीण असल्याने त्यांना व्यक्त मानवी देह कल्पून त्यांना पूजणे सुरु झाले असावे. 
सजीवातील ज्या प्राण्यांना आपण देव मानतो तरी त्यांचे आजचे वास्तवातील स्थान मर्यादित दिसते. आज कलंकी हा अवतार  प्रकारचा कालखंड चालू आहे. बाकी सर्व देवांना आपण देवळात पुजतो. आणि कालान्कीला मात्र  आचरणात  आणतो  असे  आजचे  वास्तव आहे. बाकीच्या देवांचे आपण गुणगान करतो. कालान्कीचे गुण मात्र प्रत्यक्षात आचरतो. बाकीचं देवांची आपण पूजा करतो कालान्कीशी मात्र तादात्म्य पावून वावरत आहोत. त्यामुळे आपले खरे कोणते आणि खोटे कोणते हे आपणच तपासून पाहायला हे लेखमाला उपयोगी पडेल ह्याची मला खात्री आहे. 
काही तांत्रिक अडचणीन मुळे मी ९ दिवसांनंतर हा समारोप करत आहे. ७ जुलै ते २२ जुलै पर्यंत पुन्हा एकदा माझ्या लिखाणात खंड पडणार आहे. कारण माझेच मोतीबिंदूचे ऑपरेशन आहे. तो पर्यंत आपल्याला विचार करायला छोटीशी प्रश्नावली आपल्या समोर ठेवत आहे.  
अ) मी एखाद्या व्यक्तिरेखेला देव मानतो त्या मागील माझी भूमिका काय आहे? का र ण काय आहेत?
ब) मला देव हवा असे खरोखर मनापासून वाटते का? त्या साठी मी काय केले पाहिजे असे मला वाटते आणि ते मी करतो का?
क) माझ्या देवाकडून काही अपेक्षा आहे का? त्या पुऱ्या झाल्या का?
ड) देवत्व हे मी नेमके कुणाकुणाला बहाल करीन?
ई) मला देव हवासा वाटतो कि त्याने फक्त आपल्याला वेळोवेळी माझ्या जरुरी प्रमाणे उपयोगी पडावे असे मला वाटते? 
मला पूर्ण खात्री आहे कि ह्या प्रश्नान्नाची उत्तरे आपल्याला योग्य रीतीने अंतर्मुख करतील आणि आपली ईश्वराला भेटण्याची खरोखर इच्छा असेल तर आपल्या मनातील यात्रेला सहाय्यभूत ठरतील. शुभम भवतु.   

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ४-क - चौथा प्रकार (तिसरा प्रकार) --- सजीवांचा उत्र्क्रांतीवाद -- दशावतार -- ५) वामन, ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण ९) बौद्ध १०) कलंकी

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ४-क - चौथा प्रकार (तिसरा प्रकार) --- सजीवांचा उत्र्क्रांतीवाद -- दशावतार -- ५) वामन, ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण ९) बौद्ध १०) कलंकी 
पाहिया ४ प्रकारातील प्रगती हि शारीरिक दिसते. आणि इथून पुढची उत्क्रांती बौद्धिक व मानसिक आढळते.   
पहिला मानव देही --------५)वामन - बुटका माणूस. पिग्मी. सजीवाच्या उत्क्रांतीतील मानवी देहधारी पहिला प्रकार. इथे मानव देह आहे. पण त्याहून अधिक काही प्रगत पण दिसत नाही. 
नंतर बौद्धिक -------------- ६)परशुराम --- बौद्धिक उत्क्रांती, मानसिक दृष्ट्या तामसी. परशुरामाच्या बाबतीत बौद्धिक प्रगती परिपूर्ण झालेली आढळते, पण वृत्ती  मात्र तामसी  म्हणजे  शंकरसारखी आढळते.     
मग मानसिक ------------- ७)राम ------- बौद्धिक, अधिक मानसिक उत्क्रांती (तामसी ते  राजस ते सात्विक) पण सत्व प्रधान. ह्या ठिकाणी वृत्तीत उत्क्रांती झालेली आढळते. श्री राम क्षत्रिय असून त्याची वृत्ती सात्विकता प्रधान आहे असे जाणवते. भावनिक तरलता हि आढळते. समाजाला स्वतः पेक्षा आधी प्राधान्य त्याने दिले आहे. आणि त्याच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे.  
पूर्ण पुरुष ------------------ ८)कृष्ण ------  बौद्धिक, मानसिक, दोन्हीचे अत्यंत संतुलन असलेला अहंकारावर स्वामित्व मिळवलेला परिपूर्ण पुरुष. पुद्धी आणि मन दोन्हीही अत्यंत परिपूर्ण व अत्यंत संतुलित अशी हि अवस्था दिसते. त्यामुळे तात्कालिक समाजात सहज पणे स्वामित्व मुलून गेलेला असा हा महापुरुष आहे     
ह्या प्रकारात असे लक्षात येते कि एखाद्या विशिष्ट काळात एखाद्या विशिष्ट समाजाला राक्षशी प्रवृत्तींच्या हुकुमशहांच्या  बंधनातून मुक्त करणाऱ्याला त्या त्या वेळचा समाज देवत्व बहाल करतो. म्हणजे तो त्या काळी त्या समाजाचा नेता बनतो. त्या कालचा समाज त्याला सहज पणे आपला नेता म्हणून स्वीकारतो. आधी कधी तात्काळ. किंवा पुढे तो ऐतिहासिक, किंवा पूर्ण पुरुष झाला कि त्याला समाज देवत्व बहाल करतो. आपला तारणहार मानतो. ईश्वर मानतो कारण तो समाजाच्या मुक्तीचे कारण ठरलेला असतो.    

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ४-ब - चौथा प्रकार (तिसरा प्रकार) --- सजीवांचा उत्र्क्रांतीवाद -- दशावतार --

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ४-ब - चौथा प्रकार (तिसरा प्रकार) --- सजीवांचा उत्र्क्रांतीवाद -- दशावतार --
२ रा अवतार- कूर्म (कासव) . ३ रा अवतार वराह (डुक्कर) हे दोन अवतार उभयचर आणि पहिला भूचर असे आहेत. ४ था अवतार नारसिंह
ह्या दोन पैकी  कासवाला आपल्याकडे कायम स्वरूपी देवत्व बहाल केले गेले आहे असे दिसते. आणि ते  कारण त्याचा  स्वतःच्या  इंद्रियांना  आवरण्याचा  गुणधर्म. हे पारमार्थिक साधनेसाठी लागणारा प्रधान गुण असल्यामुळे हि स्वीकृती जाणवते. वराह अवतरला  मात्र  फारसे  महत्व दिले गेलेले दिसत नाही. नारसिंह अवताराच्या  मागे मात्र आपल्या सर्वांना माहित असलेले कथानक आहे. इथ पर्यंतची उत्क्रांती हि देहाची आहे. म्हणजे देहामधील प्रगती दिसते. हातपाय नसलेल्या प्राण्यापासून ते चारपाय आणि नन्तर दोन पाय दोन हात. एव्हढी उत्क्रांती झालेली दिसते. पाहिया ३ प्रकारात फक्त देही उत्क्रांत झालेला दिसतो पण चौथ्या प्रकारात तो मानवाच्या उपयोगी पडला सत्विकातेला आधारभूत ठरला म्हणून त्याला सुद्धा कायम स्वरूपी देवत्व बहाल केले गेलेले दिसते. त्या मानाने मत्स्य आणि वराह ह्या दोघांना देवत्व आहे पण समाजाने प्रधान स्थान दिलेले दिसत नाही. प्रत्येक पुढची पिढी हि पहिल्या पिढी पेक्षा प्रगत असते. हा सिद्धांत संपूर्ण सजीवाला लागू होतो. ह्यालाच अनुवंशिकता म्हणतात. एका योनीतून दुसरया योनीत जन्माला येणे ह्याला पुनर्जन्माचा सिद्धांत म्हणतात. पुनर्जन्म हे वास्तव आहे. प्राण्यांच्या बाबतीत प्रत्येक वेळी पुढील योनी हि पूर्वीच्या योनिपेक्षा प्रगत योनीच संभवते. कारण त्याच्या बुद्धीची झेप स्वसंराक्षानापुरतीच मर्यादित असते. जगण्यातील सुरक्षितता हा प्रधान भाव असतो. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रगत योनीत जन्माला येत येत माणसाचा जन्म घ्यायला सर्व च्या सर्व योनीतून जावे लागलेच तर ८४ लक्ष योनी म्हणजे सजीवांचे प्रकार आहेत त्यातून जावे तेव्हा जीवाला मनुष्य जन्म येतो असे आपल्या हिंदू धर्म शाश्त्राचे म्हणणे आहे. म्हणूनच मानव जन्म दुर्मिळ आहे असे म्हणतात. त्याचे सार्थक करावे असे आपल्याला वारंवार संग्न्येत येते त्या मानव जन्माच्या उत्क्रांतीचे दर्शन पुढील भागात घेवूया.            
 

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ४-अ - चौथा प्रकार (तिसरा प्रकार) --- सजीवांचा उत्र्क्रांतीवाद -- दशावतार -- १) मत्स्य, २) कूर्म, ३) वराह, ४) नारसिंह,

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ४-अ - चौथा प्रकार (तिसरा प्रकार) --- सजीवांचा उत्र्क्रांतीवाद -- दशावतार -- १) मत्स्य, २) कूर्म, ३) वराह, ४) नारसिंह,
१ ला अवतार- मत्स्य.
आपल्याकडे ८४ लक्ष सजीव प्रकार आहेत, अशी कल्पना आहे. त्यांची प्रगती सुद्धा जलचर - उभयचर -- भूचर अशा क्रमाने झालेली आहे आणि हे आजच्या विज्ञान प्रधान युगालाही ज्ञात आहे मान्य आहे. त्यातील बदलत्या टप्प्यातील शेवटचा टप्पा हा आपल्याकडे देवत्व मानला गेलेला दिसतो. म्हणजे जालाचारातील अंतिम प्रगल्भता लाभलेला टप्पा मत्स्य. मत्स्याच्या पुढची पायरी उभयचर त्यातील अंतिम प्रगल्भता लाभलेला टप्पा २ रा अवतार कूर्म. ३ रा भूचर वराह व ४ था नरसिंह हे रूप मात्र विज्ञानाच्या उत्क्रांती वादाशी थोडे वेगळे दिसते. मिश्र भावी दिसते.  
ह्या उत्क्रांती वादाच्या मागची मानसिकता काय असावी ह्याचा आता विचार करू. श्रुष्टीतील यच्ययावत सजीव (आणि निर्जीव सुद्धा) मुक्ती साठी तडफडत आहे. त्याच्या अनेक इच्छांपैकी मुक्ती हि मुलभूत इच्छा आगदी प्रत्येकात अखंड आहे पण त्या साठी आपल्याला नेमके काय घडले म्हणजे आपण मुक्त होऊ? आपल्याला मोकळे वाटेल? असा विचार ज्या ज्या वेळी मनात घर करतो त्या त्या वेळी त्याला न लाभलेली आणि हवी असलेली गोष्ट लाभली तर त्याला मुक्त वाटते, हि सहज प्रवृत्ती निर्माण होते, आगदी प्रत्येक सजीवत. हि मुक्तीची तीव्र इच्छाच त्याला उत्क्रांतीला मदत करते. त्याच्या पुढील जन्मात त्याच्या ह्या इच्छेतूनच त्याच्या प्रत्येक पूर्वीच्या योनिपेक्षा जरा उच्च योनी त्याला प्राप्त होते. ह्या बदलाचा वेग कमी असतो. कारण तो जन्म जन्मान्साठीचा असतो.  आपण प्रगत मानव विचार करू शकतो म्हणून ह्या मागच्या प्रगतीच्या आलेखाची आपल्याला नक्की कल्पना येऊ शकते. त्यातील महत्वाचे टप्पे म्हणजेच दहाव्तारातील पहिले ४ अवतार होत. ह्या टप्प्यात देहात बदल होत गेलेला दिसतो. हे होत असतांना. पहिला प्रकार नष्ट होत नाही. तर तो अस्तित्वात राहून पुढील प्रकार निर्माण होतो असे दिसते.   

मद्ध्ये पंच महाभूते हा एक प्रकार चुकून लिहायचा राहून गेला तो आता लिहितो आहे.

मद्ध्ये पंच महाभूते हा एक प्रकार चुकून लिहायचा राहून गेला तो आता लिहितो आहे.
ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३इ - तिसरा प्रकार --- पंच महा भुते  तिसरा प्रकार ----- पंचमहाभूते ----- १)पृथ्वी २) आप (पाणी) ३) तेज ४) वायू ५) आकाश. मी थोडा क्रम वेगळा देतो १) पृथ्वी २) आप (पाणी) ३) वायू ४) तेज ५) आकाश
ह्या नंतरचा कालखंड असा दिसतो कि मानवाने पंच महाभूतांना देव मानले आहे. हे देवत्व देतांना तो त्यांना मानव  रूप  देण्याचे  विसरला नाही. सूर्यदेव, वरुणदेव, वायुदेव, वगैरे. ह्या काळात मानवाची बौद्धिक प्रगती फारशी झालेली दिसत नाही. त्यामुळे ह्या शक्ती भौतिक अथवा नैसर्गिक कारणाने विकृत  स्वरुपात  प्रकट  झाल्यास, त्यांच्या  बद्दल मानवी मनात  भीती  असल्याचे जाणवते आणि त्यांचा कोप होतो अशा प्रकारची मानवाची धारणा दिसते. म्हणजे शक्तीने आपल्या पेक्षा प्रचंड  असलेल्या  ह्या पंच महा भूतान पुढे आपण पराधीन आहोत. आणि त्यांना कधीही दुखावता कामा नये. दुखावल्यास ते आपल्याला त्रास देतील म्हणजेच त्यांचा कोप होईल  हि भावना दिसते. आपल्या त्यांच्या पेक्षा लहान पणाची, कमीपणाची, कमी शक्तीची जाणीव  त्यांना देवत्व देवून  जाते असे दिसते. म्हणजे देवत्व मानण्याच्या करणान मद्ध्ये हे हि एक कारण आहे असे दिसते.        

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३-ड - दुसरा प्रकार --- गुण --- त्रिगुण --- साधना

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३-ड - दुसरा प्रकार --- गुण --- त्रिगुण --- साधना
आत्तापर्यंत पाहिलेल्या देवत्वाच्या संकल्पना स्वीकारतांना मानवाची विचारसरणी पुढील प्रमाणे दिसते.
१)आपले कर्तृत्व बजावतांना आपण कितीही काटेकोरपणे वागायचे ठरविले तरी 
कुठे तरी माणूस कमी पडतो ह्याची सुप्त जा
णीव. 
२)बुद्दीच्याही  पलीकडे  असे काही तरी आहे कि जे  आपल्यावर  कार्य करत आहे. ह्यातूनच आपल्यावर स्वामित्व गाजविणाऱ्या त्या अनोळखी शक्तीचे मोत्ठेपण 
आणि स्वतःचे कमीपण जाणवते.
३)त्या अज्ञात शक्तीचे मोठेपण व स्वतःचे कुठेतरी दुबळेपण. त्यामुळे घडलेली शरणागती.
४)आपल्या संसारासही हा उपयोगी पडेल असे वाटणे. संतत्ती, पैसा, जमीनजुमला, हे सर्व मिळवायला हि
 शक्ती आपल्या उपयोगी पडेल हि भावना.
५)मला संकटकाळी उपयोगी पडणारा. तो आपले संरक्षण करेल हि सुद्धा त्याच्या बद्दलची अपेक्षा आहे. कारण तो पालनकरता आहे अशी मानवाची श्रद्धा आहे.   
६) हि देवत्व स्वीकारण्या मागची मानवाची प्राथमिक भावना 
दिसते. म्हणून ह्या पालन कर्त्या विष्णूला देव म्हणून आपल्याकडील समाज जास्त प्रमाणात स्वीकारतांना दिसतो.  
७)हे स्वीकारतांना एक गोष्ट जा
णवते कि तो त्याला आपल्याला 
उपयुक्त आहे. त्याच्या पुढे जावून पाहिल्यास असे लक्षात येते कि त्याच्या संगतीत असल्याचे भासवल्याने माझ्या लौकिकात  भर परते हि जाणीव माणसाला होते आणि तो त्याच्या पूजेचे अवडंबर माजवायला लागतो.
८)पूजा हि वास्तविक ईश्वराशी अनुसंधान ठे
वण्याचा साधना प्रकार आहे. तो पूर्णपणे आंतरिक प्रवास आहे मानाच्या आतील प्रवास आहे. देहभाव सोडून आत्म भाव निर्माण करण्याची सा
धना आहे. पण  आम्ही बह्यालन्कारावर जास्त लक्ष देवून, जे साधन त्याच्या जवळ जाण्याचे आहे, त्याचा उपयोत त्याच्या पासून दूर जाण्यासाठी करतो. आणि हे माणसाच्या लक्षातच येत नाही. हा अध्यात्मिक भ्रष्टाचार आहे. 
९)मग त्यातून निर्माण होणाऱ्या विकृ
ती, म्हणजे आम्ही त्याच्या बरोबर व्यवहार सुरु करतो. त्याला पैशाने विकत घेवू पाहतो. आपल्या  लौकिकाचा उलट त्याच्यावर भर टाकू पाहतो. त्याला निरनिराळ्या रुपात आपल्या घरी आणून आपला लौकिक वाढविण्याचा प्रयत्न करतो
. नामाने मन पालातावयाचे (उन्मन करावयाचे) सोडून देह पालटायच्या मागे लागतो. हा धार्मिक भ्रष्टाचार आहे. 
१०)धर्म हा माणसाचे व्यक्तिगत, व्यावहारिक, सामाजि
क कर्तव्य सांगतो. तर परमार्थ 
हा माणसाचे मन संसारातून  काढून  ईश्वराकडे  लागण्याचे साधनाचे विविध मार्ग सांगतो. ते मनात अनुसरणे म्हणजे परमार्थ. म्हणूनच पुजेमाद्ध्ये मानसं पूजा हि सर्वोत्तम/सर्वश्रेष्ठ आहे. हीच खरीखुरी साधना. आहे त्याचे बाह्य स्वरूप हे संसार आहे आणि त्याचे अवडंबर हि त्याची विकृती आहे. 
ईश्वराचे अनुसंधान हा साधनेचा 
श्वास आहे, प्राण आहे, हा सर्व प्रवास मानाच्या आत आत खोल खोल करावयाचा आहे. ईश्वराकडे संसारतील त्रुटी पु
रविण्याची मागणी करण्यापेक्षा थेट त्यालाच मागायचा म्हणजे परमार्थ होय. शुभम भवतु.                    

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३-क - दुसरा प्रकार --- गुण --- ३) तामस

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३-क - दुसरा प्रकार --- गुण --- ३) तामस
३) म कार - तम - तामस - महेश/शंकर -----  नष्ट करणारा रागीट कारण राग आल्याशिवाय नाश करता येणार नाही. जे जे जन्मले  ते ते  नष्ट  झाले नाही तर नवनिर्मिती नाही. तामसगुणी. निरनिराळ्या वृत्तीचे कल्पनेने मानवी देह योजलेले आहेत. 
ब्रम्हा तीनही काळाचे भान असलेला म्हणून तीन तोंडे कल्पिली.
विष्णू अत्यंत धीरगंभीर पणे कर्तव्य पालन करणारा. नागावर आरूढ होऊनही शांत. 
शंकर तर क्रोधी म्हणजे तो क्रोध दोन डोळ्यातून बाहेर येण्याला कमी पडेल म्हणून कि काय त्याला तिसरा डोळा कल्पिलेला दिसतो. आणि स्वतःतील क्रोधाग्नी सहन होत नाही म्हणून सतत हिमालयात वास्तव. तो आग बाहेर सोडतो आणि सर्व भस्मसात होत हि कल्पना.  वास्तविक हा मानव  स्वरुपात  काल्पितांना, विरक्त, अत्यंत  त्याग स्वरूप, पूर्ण पणे निस्संग, असा कल्पिलेला आहे.  तरीही ह्या देवाबद्दल आपल्याकडे तो भोळा आहे. त्यामुळे तो लवकर वश होतो आणि मागेल ते देतो अशी एक भावना समाज मनात असल्या मुळे ह्या देवाचे  पूजन  विष्णू पेक्षा हि मोठ्ठ्या प्रमाणात होतांना दिसते. एका विरक्ताची पूजा संसारातील इच्छा अपेक्षा पूर्ण करण्या साठी केली जाते. हे समाज मानाच्या  विसंगतीचे  वास्तव आहे. तो आहे तसाच आहे समाज त्याला चुकीच्या पद्धतीने स्वीकारतो आहे असे दिसते. हे का? ह्याचे कारण मात्र कळत नाही. वास्तविक जो तो ज्याच्या त्याचं गुणानुसार पुजला जायला हवा पण तसे आपल्याकडे घडतांना दिसत नाही. हि विसंगतीच कदाचित सामाजिक विसंवादाचे कारण असू शकेल. हे म्हणजे ज्ञानेश्वर किंवा हनुमंताच्या नावाने बालान्तापानाचे  हॉस्पिटल  काढण्या  सारखे वाटते असो. आहे हे असे आहे. ओम शिवाय नमः तोच योग्य बुद्धी देवो.          
वृत्तींना मानवी रूपे देण्याचे नेमके का व कधी सुरु झाले हे इतिहास किंवा पुराणे  कुठेही नमूद करत नाहीत. पण त्याच बरोबर हे हि सत्य आहे कि सृष्टीच्या अस्तित्वासाठी सर्वच गुणांची सारखीच गरज आहे ह्या गोष्टीची जाणीव मात्र त्या कालच्या मानवी कल्पना करणाऱ्या मानवालाही होती ती आज लोप पावलेली दिसते. त्यामुळेच आज मात्र आपण त्या वृत्तींना उच्च नीच भेदाने स्वीकारतो. त्यातल्या त्यात उच्च नीच ठरवतो. आणि त्यामुळेच निसर्गाने देलेल्या देणगीचा  आपल्याला नीट वापर करता येत नाही.

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३-ब - दुसरा प्रकार --- गुण --- २) राजस

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३-ब - दुसरा प्रकार --- गुण --- २) राजस
२) उ कार - रज - राजस - विष्णू ----- पालनकर्ता, पालन करणे म्हणजे जबाबदारी आली आणि जबाबदारी आली कि गांभीर्य आलच म्हणून गंभीर -------- पालन कर्त्याच्या अंगी असणाऱ्या गुणांना राजसगुणी म्हणतात. देह, बुद्धी, मन, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, सर्वांचा विकास साधायचा हि जबाबदारी माणसावर आहे. त्यासाठी त्याच्या मनावर किती ताण येतो. स्वाभाविकच मनाला गांभीर्य येते. मग विश्व चालवणाऱ्या त्या परमेश्वरावर केव्हढी जबाबदारी असेल? आणि तो किती गंभीर असायला हवा. तसा तो नसेल तर आजच्या आपल्या राज्या/देशासारखी पूर्ण विश्वाची काय अवस्था होईल??? हि कल्पना आपण सहज करू शकाल. तरीही तो त्याचे नियम सोडत नाही. म्हणूनच त्याला कृपाळू म्हणतात. माणूस स्वतःचे कर्तव्य पालन करतांना पदोपदी त्याला एक जाणीव होते कि कुठे तरी त्याच्या भौतिक क्षमतेला मर्यादा येतात. १)आपले कर्तृत्व बजावतांना आपण कितीही काटेकोरपणे वागायचे ताराविले तरी कुठे तरी कमी पडतो ह्याची सुप्त जाणीव २)बुद्दीच्याही  पलीकडे  असे काही तरी आहे कि जे  आपल्यावर  कार्य करत आहे. ह्यातूनच आपल्यावर स्वामित्व गाजविणाऱ्या त्या अनोळखी शक्तीचे मोत्ठेपण आणि स्वतःचे कमीपण जाणवते. ३)हि वास्तवता स्वीकारूनच माणूस त्याला कळत  नकळत  शरण जातो. त्याला मोत्ठेपण बहाल करतो हेच अंतिम देवत्व होय. त्याच्याकडे मागणे मागायला लागतो. हि देवत्वामागची खरी-खुरी  पाहिली भावना दिसते. म्हणून ह्या पालन कर्त्या विष्णूला देव म्हणून आपल्याकडील समाज मानाने जास्ती स्वीकारलेले दिसते. ह्या पालन कर्त्या देवाला मात्र आपल्या समाजाने प्राधान्याने स्वीकारलेले दिसते. ४) पालन करण्याबरोबरच त्या देवा कडून संरक्षणाची अपेक्षा मानवाला असते. ५) तो जर प्रचंड सामर्थ्यशाली आहे, तर तो आपल्या गरजेला उपयोगी सुद्धा पडू शकेल, ह्या जाणीवेतून त्याच्या कडे माणूस आपल्या गरजा भागवण्यासाठी साहाय्य करावे, अशी प्रार्थना करायला हि विसरत नाही. 

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३-अ - दुसरा प्रकार --- गुण --- १) सत्व (पहिला गुण)

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३-अ - दुसरा प्रकार --- गुण --- १) सत्व (पहिला गुण)
गुण म्हणजेच वृत्ती --- १) सात्विक २) राजसी ३) तामसी ---  त्यांचे मानवाने कल्पिलेले दृष्य स्वरूप ब्रम्हा - विष्णू - महेश. 
ह्या देवत्वाच्या मूर्तीच्या कल्पना आपल्या सर्वांना परिचित आहेत ह्या मागच्या संकल्पनांचा आता विचार करू. ह्या दुसर्या प्रकारात वृतींचा विचार केलेला दिसतो, आणि त्या वृत्तींनाच देव मानले आहे असे जाणवते. अर्थात देवत्व देतांना त्यांना देह-रूप मानवी-स्वरूप द्यायला मानव 
विसरला नाही.   
१) अ कार  - सत्त्व - सात्विक - ब्रम्हा ----- निर्मिणारा, निर्मितीचा आनंद मिळाल्यामुळे सदा प्रसन्न राहणारा  सत्वगुणी. ह्या गुणालाच देव मानले. ह्याचे देह स्वरूप ब्रम्हदेव. पारमार्थिक दृष्ट्या माणसाने आपली वृत्ती तमसा कडून सत्विक्तेकडे नेणे हे अत्यंत महत्वाचे  आहे.  असे  जर आहे, तर समाजात ब्राम्हाची आराधना प्रधान असायला हवी. पण सामाजिक दृष्ट्या ह्या देवाची पूजा मात्र आपल्याला समाजात फारशी होत असलेली दिसत नाही. त्याचे प्रमाण अत्त्यल्प आहे. ह्याचाच अर्थ आम्हाला ह्या भावाचे --- सात्विकतेचे महत्व वाटत नाही !!असे म्हटले  तर  चुकीचे  होणार नाही!! सात्विकता नको म्हणजे त्याग नको, म्हणजे निस्वार्थी पणा नको. हे आजच्या आपल्या समाज मनाचे  वास्तव आहे. म्हणजे देवत्वाचा स्वीकार माणूस त्याच्या अपेक्षा/इच्छा/वासना ह्यांना पूरक असेल त्याचा देव म्हणून करतो. ह्यातून त्याचा उपयुक्तता वादी विचार स्पष्ट  होतो, असेही दिसते. अनेकेश्वर प्रकारातून हे सिद्ध होते कि माणूस सोयीने आपल्या उपयोगी असलेल्या गोष्टीला देव मानत आलेला दिसतो. मग जर मी सत्विकतेकडे  धुकूनही  बघत नाही. तर माझा  ईश्वराचा ध्यास दिखावू आहे? हे केवळ नाटक आहे?? असो पण वास्तव - आहे हे असे आहे. तरीही आपल्या सर्वानमद्ध्ये सात्विक वृत्ती उदय पावो हि सदिच्छा व्यक्त करतो. कि जे आपल्या स्वतःच्या आणि समाजाच्याही  हिताची आहे.  

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ह - पहिला प्रकार ओमकार - ओमकार पूर्ण

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ह - पहिला प्रकार ओमकार -  ओमकार पूर्ण  
ओमकार हि पाहिली देवत्वाची कल्पना आहे. आत्ता पर्यंतच्या विवेचनावरून लक्षात येईल कि प्रथम देवत्व हे ओम्काराला का दिले गेले आहे. उच्चार, ध्वनी,  भावना, विचार, ज्ञान, शक्ती, ह्या सर्व गोष्टी ज्या एकाच एक शब्दात  समाविष्ट झालेल्या आहेत, असा हा शब्द  असल्याने  स्वाभाविकच ह्याला प्रथम स्थान दिले गेलेले आहे असे दिसते. परंतु सर्वसामान्य माणसाच्या मनाला अव्यक्तावर म्हणजेच सुक्ष्मावर आपले  मन एकाग्र कारणे अवघड जाते. ह्याच एका कारणाने हिंदू धर्मात ध्यानासाठी जड, - देह-रूप अथवा मानव-स्वरूप स्वीकारण्याची पद्धत  आलेली  दिसते. ह्यातूनच  मुर्तीपुजेची  संकल्पना रूढ  झालेली  दिसते. म्हणजे अव्यक्त अशा ओमकार शब्दाला अनुरूप असे जड रूप देवून त्याला ध्यानाचे साधन - ध्येय बनवण्यात आले. अशी आहे हि पाहिली देवत्व कल्पना. त्याचे  रूपही  त्याच्या सारखेच  अव्यक्त असे कल्पिले गेले. ओमकार,  गणेश, गजानन, गणपती १४  विद्या  आणि ६४ कलांचा स्वामी. त्याला वंदन  करून  आज  देवत्वाचा  पहिला प्रकार पूर्ण करतो.          

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ग - पहिला प्रकार ओमकार - ओम्काराला साधार्मी शब्द संकल्पना.

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ग - पहिला प्रकार ओमकार -  ओम्काराला साधार्मी शब्द संकल्पना. 
वास्तविक ओम्काराला प्रतिशब्द नाही. पण आपल्याकडे देव देवता अनेक आहेत. जपासाठी राम हा शब्द प्राधान्याने वापरला जातो कारण  आता राम ह्या शब्दाचे ओम्कारशी साधर्म्य काय ते पाहू. राम ह्या शब्दाचा उच्चार अ च्या जागी - र+आ  -उ च्या जागी - आ - म च्या जागी म अशा प्रकारे होतो. याचा उच्चार हि ओम्कार समान आहे. ओम्कारात कंठस्थ, तालव्य, व ओष्ट्य अशी तीन अक्षरे आहेत ती  उच्चारतांना जीभ लागत नाही. इथे मात्र र शब्दासाठी जिभेचा वापर करावा लागतो. र करामुळे शब्दाला जोर येतो. असे  उच्चार  शास्त्राचा  विचार करतांना लक्षात येते. ह्याही पुढे जावून आधुनिक विचारांच्या काही लोकांचे   म्हणणे  आहे कि  ह्या राम शब्दा ऐवजी र्हीम म्हटले कि त्यातील र ला अकरा ऐवजी इकार व हकार जोडून म्हटला तर त्या मुळे होणाऱ्या आघातामुळे मूळ मन्त्र अधिक प्रभावी होतो. आणखीन  पुढे जाऊन विचार केला, कि असे लक्षात येते, कि, र्हीम शब्द  रहीम शब्दाच्या जवळ जातो. ओम - राम - र्हीम - रहीम.  अर्थात हे इतर शब्द हे अनेकेश्वर देवत्वाच्या  कल्पनेतून आले मूळ  अ - उ - म ----- ओम हा अव्यक्ताचे प्रतिक आहे. म्हणूनच हा आद्य व अंतिम मूलमंत्र आहे. ह्याचे चिंतन करून आपण सर्व त्याच्या स्थुलरूप पार्थिव महागणपतीची साधना करूया शुभम भवतु.

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-फ - पहिला प्रकार ओमकार - ओम्कारातील नाद संकल्पना

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-फ  - पहिला प्रकार ओमकार -  ओम्कारातील नाद संकल्पना 
विश्वात व प्रत्येक सजीव देहात एक अखंड नाद चालू असतो असे म्हणतात. त्याला अनाहत नाद असे म्हणतात. अनाहत  म्हणजे  आघाताशिवाय सतत चालू असलेला ईश्वरी नाद. जो विश्वाच्या अस्तित्वाचा अखंड स्वर आहे. ह्याच्या जवळचा भौतिक उच्चार ओमकार. ओम्कारच का?  ह्या शब्द/अक्षराच्या उत्पात्तीमागील कार्य कारण मीमांसा. ------ बाहेरून आघात होतो. जसे नाद हा घंटे माद्ध्येच आहे. बाहेरून आघात केल्यावर तो आपल्याला ऐकू येतो इतकेच. तीच अवस्था कलेची, ज्ञानाची आणि प्रतिभेची. कला, ज्ञान आणि प्रतिभाही आतून बाहेर येते. ह्या ज्ञान, कला, प्रतिभा, सर्वच  गोष्टी लोककल्याणाला पूरक  आहेत. ओमकाराची उत्पत्तीहि आतून बाहेर होते. हे आपण पूर्वी पहिलेच आहे. आतून बाहेर येणारा, आणि तो हि  अखंड  राहू शकणारा.  अनंत, न संपणारा (अन एंडिंग) असा हा एकाच शब्द/अक्षर आहे. म्हणून ह्याचे अनाहत नादाशी साधर्म्य आहे.  हा शब्द/अक्षर पवित्र आहे कारण फक्त आतून बाहेर येणारा,  फक्त  देणारा,  त्यागी.  अपेक्षा विरहिततेचे प्रतिक. म्हणूनच  हा सिद्ध मन्त्र हि आहे. म्हटले तर तीन अक्षरे पण उच्चार एकच म्हणून हा एकाक्षर मंत्र होतो आपल्याकडे राजयोगाच्या साधनेसाठी प्राधान्याने उपयोगात आणला जातो. 

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ई - पहिला प्रकार ओमकार - ओम्कारातील विचार/इच्छा शक्तीची संकल्पना

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ई - पहिला प्रकार ओमकार -  ओम्कारातील विचार/इच्छा शक्तीची संकल्पना 
प्रत्येक शक्ती हे एक पूर्ण वर्तुळ असते ती जिथून सुरु होते तिथेच येऊन परत मिळते तेव्हाच तिचा परिणाम व्यक्त होतो. हा भौतिक विज्ञानाचा सर्वांना माहित असलेला गुणधर्म आहे.  उदाहरणार्थ वीज. हेच तत्व विचारलाहि लागू होते.  विचार /व/ इच्छा हि सुद्धा अशीच एक शक्ती आहे कि ती जिथून सुरु होते इथेच परत येते.  हा भौतिकाचा नियम आहे. म्हणजेच  माझ्यापर्यंत बाहेरून आलेले प्रत्येक विचार हे मुळात माझेच आहेत. म्हणजेच माझा कोणी त्वेष करत असेल तर तो मुळात मीच करत आहे आणि नंतर तोच फिरून माझ्याकडे येत आहे. ह्याच कारणाने स्वतःचे चांगले करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे दुसऱ्याचे चागले चिंतने. हि संकल्पना अंतर्बाह्य साकार करणारा शब्द म्हणजे ओमकार. ओमकार हे हि एक पूर्ण वर्तुळ आहे. अ ते उ आतून निर्माण होवून बाहेर जावून पुन्हा उत्पत्ती ठिकाणी येवून संपणारे. आतून बाहेर येणारा, सदिच्छा दर्शक आणि म्हणूनच पवित्र. 

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ड - पहिला प्रकार ओमकार - ओम्कारातील वृत्ती संकल्पना

 ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ड - पहिला प्रकार ओमकार -  ओम्कारातील वृत्ती संकल्पना 
अ कार - निर्मिती - आनंद - सात्विक वृत्ती. कोणतीही व्यक्ती ज्या वेळी निर्मिती करते त्या वेळी तिची वृत्ती स्वाभाविक पणे सात्विक असते. गंभीर किंवा रागावलेल्या अवस्थेत निर्मिती होत नाही. आकार हा सात्विकतेचे प्रतिक आहे.      
उ कार - पालन करता, रक्षण करता - गंभीर - राजस वृत्ती. कोणत्याही व्यक्तीवर  जबाबदारी आली कि  जबाबदारीने  काम करतांना सहज गांभीर्य हे येतेच. त्याचा बरोबर कर्तृत्वाचा सार्थ अहंकारही असतो. कारण त्यामागे कर्तेपणाची कर्तृत्वाची जाणीव असते. ह्यालाच राजस वृत्ती म्हणतात. उकार हा राजस वृत्तीचे प्रतिक आहे.     
म कार - अंत, नाश - रागीट - तामस वृत्ती. राग आल्यावर माणसाला समोरचे बरोबर आहे का चूक आहे हे पाहण्याचे भान राहत नाही. राग हा सर्व काही जाळून टाकतो. म्हणून हा तामसी वृत्तीचे प्रतिक आहे. 
परमार्थात सत्व गुणाला विशेष महत्व आहे .कारण तो आदी आहे. म्हणजेच ईश्वरा पासून सुरु झालेला. म्हणून  अर्थातच  त्याच्या सर्वात जवळचा.   राजस हा मद्ध्य आहे तर तामस हि अंत आहे. म्हणूनच आपण त्या ईश्वराच्या जवळ जायचे तर आपल्यात त्याच्या सर्वात जवळचा सत्त्व गुण अत्यावश्यक आहे. पण इथे मात्र  तीनही गुणांनी युक्त असा, तीनही गुणांना सामावून घेणारा, असा ओम हा एकमेव एकाक्षरी शब्द आहे. कारण विश्व चालायचे असेल किंवा चालवायचे असेल तर एकच एक गुण असून चालणारच नाही. सर्व गुण हवेतच. म्हणून सर्व गुणांनी उक्त असून समतोल ढळू न देणारा असा हा ओमकार हा समतोल शब्द आहे, म्हणूनच सिद्ध मंत्रहि आहे.  

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-क - पहिला प्रकार ओमकार - ओम्कारातील भाव संकल्पना

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-क - पहिला प्रकार ओमकार -  ओम्कारातील भाव संकल्पना 
आकाराची उत्पत्ती कंठात होते. पहिला सहज स्वर. हा प्रथम निर्मिती दर्शक   आनंद हा त्याचा सहज भाव आहे. स्वरच कशाला पण एखादा माणूस जेव्हा कोणतीही नवनिर्मिती करतो, किंवा त्याच्या संशोधनातून जेव्हा त्याला काही नवीन गवसते तेव्हा त्यालाही असाच आनंद होतो. उत्पत्ती म्हणजेच निर्मिती. निर्मितीचा आनंद तोच ब्रम्हानंद. जब हम  पैदा हुवे जग हसे हम रोये - कबीर  
उकराची उत्पत्ती तोंडाच्या माद्ध्यात होते. तो आदीही नाही आणि अंत हि नाही. हा स्वर स्वाभाविकच गंभीर असतो. स्थिरतेचे प्रतिक. हा स्थिरतेचे प्रतिक आहे. पण हि स्थिरता राखण्यासाठी जपण्यासाठी जी काळजी घ्यावी लागते त्यामुळे गांभीर्य येते. आपल्यावर जेव्हा एखाद्या कार्याची जबाबदारी असते तेव्हा आपल्यातही गंभीर भाव  येतो.   स्थिती म्हणजेच गांभीर्य, तोच विष्णू हा पालनकर्ता म्हणून गांभीर्य हा त्याचा प्रमुख भाव आहे.   
मकाराची उत्पत्ती ओठावर होते ओम्कारातील शेवटचे अक्षर/ध्वनी अंत. एखादी गोष्ट नष्ट करायची असेल तर राग यावा लागतो. राग सर्व काही जाळून टाकतो. सर्व काही नष्ट करण्यास प्रवृत्त करतो. तोच शंकर - राग हा त्याचा भाव आहे.

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २ - अ - पहिला प्रकार - ओमकार-प्रस्तावना

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २ - अ - पहिला प्रकार - ओमकार-प्रस्तावना
श्री गणेशाला वंदन करून मला जे जाणवले ते मी आपल्या समोर मांडत आहे. आपल्या सर्वांना तो सिद्धी विनायक प्रसन्न होऊदे हीच त्याच्या चरणी प्रार्थना. 
श्री गणेश ओंकार ----- ओंकारामधील ध्वनी / उच्चार / भाषा शास्त्राची माहिती आपण विचारात घेणार आहोत. जे पूर्ण पणे भौतीकावर आधारित असूनही साधनेचे मूळ आहे. भौतिक आणि सूक्ष्म ह्यांना जोडणारा हा अत्युत्तम दुवा आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. म्हणून ह्याला पर्यायी शब्द इतर कोणत्याही भाषेत, जातीत, किंवा धर्मात, कुठेही नाही.
हे समजून घेण्यासाठी थोड्या प्रस्तावानेची गरज आहे. प्रथम हे लक्षात घ्या कि जगातील फक्त भारतीय भाषा उच्चार शास्त्रावर आधारलेल्या आहेत, बाकी कोणत्याही देशातील भाषा उच्चार शास्त्रावर आधारलेल्या नाहीत. त्यामुळे उच्चारातून निर्माण होणाऱ्या प्रत्येक ध्वनीला, आपल्या लिपीत स्वतंत्र अक्षर आहे. आपल्याकडील मुळाक्षरे हीच मुळात उच्चार/ध्वनी शास्त्रावर आधारित आहेत. म्हणजे १)ओष्ठ, २)दंतव्य, ३)मुर्घ्न्य, ४)तालव्य, आणि ५)कंठ्य ह्या पैकी तोंडात ज्या ठिकाणी स्वरांची निर्मिती होते त्या प्रमाणे त्या त्या प्रकारच्या अक्षरांचे गट केलेले आहेत. शिवाय अनुनासिक आहेत. आणि ह्या सर्वांवर स्वरांचे लेणे आहे ते म्हणजे बाराखडी अ ते अः मुख्य ५ स्वर अ, ई, उ, ए, ओ. व एकूण १२ स्वर प्रत्येक व्यंजन स्वरासाहित उच्चारले जातात. ----- ओमकार हाहि पूर्ण ध्वनी शास्त्रावर आधारलेला शब्द आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ओमकाराचा उच्चार करायला जिभेची गरज लागत नाही. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------  
०८/०६/२०१२ च्या ओमकार प्रस्तावना मद्ध्ये  ओष्ठ्य, तालव्य, मुर्घ्न्य, आणि  कंठ्य हे चार, उच्चार शास्त्रानुसार, अक्षरांचे प्रकार दिले आहेत त्यात --- !!! दंतव्य !!!--- हा एक प्रकार द्यायचा राहून गेला आहे तो इथे नमूद करतो,  मूळ  लिखाणात  हि  सुधारणा केलेली आहे. म्हणजे ई-बुक स्वरुपात देतांना पाच प्रकार दिलेले आहेत ह्याची कृपया नोंद घायवी  ---------------------------------------------------------- 
ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ब - पहिला प्रकार ओमकार -  ओम्कारातील ध्वनी शास्त्र - आकार-उकार-मकार 
ध्वनीचा आपल्या शरीरवर,  मनावर, तातडीने  परिणाम होतो.  त्यामुळे ध्वनीला आपल्या परमार्थ शास्त्रात फार महत्व आहे. ध्वनिपासून निर्माण होणारे भौतिकातील शास्त्र म्हणजे संगीत शास्त्र. स्वामी विवेकानंद म्हणत संगीत हा परमेश्वराकडे जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे. 
अकाराची उत्पत्ती कंठात होते. तो स्वर मोकळा असतो. ऐकून प्रसन्न वाटते.  निर्मिती चे प्रतिक. सात्विक वृत्ती. प्रसन्नता. चांगल्या गायकाच्या तोंडून आपण असा चांगला लागलेला, स्थिर, स्वर ऐकलात, तर गाणारयाला आणि ऐकणाऱ्याला स्वाभाविकच अत्यंत आनंद होतो. प्रसन्नता वाटते.   
उकराची उत्पत्ती तोंडाच्या माद्ध्यात होते. तो आदीही नाही आणि अंतही नाही. हा स्थिरावायला  विशेष  काळजी  घ्यावी लागते, कष्ट पडतात, अर्थातच गांभीर्य येते. गाणाऱ्याचा  भाव ऐकणार्याला जाणवतो.  धीर-गंभीर.     
 मकाराची उत्पत्ती हि ओठांवर आहे. मकार हे व्यंजन आहे - संपणारा स्वर. सर्वकाही संपल्याचे, नाशाचे प्रतिक. म्हणून उग्र राग, तामस. तरीही अ उ म हे एकत्रित म्हणताना, मकार हा निव्वळ व्यंजन रुपात न उच्चारता स्वरासाहित उच्चारला  जातो, त्यामुळे त्यातूनच पुन्हा स्वाभाविक आकार निर्माण होतो, आणि एक अखंड  चक्र आपण स्वेच्छेने चालू ठेवू शकतो.  --------------------------------------------------------------------------------------- 

देवत्वाच्या कल्पना

माझ्या सर्व मित्रांस व वाचकांस नमस्कार आजपासून हा नवीन विषय सुरु करत आहे. नेहमी प्रमाणे पूर्ण झाल्यावर तो ई-बुक स्वरुपात सदर केला जाईल   
ईश्वर / देवत्व कल्पना ----- १ - विविध कल्पना  
 
आपल्याकडे देवत्वाच्या ५ प्रकारच्या कल्पना आहेत. कल्पना असे मी अशासाठी म्हणतो, जो पर्यंत आपल्याला  एखादी गोष्ट स्पष्ट पणे जाणवत नाही तो पर्यंत आपल्यासाठी ती कल्पनाच असते. आणि मला अजून पर्यंत तरी देव जाणवलेला नाही म्हणून माझ्यासाठी तरी ती कल्पना आहे. 
पहिला प्रकार ----- ओंकार --- आकार, उकार, मकार --- पहिला एकाक्षरी शब्द - त्याचे काल्पनिक दृश स्वरूप गणपती. 
दुसरा प्रकार ------ गुण --- १) सत्व २) राजस ३) तामस --- म्हणजेच वृत्ती --- १) सात्विक २) राजसी ३) तामसी ---  त्यांचे काल्पनिक दृष्य स्वरूप ब्रम्हा - विष्णू - महेश.  
तिसरा प्रकार ----- पंचमहाभूते ----- १)पृथ्वी २) आप (पाणी) ३) तेज ४) वायू ५) आकाश. मी थोडा क्रम वेगळा देतो १) पृथ्वी २) आप (पाणी) ३) वायू ४) तेज ५) आकाश ह्या सर्वांचे काल्पनिक देवता चित्र अथवा  मूर्ती आपल्या  कडे अस्तित्वात  आहेत.  त्यांचे गुण पृथ्वीचा गंध - जाणण्याचे ज्ञानेंद्रिय नाक, पाण्याचा गुण रस (चव) - जाणण्याचे ज्ञानेंद्रिय  जीभ, वायूचा गुण स्पर्श - जाणण्याचे ज्ञानेंद्रिय त्वचा, तेजाचा गुण दृष्य - जाणण्याचे ज्ञानेंद्रिय डोळे, आकाशाचा गुण शब्द - जाणण्याचे ज्ञानेंद्रिय कान.    
चौथा प्रकार ----- सजीवांच्या उत्र्क्रांतीवाद --- म्हणजेच दशावतार १) मत्स्य, २) कूर्म, ३) वराह, --- ४) नारसिंह, ---
५) वामन, --- ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण, ---  ९) बौद्ध, १०) कलंकी (कली)(कल्की)
पाचवा प्रकार ----- युगपुरुष ----- महान पुरुष ----- कालपरत्वे समाजाला लाभलेले विविध प्रकारचे नेते. उत्क्रांतीवादाच्या मधील दशावतारांपैकी शेवटचे २ --- ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण,(कलंकी सोडून)  हे ह्याच प्रकारतहि येतात. ----------------------------------------------------------------------------------

Tuesday, 24 April 2012

राजयोग ह्या विषयाबद्दलची भौतिक मर्यादेतील सर्व माहिती आपण पाहिली. बहुतौशी लोकांमाद्ध्ये ह्या विषयाचे विशेष आकर्षण हे त्यातील सिद्धी आणि त्यातून दिसणारे चमत्कार ह्या बद्दलच असते. वास्तविक सिद्धी असणे हे नैसर्गिक नाही. त्यात पारमार्थिक तर काहीही नाही. पण सगळ्यात मोठ्ठा विरोधाभास आपल्याकडील समाज माना मद्ध्ये दिसतो, तो म्हणजे नेमके ह्या चमत्कारांनाच नमस्कार घडणे. हे त्या चमत्कारांना देवत्व देणार्यांचे आणि पर्यायाने सर्व समाजाचे दुर्दैव आहे, आणि ते सर्वांच्याच दृष्टीने खरोखरच धोकादायक आहे, नुकसानकारक आहे. सिद्धी येवून जातात आणि माणूस खऱ्या अर्थाने सिद्ध होतो, ज्ञानी होतो. स्वतःच्या व पर्यायाने समाजाच्या आणि म्हणूनच  जगाच्याहि  कल्याणाला  कारण  होतो. अशा व्यक्तीनबद्दल आदर असणे हे स्वाभाविक व अत्यंत योग्यच आहे. एखाद्या व्यक्तीला आदर्श मानणे हे अशासाठी करायचे असते कि त्यांच्या सारखे आचरण करून आपण त्याच्या सारखे बनण्याचा प्रयात करण्यासाठी. नाहीतर आदर्शाला काय अर्थ आहे. ती व्यक्ती जर खरोखरच  थोर असेल तर अशा लोकांमाद्ध्ये गुंतणार नाही. आणि लोकांनी केलेल्या अवास्तव  सत्कारांना बळी  जाणार  नाही. आणखी  एक गैर समज आपल्या समाजात आहे. तो म्हणजे त्या व्यक्ती मोठ्ठ्या होत्या. म्हणजे काय ? खरे म्हणजे हे आपण  आपली जबाबदारी  टाळणे  आहे. जर अशी एखादी फार मोठ्ठी गोष्ट आहे ती एखाद्याला करणे शक्य असेल, तर ती दुसरया माणसाला हि शक्य आहे. ईश्वरापुढे कोणीच  लहान मोठा नसतो. तर मग आपणही प्रयत्न करायला काय हरकत आहे. मुलभूत तत्वज्ञान साधे आणि सरळ आहे आपल्याकडे ते बऱ्याच वेळा  विपरीत करून सांगितले जाते आणि गूढ अतिगुढ भासवले जाते. तितके ते करणेच अशक्क्य आहे असे वाटावे. असे नक्कीच नाही फक्त आवश्यक ती पत्थ्ये पाळलीच पाहिजेत. त्या दृष्टीने मी शक्क्यते सर्व सावधगिरीचे कंदील दाखवून हा विषय सदर करण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडून  उदंड प्रतिसाद मिळाला आता नेहमी प्रमाणे काही दिवसांच्या विश्रांती नंतर कर्मयोग विचारात घेऊ जो आपण रोज आचरणात आणतो. पण  समजायला आणि समजवायला अत्यंत कठीण तो सुरु करणार. राजयोग हा आज पूर्ण झाला.
कुंडलिनी मार्ग मेरुदंड ----    कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर वेगवेगळ्या चक्रात/कमळात  प्रवेश करती झाल्यावर मिळणारी फळे  
१- आधार चक्र/कमल ---------- गुद आणि लिंग ह्यांच्या मध्ये {कुंडलिनी नावाची ब्राम्हशक्ती वास करते}---- ४ पाकळ्या ---- १-परमानंद, २-सहजानंद, ३-विरानंद, ४-योगानंद.
२- स्वधीस्थान चक्र/कमल ---- लिंगाच्या मुळाशी {हे कामशाक्तीचे स्थान आहे}---- ६ पाकळ्या --१- विनय, २- क्रूरपणा, ३- गर्वनाश, ४- मूरचा, ५- अवज्ञा, ६- अविश्वास  
३- मणिपूर चक्र/कमल --------- बेंबी मद्ध्ये {हे सूर्याचे स्थान आहे}---- १० पाकळ्या --- १- सुषुप्ती,(गाढ झोप) २- तृष्णा, ३- ईर्ष्या, ४- पिशुनता,(म्हणजे असलेले वा नसलेले दुसर्याचे दोष सुचविणे), ५- लज्जा, ६- भय, ७- दया, ८- मोह, ९- कषाय, (म्हणजे विषयासक्ती), १०- विषाद.
४- अनाहत चक्र/कमल ------ हृदयात {हे ओम्कारास्वरूप शंकराचे स्थान आहे}----- १२ पाकळ्या ---- १- चान्चाल्यानाश, २- प्रकट विकल्प, ३- पश्चात्ताप, ४- आशा, ५- प्रकाश, ६- चिंता. ७- समीहा (म्हणजे अनिष्ट निवारण्याची इच्छा), ८- समता, ९- ढोंग, १०- विकलता, ११- विवेक, १२- अहंकार. 
५- विशुद्धी चक्र/कमल ----- कंठात {हे भारती देवीचे स्थान आहे}---- १६ पाकळ्या --- १- ओमकार, २- उगदिथ, ३- हुंकार, ४- वशट, ५- स्वाहा,            ७- नमः, ८- अमृत, ९-ते-१५ षड्ज इत्यादी सात स्वर सा, रे, ग, म, प, ध, नि, १६- विष
            ५अ-ललना ------   घंटिका (जीव्हामुळ) ---- १२ पाकळ्या --- १- मद, २- मान, ३- स्नेह, ४- शोक, ५- खेद, ६- लुब्धता, ७- अप्रीती,
                                      ८- संभ्रम, ९- उर्मी, १०- श्रद्धा, ११- संतोष, १२- आरोधीता. 
६- आज्ञा चक्र/कमल ------- भुवयांच्या मद्ध्ये ----- ३ पाकळ्या ------ १- सत्व, २- रज, ३- तम.
            ६अ- मनःचक्र-- ६ पाकळ्या- १- स्वप्न, २- (अन्न) रसांचा उपभोग, ३- घ्राण, (गंध ज्ञान), ४- रूपदर्शन, (दर्शन), ५- स्पर्श, ६- शब्दबोध             ६ब- सोम चक्र-- १६ पाकळ्या ----- १- कृपा, २- क्षमा, ३- ऋजुता, ४- धैर्य, ५- वैराग्य, ६- धारणा, ७- आनंद, ८- हास्य, ९- रोमांच,                    १०- ध्यानामुळे येणारे अश्रू,  ११- स्थिरता, १२- गंभीरपणा, १३- उद्योग, १४- मनाचा निर्मळपणा, १५- उदारपणा, १६- एकाग्रता.           
७- शास्रादल चक्र/कमल ---- १००० पाकळ्या असलेले चक्र मस्तकात {हे अमृत धारण करणारे आहे} सायुज्ज्या मुक्तीचे कारण
 
(((२४ तासात माणसाचे सर्व सामान्न्य पणे २१६०० वेळा श्वासोचावास होतात. असे गोस्वामी ह्यंही म्हटले आहे.))) त्यातून १०८ मान्न्यांच्या जप माळेची  कल्पना आली आहे. १०८ गुणिले २०० म्हणजे २१६०० श्वाश होतात.
कुंडलिनी --- हा विषय तसा बराच प्रचलित आहे. आणि त्यावर बोलायचा माझा अधिकारही नाही. पण केवळ माहिती म्हणून देत आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी. ह्या पुढे ह्या विषयावर लिहिलेले सर्व लिखाण संग्रहित आहे.  सुरुवातीला अष्ट सिद्धी कोणत्या आहेत त्या देतो.
अष्ट सिद्धी १-अणिमा - आपल्या इच्छेप्रमाणे सूक्ष्म रूप धारण करता येणे. ----- २-महिमा - आपल्या इच्छेप्रमाणे मोट्ठे रूप धारण करता येणे. ----- ३-लघिमा - पिंजलेल्या कापसाप्रमाणे हलके होणे. ----- ४- गरिमा - खूप जड होणे. ----- ५- प्राप्ती - पाताळ ते ब्राम्हलोकापर्यंत सर्व वस्तूंचे प्रत्यक्ष आकलन होणे. ----- ६ - प्रकाम्म्य - इच्छेप्रमाणे अलौकिक गोष्टी घडवून आणण्याचे सामर्थ्य. ----- ७- इशात्व - संकल्प बलाने श्रुष्टी,स्थिती आणि प्रलय करण्याचे व चंद्र सूर्य इत्यादी ग्रहांना ताब्यात अनन्ण्याचे सामर्थ्य. ----- ८- वशित्व - लोक्पालासह सर्व लोकांना वश - ताब्यात आणण्याचे सामर्थ्य  ----- ह्या व्यतिरिक्तही काही सिद्धी प्राप्त होत असतात. उदाहरणार्थ दुसऱ्याच्या मनातले विचार समजणे. ----- कधी कधी शब्दही जाणणे ----- दूरचे ऐकू येणे ----- प्रकाश दिसणे ----- चांदण्या दिसणे ----- पुढचे मागचे कळणे म्हणजे भविष्य आणि पूर्वजन्म समजणे ----- वाचा सिद्धी म्हणजे आपण बोलू तसे घडणे ----- प्रचंड प्रज्ञा शक्ती म्हणजे कोणतीही गोष्ट तात्काळ जाणणे लक्षात येणे -----                  ******** हे लिखाण वाचून कोणीही आपले आपण प्रयोग करू नयेत*********      
विनायक" मला याबद्दल बऱ्‍याच वेळा अनुभव आला आहे. हल्ली माझी एकाग्रता थोडी कमी झाल्यामुळे तो येत नसावा. मी पुर्वी अर्धझोपेत असताना माझा देह सोढुन साधारण पाच फुटावरुन माझ्या देहाकडे पाहात होतो त्यावेळी ऐकीकढे आश्चर्य व ऐकीकढे मनात थोडी भिती वाटायची पण मग ते रोज सातत्याने काही दिवस घडत होतं मग थोडी मला त्याची सवय होऊ लागली. पण जसजस मी त्या गोष्टीकडे लक्ष देऊ लागलो तशी माझी अवस्था कमी कमी होत गेली. आता तो अनुभव येत नाही. यावर तुमच काय मत आहे?
नमस्कार  श्रीकांतजी    ----- १)आपल्याला  आलेले अनुभव असे सांगू नयेत त्या मुळे पुढे ते येत नाहीसे होतात. २)पुढे येणारे अनुभव वेगळे असू शकतात. ३)प्रत्येक माणसाचे अनुभव वेगवेगळे असे शकतात. ४) हे अनुभव म्हणजे वाटेतले मैलाचे दगड आहेत एव्हढेच ह्याचे महत्व आहे. 
५)समजा आपण एखाद्या प्रवासाला  चाललो आहोत  आणि वाटेत अश्या काही खुणेच्या गोष्टी दिसल्या तर तिथेच थांबत नाही ना. तसे केले त प्रवासच थांबेल. नेमके तसेच आपले होते. त्या  खुणेच्या दगडालाच किंवा गोष्टीलाच आपण कवटाळून बसतो आणि आपले पुढे जाणे थांबते.  ६)जुन्या आलेल्या  अनुभवाचीच  ओढ  लागते म्हणजे आपण त्याच त्या मागील  खुणेशी रेंगाळण्याची मनीषा नकळत धरतो. ७)ती खुण तर मागे निघून गेलेली असते. ती पुन्हा पहावयाची असेल तर पुन्हा मागे जावे लागेल.  ८)जो पर्यंत  माझी तीच ती जुनी  खुण मनातून जात नाही तो पर्यंत प्रवास थांबलेलाच असतो. ९)प्रवासाला जाऊन आवश्यक त्या आपण ठरवलेल्या ठिकाणाला  भेट देवून आल्यावर त्याचे अनुभव लोकांना  सांगतो  तेव्हा तसा प्रवास त्यांना करायचा असल्यास त्यांना आपले अनुभव उपयोगी पडू शकतात. १०)पण इथे तर प्रवास नुसता सुरु झाला आहे. म्हणजे जे ठिकाण पाहायला निघालो आहोत ते खूपच  दूर आहे. आणि शाग्ल्यात महत्वाचे १२)असे अनुभव आल्यामुळे आपण इतरांपेक्षा काहीतरी मोट्ठे आहोत वेगळे आहोत हा अहं भावच जास्त होतो आणि मग तर पुढचा प्रवास पूर्णपणे खुंटतो. 
 ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर आपल्याला वास्तवाचा अंदाज आला असेल. हा आपलाच प्रश्न आहे असे नाही सर्वच जणांचा हा सामायिक प्रश्न आहे. प्रत्येक अशा प्रकारचा अनुभव आलेल्या व्यक्तीस ते लोकांना सांगायची विनाकारण गाई झालेली असते. तसे केल्याने नेमकी मानसिक गती कशी थांबते ते मी इथे सविस्तर सांगितले आहे हे सर्वांसाठीच उपयुक्त आहे.म्हणून आज पोस्ट म्हणून टाकत आहे. शुभम भवतु.         
८ समाधी --- एखाद्या गोष्टीवर दीर्घ काल मन एकाग्र होण्याची सवय दृढ झाली कि मग त्या गोष्टीच्या अर्थावर मन एकाग्र करणे जमले म्हणजे समाधी. हि अवस्था पूर्णपणे अनुभवायची आहे. कोणीच कुणाला सांगू शकत नाही सांगता येणार नाही आणि सांगून समजणार  नाही.  मन एखाद्या गोष्टीवर एकाग्र करणे (धारणा) तिथे दीर्घ काल ठेवणे (ध्यान) आणि त्या गोष्टीच्या अर्थावर मन स्थिर करणे आणि दीर्घ काल ठेवणे म्हणजे समाधी. धारणा, ध्यान, आणि समाधी सर्व एकत्रित साधते त्याला संयम म्हणतात. मन ज्यावेळी अर्थावर एकाग्र  होते त्यावेळी स्थिर मन म्हणजे काय ह्याचा अनुभव  येतो.  तो ज्याचा त्याने अनुभवायचा असतो. कारण तो व्यक्ती  परत्वे वेगवेगळा असतो. पण सामान्न्य अनुभव, जर कोणता असेल तर आनंद आणि प्रसन्नता पुढे दीर्घ काल अनुभवणे. समाधीचा कालखंड म्हणजे कमीत कमी सुमारे अर्धा तास तरी (२८.८ मिनिट) एकाग्रता टिकली/राहिली पाहिजे. अर्थात वेळ पाहत झालेली एकाग्रता काही कामाची नाही. ती मुळात एकाग्रताच नव्हे.  ताल्लीनातेतून  बाहेर आल्यावर तो कालखंड अर्ध्या तासापेक्षा जास्त असेल तर आपल्याला असे समजायला हरकत नाही कि आपण पुढे प्रगती करू शकतो.  इच्छित ध्येयाकडे व त्याच्या अर्थाकडेही मन पूर्णपणे स्थिर होणे, एकाग्र होणे, म्हणजे समाधी. समाधीचे प्रमुख दोन प्रकार १-सविकल्प  समाधी २-निर्विकल्प समाधी. सविकल्प  समाधीत माणसाला भोवतालच्या गोष्टीचे किंवा मनात येणाऱ्या इतर गोष्टींचे भान असते पण तिकडे  लक्ष न जात तो  आपल्या ठरवलेल्या  गोष्टीकडेच मन केंद्रित करू शकतो. आपण ह्या प्रकारचा अनुभव भौतिक कार्य करतांना बऱ्याच जणांनी घेतलेला असतो. आपण आपल्या कामात व्यस्त झालो कि बाह्य जग विसरतो. हि पण एक प्रकारची सविकल्प समाधिच आहे. थोडक्यात मी असे  म्हणेन सर्वसामानन्य माणसाला वर्णन करून सांगितल्यास कि सविकल्प समाधीची कल्पना येवू शकते. हे अनुभवाची तुलना करण्या साठी सागतोय. पण मनाने मनावर मन एकाग्र करून हा अनुभव घेणे आणि संपूर्ण विश्वाचा भाव मनातून नष्ट होणे. हा अनुभव सांगता येत नाही.
निर्विकल्प समाधीत कोणतेच विचार राहत नाहीत संपूर्ण शांत म्हणजे नेमके काय ह्याचा हि अनुभव येतो. पूर्ण रिकामे मन अहं चा बोध पूर्ण नष्ट होणे. पण ह्या पलीकडे हि बरेच काही असते कि जे ज्याचे त्याने अभ्यासायचे आहे. शुभम भवतु.
आत्तापर्यंत अष्टांग योगाचे ५ बहिरंग आणि ३ अंतरंग ह्याच्या स्थूल गोष्टींचा विचार केला. ह्या सर्वाची परिणीती कुंडलिनी जागृतीत होते. प्रेम,  भक्ती, कर्म, ज्ञान, आणि राज ह्या पांचही मार्गाचे अंतिम ध्येय परिणीती कुंडलिनी जागृतीच  आहे. पण राजयोगाच कुतूहल सर्वसामान्य माणसाला जास्त आहे कारण त्यात चमत्कार अनुभवायला येतात. वास्तविक तो भाग दुर्लक्षित करावयाचा आहे.   
पुढे त्या बाबतची संग्रहित माहिती देणार आहे.        ******** हे लिखाण वाचून कोणीही आपले आपण प्रयोग करू नयेत*********       
७ ध्यान --- एकाग्र मनाने ईश्वराची प्रार्थना करणे. प्रत्त्याहाराने मनाला आपल्याकडे आणणे आणि मग त्याला हवे त्या विषयावर केंद्रित करणे म्हणजे धारणा. धारणा स्थिर झाली कि ध्यान होते त्याचे कालमापन मी पूर्वीच दिले आहे. मनाला बाह्य विषयावर केंद्रित करणे फारसे  कठीण नाही. कारण ती त्याला सवयच असते. त्या पासून सुरुवात करून तिथे त्याला दीर्घ काल स्थिर ठेवता आले कि पुढे त्याला स्वतःच्या  शरीरातील एकेका अवयवावर केंद्रित करायची सवय करायची. हा सगळा प्रकार सवयीने करता येतो पण रोज अभ्यास करायला हवा. आपण  डॉक्टर कडे जातो तो आपल्या शरीर कुठे काय गडबड झाली आहे ते पाहून निदान करतो पण त्याला स्वतःच्या शरीरात काय चालले आहे ते माहित नसते. इथे आपण आपल्या शरीरात काय चालले आहे ते शोधायचे आहे. प्रत्येक अवयवावर  मन केंद्रित करून  स्नायूंवर मन केंद्रित करून त्याला जाणून आपल्या इछेच्या ताब्यात आणायचे आहे. स्वाधीन करायचे आहे. काही दिवसापूर्वी एका फेस बुक  मित्राने विचारले, काही अनावश्यक विचार मनात येत आहेत ते काढून टाकू का? खरतर प्रश्न सोपा सरळ आहे उत्तर पण सोपे सरळच आहे पण ते कृतीत आणणे  किती  अवघड आहे? मी त्याला सांगितले, जरूर, पण जमले तर मला नक्की सांगा. तांदुळातील खडे निवडणे सोपे आहे पण मनातील खडे निवडणे  खूप कठीण आहे. अहो नाहीतर सगळे राजयोगीच झाले असते नाहीका. दुसरे काहीच नको. पण तेच अत्त्यंत कठीण आहे. म्हणूनच त्याचा अभ्यास प्रदीर्घ काल करावा लागतो. ते जमण्याचा कालखंड व्यक्तिपरत्वे वेगळा आहे. पुनरावृत्तीचा दोष स्वीकारून लिहितो आहे कि स्वामी  विवेकानंदानी त्यांच्या मित्राच्या ""ह्या (श्री रामकृष्ण परमहंस) अशिक्षित माणसाला तू आपला गुरु का केलास"" ह्या, प्रश्नाला उत्तर दिले आहे कि, ""माणसाचे मन  बदलण्याची  क्षमता फक्त ह्या मनासात होती म्हणून मी ह्यांना गुरु केले."" म्हणजे मन आवरणे त्याला हवेतीथे केंद्रित करणे  हे किती कठीण आहे ह्याची कल्पना येईल. हे करणे म्हणजेच राजयोग. कि ज्या मार्गाने दुसरीकडे कुठे हि न पाहता फक्त आणि फक्त मुक्तीच्या  मार्गाची कास धरणे आहे.             ******** हे लिखाण वाचून कोणीही आपले आपण प्रयोग करू नयेत*********       
६ धारणा --- चित्त स्थिर ठेवणे. प्रत्याहाराच्या अभ्यासाने मनाला अंतर्मुख होण्याची सवय लागली कि त्याला एकाग्रतेची सवय लावायची आहे. मन १२ सेकंद एकाच एका ध्येयाकडे स्थिर राहू  शकले कि झाली एक धारणा.(त्याच्या १२ पट म्हणजे १४४ सेकंदाचे (२.४ मिनिट) एक ध्यान, व त्याच्या १२ पट म्हजे १७२८ सेकंदाची (२८.८ मिनिट)एक समाधी)  मन वधाल वधाल उभ्या शेतातल ढोर किती हाकला हाकला फिरून येत पिकावर हे जा संत बहिनाबींनी वर्णन केल आहे त्याचा अनुभव आपल्या   सर्वांनाच आहे. हे म्हणजे आवळ्याची मोट बांधणे, वारा मुठीत पकडणे, आणि पारा चिमटीत पकडण्या सारखे आहे सर्व्सामान्न्या माणसासाठी. हे फक्त सवयीने होते होऊ शकते. कारण मन हे जसे भौतिक सुखाचा गुलाम आहे तसेच ते सवयींचाही गुलाम आहे. हवी तशी सवय लावणे  म्हणजेच अभ्यास करणे होय. हा अभ्यास करण्यासाठी माणसाला कल्पकतेची मदत होऊ शकते. प्रत्त्याहारात त्याला आपल्याकडे आणायचे आणि इथे ते हवे त्या ठिकाणी एकाग्र करायचे. त्याला धारणा म्हणतात. कारण मन त्याला आवडत्या ठिकाणी नेहमीच एकाग्र होते पण नावडत्या टिकाणी त्याला एकाग्र करणे असेही अत्यंत कठीण आहे. अशा वेळी आपण ठरवलेल्या ध्येयाकडे वळवणे हा हि अभ्यास करावा लागतो. नावड सुद्धा सवयीने आवड होते. हा हि मनाचाच एक गुणधर्म आहे त्याचा उपयोग करू त्याला योग्य त्या ठिकाणी एकग्र व्हायची सवय लावायची. ह्या साधनेत मनाला  शरीरातील  निरनिराळ्या भागांवर केंद्रित करावयाचा सराव करायचा आहे. विशेषतः आपल्या मेरुदान्दावरील निरनिराळ्या जागेवर मन केंद्रित करायचा सराव करायचा आहे.                  ******** हे लिखाण वाचून कोणीही आपले आपण प्रयोग करू नयेत*********       
५ प्रत्याहार --- इंद्रिये ताब्यात ठेवणे. संवेदना शक्ती युक्त इंद्रियांना बहिर्मुख होऊन कार्य करण्याची सतत सवय आहे. त्यांना स्वतःच्या  इछेच्या  ताब्यात आणण्याला प्रत्याहार म्हणतात. प्रयाहाराचा खरा अर्थ आहे स्वतःकडे ओढून घेणे. माणसाला सर्वात कठीण असा भाग. ज्याच्यावर सर्व गीतेचे सार भगवंताने अर्जुनाला सांगितले. मन आणि शरीर ह्यांच्या संयोगाने जी  भौतिक  जगातून सुख प्राप्तीची ओढ लागते. ती माणसाला हळू  हळू स्वतःवरील  ताबा  सोडायला लावते. आणि माणसाला ईश्वरदत्त स्वातंत्र्याचा विसर पडतो. स्वतः हून काम क्रोधाचा दास होतो. ह्यातून  स्वतःच्या  मनाकडे स्वतःच्या मनाने सतत  लक्ष ठेवून त्याला अशा बहिर्गामी विचारापासून दूर ठेवणे. म्हणजे प्रत्याहाराचा अभ्यास.हि राजयोगाची  प्राथमिक तयारी आहे. अंतिम सर्व काही ह्याच तयारीवर  अवलंबून आहे. मनाला हवे तेव्हा, हवे तेथे, नेता येणे, ह्या साठी आधी त्याला स्वतःकडे आणणे म्हणजेच स्वतःच्या ताब्यात आणले पाहिजे. त्यासाठी हे सर्व साधन करायचे आहे. पाहिली पायरी मनाला इंद्रियांच्या  ताब्यातून  सोडविणे. आणि पुढची पायरी इंद्रियांवर ताबा मिळविणे. हे करण्यासाठी प्रथम आपले मन नेमके कुठे चालले आहे. ह्या क्षणी नेमका काय विचार करत  आहे.  हे त्याच्यावर सतत लक्ष ठेवून पाहत राहणे. मग ते कुठे कुठे जाते आहे ते लक्षात आल्यावर, हळूहळू त्याचे भरकटणे अपोआप कमी होते. आणि ते स्वतःच्या ताब्यात येते. जसे लहान मुलांना आपल्याकडे कोणीतरी पाहत आहे हे माहित असेल तर ती अपोआप शांत राहतात. आपल्यावर लक्ष ठेवणारे कोणी नाही ह्याची जाणीव होताच ते भरकटत जातात. हाच नियम मनाला मानाने पाहायला लागल्यावर लागू होतो., आणि मन हळू हळू आपल्या ताब्यात येवू लागते. त्यावर आपल्याच मनाने लक्ष केंद्रित करणे. हा साधनेचा पाया आणि शेवट आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.      
******** हे लिखाण वाचून कोणीही आपले आपण प्रयोग करू नयेत*********       
४ प्राणायाम - ड--- प्राणायाम  --- प्राणायामाचे बाह्यांग. --------- मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे हे प्रकार प्रत्यक्ष प्राणायामाचे नाहीत त्या निव्वळ श्वाशोछावासाच्या क्रिया आहेत. मग ह्या क्रिया कशासाठी हा सहज प्रश्न पडेल. यम, नियम ह्यांनी वृत्ती, शरीर, मन, बुद्धी, तयार करायची. तसे श्वाशोत्श्वासाच्या ह्या क्रियांनी आपल्या  शरीरातील सर्व क्रियांना एक प्रकारचे संतुलन येते. श्वाशोत्छ्वासाची क्रिया हे आपल्या शरीरूपी  यंत्राचे प्रमुख चाक (व्हील) आहे. ते नियमित चालले तर शरीरातील सर्वच क्रीयान्माद्ध्ये नियमित पणा येणार आहे. आपण पाहतो सर्व विश्व सतत स्वतःभोवती आणि एकमेकांभोवती फिरत असते. प्रत्येकाची  गती वेगवेगळी आहे. पण ज्याची त्याची गती त्याच्या  पुरती कायम  आहे, नियमित आहे, एका विशिष्ठ  लयीत  आहे.  संसारी माणसा मद्ध्ये ह्या गतीत भावनांच्या उद्वेगामुळे फरक पडतो, लय बदलते आणि ह्या गतीचे संतुलन बिघडते. ती नियमित करण्या साठी ह्या वर दिलेल्या लयीतच श्वाशोछावास करायला हवा. तरच श्वाशोछावासाच्या क्रियेने सर्व शरीर संतुलित होते. म्हणून ती अत्यावश्यक आहे. अर्थात  संसारिक माणसाला हे प्रयोग कठीण जातात. ह्या गोष्टींची हि सवय लागते. मी आपल्याला जनरेटरचे उदाहरण देतो त्याच्या गतीप्रमाणे  त्यातून  निर्माण  होणाऱ्या  वीज निर्मितीतील भार आणि वेग हा अवलंबून असतो. आपल्याला विशिष्ठ भार व वेगाची वीज निर्मिती करायची असेल, तर गतीवर नियंत्रण असणे हे अत्यावःयक आहे. हाच नियम इथे हि लागू होतो. कुंडलिनी हि शक्ती आहे. ती आपल्या शरीराला  पेलेल  अशा भार आणि वेगाने निर्माण होण्यासाठी  प्रमुख चाकाची गती नेहमी  संतुलीतच  राहिली पाहिजे. तेव्हाच आपले शर्व शरीर तिचा आवेग पेलायला समर्थ होईल. ती जर संतुलित नसेल तर विजेच्या  असंतुलितपणामुळे  जसे  दिवे लुकलुकतात तसे आपले होईल. मनाच्या एकाग्रतेने आणि श्वासोच्छ्वासाच्या संतुलित क्रियेमुळे कुंडलिनी शक्ती प्रकट होते. तिचे संतुलन श्वाशोछावासाची क्रिया करते  आणि शरीर साधनेमुळे ती धारण करायला समर्थ असेल तर ती निरनिराळ्या सिद्धींच्या रूपाने प्रकट होते.                        ******** हे लिखाण वाचून कोणीही आपले आपण प्रयोग करू नयेत*********     
४ प्राणायाम - क -- प्राणायाम -- प्राणायामाचे बाह्यांग -- श्वाशोचावासाचे नियमन -- पूरक, कुंभक, रेचक,  हि  सर्व्सामान्ण्यातः  प्राणायामाची  मुख्य ३ अंगे  आहेत. (अलीकडे ह्या विषयावर  अनेक अनेक संस्था आपल्याला हे शिकवायला सिद्ध आहेत.) पूरक म्हणजे भरणे, श्वाश घेणे. कुंभक म्हणजे श्वाश ताब्यात ठेवणे. आणि रेचक, म्हणजे श्वाश सोडणे, रिकामे करणे. प्राणायामाचे ३ प्रकार आहेत. पण नवीन  माणसास  सुरुवात करण्यासाठी प्रथम कमी कालावधी सांगितलेला आहे. ४ सेकंद पूरक १६ सेकंद कुंभक आणि ८ सेकंद रेचक ह्या प्रमाणात प्राणायाम करावा. पुढे ह्याचा अवधी वाढवत न्यावा. पण सर्व प्रकारात पूरक कुंभक व रेचाकाचे परस्पर प्रमाण वर दिले आहे तेच वापरायचे आहे. पुढे पूरक, १२ सेकंद, पूरक २४ सेकंद, व पूरक ३२ सेकंद असतो त्यां प्रमाणात कनिष्ठ, मद्ध्यं, उत्तम प्राणायाम असे प्राणायामाचे प्रकार आहेत. कनिष्ठ प्राणायामात घाम येतो, मद्ध्यं प्राणायामात शरीराला कंप सुटतो, आणि उत्तम प्राणायामात आसनावरून उत्थान होऊन  अतिशय  आनंद  वाटू  लागतो. पुढील प्रार्थना ह्यावेळी  मनात  म्हणावी. ))))) ह्या विश्वाला जन्म  देणाऱ्या त्या ज्योतिर्मय  परम  पुरुषाच्या महिम्याचे मी ध्यान करतो तो आमच्या बुद्धीत  ज्ञानाचा विकास करो.((((( गायत्री मंत्राचा हा मराठी भावार्थ आहे.  रोज निदान दोनदा तरी   अभ्यास  करायला  हवा.  त्यासाठी  सर्वात चांगल्या वेळा पाहत आणि संध्याकाळ. 
कुंभक हा मात्र श्वाश आत  ओढल्यावर जसा रोखून ठेवतात तसाच स्वास बाहेर सोडल्यावर सुद्धा करतात. ह्यामुळे प्रथम दिलेल्या प्राणायामाच्या सर्व प्रकारांचे आणखी प्रत्येकी दोन प्रकार होतात. पण  साधारणतः  बाहेर कुंभक रोखून धरणे हे कमी धोकादायक आहे. श्वास आत घेऊन  कुंभक करणे हे फार ताणून धरून करू नये. 
ह्या प्रत्येक  क्रिया  किती वेळ करायच्या  त्याला व्यक्तिपरत्वे निरनिराळ्या मर्यादा आहेत. सर्व प्रकारांचा  प्रयोग  करून वेगवेगळे  अनुभव  घेता येतात. आपल्याला  कोणता  प्राणायाम योग्य ते आपण आपल्या शिक्षकाकडून नक्की करून घ्यायला हवे.  अत्यंत हळू हळू आपला  कालखंड  वाढवावा. जराही घाई करू नये. बाह्यतः  आपण  जो  प्राणायाम करतो तो शरीराला संतुलित करतो, त्याचे नियमन करतो. हा बाह्य भाग आपण सर्वत्र शिकू शकता. 
पण प्रत्यक्षात  प्राणांचे नियमन करायचे असते त्यासाठी योग्य गुरु शोधावा. मी तर म्हणेन, आपली तळमळ खरी असेल तर योग्य गुरु आपल्याला लाभेलच लाभेल. हीच  ईश्वरचरणी प्रार्थना.      
******** हे लिखाण वाचून कोणीही आपले आपण प्रयोग करू नयेत*********       
४ प्राणायाम - ब---पूर्वार्ध --- प्राणायाम
रूपक म्हणून एक गोष्ट सांगतो.  राजे राजवाडे लहरी असतात. एका राजाची त्याच्या मंत्र्यावर इतराजी झाली. त्याने त्याला एका उंच मनोर्याच्या शेंड्यात कोंडून ठेवले. सुटण्याचा कोणताच मार्ग नव्हता. पण त्या मंत्र्याची बायको हुशार व धीट होती. ती त्या मनोर्यापाशी आली तेव्हा त्या मंत्र्याने तिला खुणेने काही  सांगितले.  त्यावरून तिने एक नाग्तोड्या आणला. त्याच्या शिंगांना मध लावला. कमरेला रेशीम बांधले आणि त्याला वर तोंड करून भिंतीवर सोडले. तो नाग्तोड्या मधाच्या आशेने वर जात जात उंच टोकावर असलेल्या त्या मंत्र्याच्या खोलीच्या खिडकीशी पोहोचला. मग मंत्र्याने त्या नाग्तोद्याला  पकडून रेशमी सुत पकडले. पुढे त्याला मग  त्याच्या बायकोने जाड सुत बांधले. पुढे पक्की दोरी बांधली. त्याच्या पुढे शेवटी  दोरखंड बांधला आणि एक एक ओढत क्रमाक्रमाने शेवटी हा दोरखंड हाती लागल्यावर तो मंत्री त्या दोरखंडाचा वापर  करून खाली उतरला आणि राजाच्या बंधनातून त्याने आपली सुटका करून घेतली. श्वाशुछावासाच्या क्रिया हि  त्या रेशमी सुतासारखी  आहे. पुढे आपल्या देहातील  ज्ञान्तान्तुतील प्रवाह हे जाड सुतासारखे आहे. मनोवृत्ती हि पक्की दोरी आहे आणि प्राण हा दोरखंड आहे तो ही आला कि मग मुक्ती आणि विश्व्वावर  स्वामित्व असा हा प्रवास आहे. म्हणजे आता आपल्या सत्य लक्षात येईल कि आपण जे काही करतो ते फक्त सुत हाताळणे असते.     
असो तेव्हा आपण आपल्या मर्यादेत जे आहे तेव्हढेच विचारात  घेणार  आहोत. फक्त आपले जुने गैरसमज जावेत हाच आजच्या ह्या लिखाणाचा हेतू आहे.     
******** हे लिखाण वाचून कोणीही आपले आपण प्रयोग करू नयेत*********  
४ प्राणायाम - अ---पूर्वार्ध --- प्राणायाम म्हटल्यावर आपल्यासमोर श्वाशोछावासाचे प्रचलित प्रकार येतात. जे आजच्या समाजात मोठ्या प्रमाणात शिकले, शिकवले जातात. त्यालाच आपण प्राणायाम सामाझतो ते मुळात सर्वस्वी चूक आहे. श्वाशोछावासाशी प्राणायामाचा  संबंध असला तरी  तो  खरोखरच अगदी थोडा आहे. खरा खरा प्राणायाम साधण्यासाठी  ज्या अनेक क्रिया कराव्या लागतात त्यांपैकी श्वाशोछावासाचे नियमन हि केवळ एक क्रिया आहे. प्राणायाम म्हणजे प्राणांचा आयाम म्हणजे संयम. प्राण म्हणजे विश्वरूप चालवणारी शक्ती जिचा औंश  आपल्या देहातही वास करत असतो त्यावर संपूर्ण विजय मिळवणे. हा प्राणायामाचा खरा अर्थ आहे, आणि हेतू आहे. साऱ्या विश्वाचे ज्ञान मिळवायचे झाले तर माणसाला अनेक जन्म  पुरणार  नाहीत म्हणून ज्या शक्तीच्या योगे ह्या सर्व विश्वाचा व्यापार चालला आहे, ते त्याचे मूळ, म्हणजे, जो प्राण, तो जाणणे, त्यावर स्वामित्व मिळवणे, म्हणजेच प्राणायाम होय. 
सागरातील पाण्याचा एक बिंदू हा त्याचा एक भाग असतो औंश असतो. त्यामुळे त्या बिंदुला जाणल्याने सर्व सागराला जाणले जाते. त्याच प्रमाणे आपल्यातील प्राणांवर ताबा मिळविता आल्यास समस्त विश्वावर ताबा येतो हे सरळ आहे.  
ज्या गोष्टी त्याच्या जवळ आहेत त्यांना जिंकण्यापासून प्राणाला जिंकायची सुरुवात करायची आहे. आपल्याला सर्वात जवळची गोष्ट म्हणजे देह आणि मन. जो प्राण विश्वात सर्वत्र खेळत असतो त्याचा जो अंश आपले हे शरीर आणि तो प्रानौंश आपल्याला सर्वात जवळचा आहे. म्हणून त्याच्या पासून सुरुवात करयची.                 ******** हे लिखाण वाचून कोणीही आपले आपण प्रयोग करू नयेत*********  
३ आसन --- स्थिरासन --- देहाला त्रास होणार नाही असे आसन. आणि ते हि दीर्घ काल स्थिर राहणारे असणे आवश्यक आहे. ह्यात  योगासनातील  सर्व  प्रकार येतात. माणसाच्या देहाच्या ताकदीप्रमाणे, कुवतीप्रमाणे गरजेप्रमाणे व प्रवृत्तीप्रमाणे दीर्घ काळ स्थिर राहता येईल असे आसन आपण आपल्यासाठी निवडायचे असते. बहुतौंशी  लोक पद्मासन  ह्या आसनाचा वापर करतात. पण काही कठोर तपस्या  करणारे  शिर्सःसानाचा हि वापर साधनेसाठी करतात. किंवा त्याही पेक्षा कठीण अश्या आसनांचा वापर करतात. एकापायावर उभे राहून असलेली आसने, वगैरे.  वास्तविक आसनाची निवड आपल्याला सहज सोसेल अशी असायला हवी. पण कठोरते मुळे देहबुद्धी जाण्यास मदत व्हावी ह्या विचाराने काही जण अशी अघोरी आसने स्वीकारतात.  कंबरभर  पान्यात  उभे  राहून सुद्धा साधना करतात. तेव्हा आसन कोणते असावे ते आपण आपले अनुभवून ठरवावे लागते. पाठीचा  कणा  ताठ  ठेवणे  अत्यावश्यक आहे. निव्वळ ताठ बसण्याने आपल्याला असे लक्षात येईल कि आपल्या मनात चांगलेच विचार येतात. साधानेमधून निर्माण  होणाऱ्या  शक्तीप्रवाहा बाबाद्त्च्या सर्व काही  घडामोडी ह्या पाठीच्या कान्याम्धून होत असतात त्यामुळे त्याला जराही बाक असल्यास साधनेला त्याचा अडथळा येईल. आपण जर नीट निरीक्षण केलेत  तर  आपल्याहि हे लक्षात येईल कि जी नेहमी माणसे ताठ बसतात ते जास्त प्रसन्न यशस्वी आत्मविश्वासू असतात.         
यम नियम ---- आत्तापर्यंत आपण सर्व प्रकारची पूर्व तयारी कशी करायची ते पाहिले. यमाच्या आचरणाने वृत्ती सात्विक बनवायच्या आहेत. आणि  नियमांच्या अभ्यासाने देह, मन, आणि बुद्धी परिपक्व बनवायची आहे. कि जेणेकरून कुंडलिनी शक्ती सोसायला आपण समर्थ होऊ. 
हा विषय समजण्यासाठी मी आपल्याला एक उदाहरण देतो ते आजच्या पिढीला नक्की भावेल. शरीर आणि मन ह्यांचा संबंध कॉम्पुटर च्या हार्ड वेअर आणि सोफ्ट वेअर सारखा आहे. तिथे दोघे जशी एकमेकांना अनुरूप असायला हवीत तसेच शरीर आणि मनाचे आहे.    
आता ह्या योगाचा मुख्य हेतू जो ---कुंडलिनी जागृती--- त्यासाठी साधना कशी करायची त्याचा विचार करायचा आहे. त्यासाठी मनाला स्वस्थ करायचे आहे, शांत करायचे आहे, स्थिर करयचे आहे,  रिकामे करायचे आहे स्वच्छ करायचे आहे. मन हे आपले शुक्ष्म शरीर आहे त्यामुळे मन स्थिर  ठेवायचे तर शरीरही  स्थिर ठेवायला हवे. त्यासाठी योग्य त्या स्थिर आसनाची आवश्यकता आहे त्यासाठी ह्या अष्टांग योगाचे पुढचे अंग आसन.  
क-(नियम)--- स्वद्ध्याय --- म्हणजे वेदाध्ययन ---- वेदांचा अभ्यास करणे. आजच्या युगात ज्या सर्व प्रकारच्या अभ्यासाच्या शाखा आहेत त्या सर्व वेदान्माद्ध्ये आहेत. १४ विद्या आणि ६४ कला ह्या सर्व शाखांमधून आपण आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही एका किंवा अनेक शाखांचे शिक्षण  घेऊ  शकतो. हा अभ्यास खूप व्यापक स्वरूपाच आहे. त्याचे अध्ययन करणे म्हणजे राजयोगी हा पर्यायाने ज्ञानी सुद्धा असायला हवा. त्याचं बुद्धीला सूक्ष्मता  आलेली असायला हवी. कारण त्याशिवाय त्याला गुरूने सांगितलेले समजणार नाही.  स्वाध्याय ह्याचा दुसरा अर्थ स्व-अध्याय असाही आहे. कारण कोणताही अभ्यास सखोल  करायचा असतो त्यावेळी तो स्वतःचा स्वतः करायचा असतो. किंबहुन अभ्यास हा स्वतःचा स्वतःच करायचा असतो. गुरु फक्त तो कसा करायचा ते सांगत  असतो. आणि ज्यावेळी द्विधा मनस्थिती होईल त्यावेळी योग्य तो मार्ग दाखवणे हेच फक्त गुरुचे काम असते. मी जन्माला आलो. त्यानंतर ---- उपडा वळू लागलो --  पुढे सरकू लागलो -- रंगू लागलो -- बसायला लागलो -- उभे राहायला लागलो -- चालायला लागलो. -- शब्द बोलायला लागलो, --  व्याकरण न शिकता ऐकून ऐकून वाक्य समज पूर्वक म्हणायला लागलो. ह्या पैकी कोणत्याही क्रियेच्या वेळी माझी उत्सुकता जिज्ञासाच मला पुढे नेत गेली. तीच जिज्ञासा मला इतर सर्व सोडून केवळ राजयोग अभ्यासायला लावेल. आज स्पून फीडिंग होते.  म्हणून  विद्यार्त्याला  समजत नाही निव्वळ पोपट किंवा पढत मूर्ख तयार होतात. आणि मग वास्तविक जगात जगायला कठीण जाते. आपल्याकडे शिक्षण म्हणजे पाठांतराची स्पर्धा झाली आहे. आणि माहितीलाच आम्ही ज्ञान सामाझातो. ती हि बऱ्याच वेळा अर्धवट असते. किंवा एकाच गोष्टीच एखादाच पैलू आपल्याला महित असतो त्यावरू आपण स्वतःला बरोबर समजतो पण त्याच गोष्टीचे इतरही अनेक पैलू असू शकतात. हि जाणीव ठेऊन वागल्याने गैरसमज होत नाहीत. निव्वळ माहिती म्हणजे ज्ञान नसून, आपल्याला असलेली माहिती, स्थळ, काल, वेळ, गरज, ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन कशी  वापरायची त्याची जाण असणे म्हणजे ज्ञान. हि जाण नाही हे आजचे सामाजिक वास्तव आहे म्हणून कलहात कलह  असे  समाजाचे  दुर्धर स्वरूप झाले आहे. त्यासाठी जरा गांभीर्याने अभ्यास  करण्याची गरज आहे. माहितच वापर स्थळ, काल, वेळ, परिस्थिती, हेतू ह्यासार्वांचा विचार करून करता येणे ह्याला ज्ञान म्हणतात. त्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता असते. ती स्वध्यायाने तयार होते.                  
ब-(नियम) --संतोष --- समाधान ---- एव्हढे सर्व कष्ट देह आणि मनाला देऊन तप करायचे तरीही मन सतत प्रसन्न ठेवायचे.  समाधान सतत प्रसन्न राहणे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे आगर. आपण कि नाही, खरोखरच बऱ्याच वेळा विषन्न असतो. करणे काहीही असतील पण प्रसन्न नसतो हे  खरे.  अर्जुन  विषाद योग हा एकच योग आपण सर्वच दीर्घ काळ अनुसरत असतो. हे ऐकायला जरा वाईट वाटेल पण खरे आहे. आजच्या काळाचे ते वास्तव आहे. कारण आपल्या आनंदाला काहीना काहीतरी कारण लागते. त्याशिवाय आपण आनंदी राहत नाही. आनंदासाठी आनंद जर अनुभवला तर मी काय म्हणतो त्याची  प्रचीती येईल. तसे नसते तर आज तरुण वर्ग सुद्धा ज्या अघोरी रोगांना बळी जातांना दिसतो ते तसे झाले नसते. प्रेमाचा अभाव त्यात अहंकार राग, त्वेष,  भीती हि त्याची करणे आहेत. आपला आनंद फक्त, यश, कीर्ती,  पैसा, आणि वासना ह्या सामावलेला आहे.   आणि हे सर्व सतत कसे  मिळतील.  इथे प्रेमासाठी  प्रेम, तसा आनंदासाठी आनंद, तशी प्रसन्नता हवी. मग सिद्धी चालत येतील. तपाने शरीर व संतोषाने मन तयार ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे वीज जशी  धातुतून त्या धातूला इजा न करता सहज वाहू लागते आणि तिची रुपांतरे निरनिराळ्या रुपात करते, तशाच सिद्धी आपल्या  देहातून सहज प्रवास करतील आपल्याला आलिंगन देतील. आणि विविध प्रकारे प्रकट होतील. पण त्यात गुंतून पडायचे नाहीये. कारण राजायोग्याचे अंतिम ध्येय मुक्ती आहे.        
२ नियम --- ह्या मद्ध्ये अ-तप, ब-संतोष, क-स्वद्ध्याय ह्या तीन गोष्टी येतात. तापाने शरीर तयार करणे आणि देहबुद्धी घालवणे संतोषाने मन तयार करणे आणि स्वध्याने बुद्धी तेजस्वी सूक्ष्म करणे.
अ -(नियम)-तप --- तप म्हणजे साधना.  साधनेत अनेक प्रकार येतात. ते रोज नियमाने पाळणे अत्यावश्यक आहे. राजयोगाच्या साधनेत मना  बरोबर  आपण आपल्या शरीरालाही योग्य त्या सवयी लावायच्या असतात. आपले शरीर जणूकाही एक मशीन आहे अश्या प्रकारे त्याला बनवायचे जेणेकरू  ज्या  ईश्वरी शक्तींची आपण आराधना करणार असतो, त्या शक्ती धारण करायला आपले शरीर तितकेच बलवान असायला हवे. बारीक सारीक रोग सुद्धा त्याला शिवता कामा नाहेत. समजण्यासाठी एक उदाहरण देतो. आपल्याला विद्दुत शक्ती माहित आहे. लाकूड किंवा तत्सम पदार्थाला स्पर्श झाला तर विद्दुत शक्ती त्यातून प्रवाहित होत नाही. आणि जिच्यातून ती प्रवाहित होत नाही तिच्यामधून कोणताच परिणाम (फळ) व्यक्त झालेला आपल्याला दिसत नाही. पण धातूला त्यातही तांबे, रूपे, सोने ह्यांना विजेचा स्पर्श झाला तर त्यातून ती वाहू लागते व आपला परिणाम दर्शविते जसे. त्या त्या धातू प्रमाणे उष्णता,  प्रकाश, गती वगैरे शक्तीत तिचे रुपांतर होते. तसेच इथे आहे आपले शरीर त्या आपल्याला अपेक्षित असलेल्या सर्व प्रकारच्या शक्तींना धारण करून आवश्यक ते परिणाम  साधण्यासाठी - अनुभवण्यासाठी सुयोग्य - समर्थ (समर्थ म्हणजे दिसायला जिम बिल्ड नव्हे) बनवणे हे ह्या साधनेत  अपेक्षित  आहे.  त्यासाठी  आणि मनाला सराव व्हावा ह्यासाठी तप केले जाते. देहबुद्धी नष्ट करणे हा तप करण्या मागचा मुख्य उद्देश आहे. तप म्हणजे सातत्य असाही अर्थ आहे (practic  makes a man perfect) तपाचे अनेक प्रकार आहेत. आणि पद्धतीही अनेक आहेत. त्यातही व्यक्ती परत्वे निवड करणे योग्य होते. काही जण तर मुद्दाम कठोर तपश्चर्या करतात. म्हणजे साधने साठी सुखासन म्हणजे सोपे सहज आसन घ्यायच्या ऐवजी शीर्षासन वगैरे कठीण आसनातच साधना करायची. हेतू हा कि देहाला स्वतःहून इतका त्रास त्यायचा कि देहबुद्धी समूळ नसत झाली पाहिजे. खुन्द्लिनी शक्ती हि पाठीच्या कण्याच्या मुळाशी असते व तिला जागृत करून मस्तक पर्यंत न्यायचे म्हणजे माणूस मुक्त होतो असे म्हणतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेण्यासाठी उलटे राहून उपासन करायची असाही काही जणांचा ग्रह असतो. एकूणच सर्व प्रकार अत्यंत कठोर आहे. पुराण  काळात तर शेकडो हजारो वर्षे आपस्चार्या केल्याचे वर्णन केलेले आढळते. देहबुद्धी घालवणे म्हणजेच देहाहंकर घालवणे, म्हणजेच आत्मबुद्धीचा  विकास  करणे. भगवंताला समोरासमोर जाणण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी, शरीर व मन दोन्ही तयार करणे आणि बुद्धीनेही परिपक्व होणे कि जिच्यामुळे मी भगवंताला जाणू शकणार नाही ह्याची जाणीव होणे. आणि मन उन्मन होणे घडेल.       
राजयोग --- पूर्वतयारीचा पहिला अध्याय झाला ---- राजयोगी होण्यासाठीची पूर्व तयारीचा एक अद्ध्याय इथे पुरा झाला. आत्तापर्यंत झालेल्या विवेचनावरून आपल्याला ह्या योग साधानेसाही पूर्व तयारी कशी आणि किती कठोरपणे करावी लागते ह्याचा अंदाज आला असेल. कारण इथे निव्वळ मुक्ती नाही तर जडावर म्हणजे भौतीकावर सुद्धा स्वामित्व मिळवायचे आहे. मानवी देहात कुंडलिनी नावाची शक्ती असते असे म्हणतात. ती जागृत झाल्यास ती माणसाला  मुक्ती मिळवून देते. किंबहुना मुक्ततेसाठी  ह्या शक्ती जागृतीची नितांत आवश्यकता आहे. असे आहे तर मग इतर योगांचे काय? त्याच्या अभ्यासानेही मुक्तीच मिळते असे म्हणतात.  इतर योगाचे सुद्धा अंतिम फळ कुंडलिनी जागृतीच आहे. पण त्यासाठी वेगळेपणाने आणि विशेष प्रयत्न करणे अभिप्रेत नाही. ही प्रगती  हळू हळू काही जन्मात व्हावी  हि अपेक्षा आहे.  श्री रामकृष्ण परमहंस  म्हणायचे  मनुष्य आणि  ईश्वर  ह्यांचे नाते  लोखंड आणि लोह्चुम्बाकास्रखे आहे. लोहचुंबक जसा त्यच्या संनिद्ध्यात आलेल्या लोखंडाला सहज आपल्याकडे ओढून घेतो तसे ईश्वर प्रत्येक जीवाला आपल्या कडे ओढून घेत असतो. पण लोखंडावर जसा गंज असतो तसे माणसाच्या मनावर इच्छांचा गंज असतो तो बाजूला केला किंवा झाला तर तो सहज ईश्वराला चिकटून जाईल.  हा न्याय  याच्यायावत जीवाला लागू आहे. निव्वळ मुक्तीची इच्छा व्हायलाही काही जन्मांची  तयारीच  लागत असते. इथे तसे नाही थेट कुंडलिनी  जागृती करणे  हेच  एकमेव ध्येय आहे. अनेक जन्मांच्या अनुभवांनी जीवाला मुक्तीची गरज भासते. तिचे तळमळीत रुपांतर होते. इतके कि केवळ हि जाणीव उराशी बाळगूनच जो जीव जन्मतो. त्याच्यासाठीच राजयोग आहे. म्हणून साधनही तितकीच कठोर आहे. इतरत्र कोठेही लक्ष न देता फक्त ह्या शक्तीवर लक्ष केंद्रित  करून आपण तिला स्वाधीन करून घेणे हे राज्योगाचे ध्येय आहे. एकाग्रता जितकी जास्त तेव्हढे यश नक्की आणि लवकर हा सरळ सरळ सिद्धांत आहे म्हणून राजयोगी इकडे तिकडे न रमता थेट ईश्वराला जावून भिडण्यासाठी इतका आटापिटा करतो. अर्थात असा माणूस जन्मावाच लागतो. हे हि आत्तापर्यंतच्या  विवेचनावरून आपल्या लक्षात आले असेलच. मी मागे म्हटल्या प्रमाणे ह्यासाठी लागणारी पूर्वतयारी आपल्याला उत्तम माणूस बनण्यासाठी नक्की  उपयोगी  पडेल. हा ह्या लिखाणाचा हेतू आहे. आत्ता कुठे एक पायरी पुरी झाली. यम आणि नियम ))))अंगवळणी पडले(((( कि दोन पायरया चढलो असे म्हणायला हरकत नाही. अर्थात बाकी सर्व अभ्यास सुद्धा एकीकडे  चालू  ठेवायचाच असतो.  आत्तापर्यंत जे काही वाचले ती हि साधनच आहे. ते साधनेचे बाह्यांग आहे.  उद्यापासून नियम म्हणजे तप, संतोष व स्वद्ध्याय म्हणंजे काय ते पहायचे आहे. ह्याच्या अभ्यासाने शरीराला तयार करायचे आहे. देहबुद्धी नष्ट  करायची  आहे. मनाने स्वतःच्या मनात प्रवेश करायचा आहे. आणि वेदाभ्यासाने बुद्धीला विकसित करायचे आहे. तयार राहा हे सर्व करायला.                  
इ-(१ यम) अपरिग्रह --- परिग्रह म्हणजे दानाचा स्वीकार अ म्हणजे नाही म्हणजे - कोणत्याही प्रकारचे दान न स्वीकारणे. कोणाही कडून कोणत्याही कारणाने दान स्वीकारायचे नाही. माणसाच्या इच्छा त्याच्या दानाबरोबर आपल्याकडे येतात. त्या चांगल्या असतील तर ठीक आहे. त्याने मिळवलेला पैसा जर चुकीच्या मार्गाने लुबाडून दुसर्यास फसवून त्रास देवून मालवला असेल तर त्या त्या व्यक्तींचे त्याला मिळालेले तळतळात आपल्याला भोगायलाच लागतात. इतर माणसांचे सोडा पण हाच नियम आपल्या वाडवडिलान कडून आलेल्या पैशाला सुद्धा लागू आहे. आपल्या वाडवाडीलांचे पैसे आपण जे वारसदार म्हणून स्वीकारतो तेही इथे चालत नाही. कारण त्याबरोबर त्यांचे नशीब सुद्धा आपल्याला भोगायला लागते. इथे राज्योगात तर आपण निव्वळ मुक्ती धडपडत असतो. नव्हे नव्हे विश्वावर स्वामित्व मिळवू पाहत असतो. त्यामुळे. दान स्वीकारल्यामुळे येणारे आपले दास्यत्व व
दुसर्याचे स्वामित्व आपल्यावर येते. ते तर इथे जराही मंजूर नाही. कोणाहीकडचे धन घ्यायचे नाही. अन्न घ्यायचेच झाले तर ते भिक्षा मागून घ्यायचे. कारण भिक्षा हि अनेक जणांकडे मागितली जाते. ती घेतल्यावर जवळपास कोणी गरजवंत सजीव असेल तर आधी त्यातील अन्न त्याला द्यायचे, त्यानंतर आपल्या पोटाला जेव्हढे हवे तेव्हढेच खायचे. बाकीचे कोणाला तरी आधीच देऊन टाकायचे. उद्या देणारा माझा भगवंत आहे तो पाहून घेईल. संचय करायचा नाही. ह्याला भिक्षा म्हणायची. भिक्षा पवित्र असते. संचय केला कि तीच भिक होते, लाचार होते, मनाला लाचार बनवते. मग मुक्ती कोठून मिळायची??? अपरिग्रह हा नेम पाळल्याने पूर्ण स्वाधीनता येते. किंबहुना स्वामित्व येते. आणि विश्वावर-भौतीकावर संपूर्ण स्वामित्व मिळविणे हे तर राज्योगाचे अंतिम लक्ष आहे. चंद्रसूर्याच्या जागा हि ह्याने ठरवायच्या इतके स्वामित्व अभिप्रेत आहे. थोडक्यात काय आपला हात कधीही उताणा असता कामा नये नेहमी उपडा असला पाहिजे.
ड-(१ यम) ब्रम्हचर्य --- लग्न न करणे व ब्राम्हचार्याचे काटेकोर पालन करणे, आपल्या शास्त्रात जे काही दिलेले असते ते प्राधान्यतः पुरुषानबद्दल लिहिलेले असते. पूर्वी स्त्रिया  समाजात  वावरत नसत. कारण त्यांना तो अधिकारही नव्हता. अधिकार ह्या शब्दाचा इथे अर्थ पात्रता असा घ्यायचा आहे. कारण निसर्ग निर्मित स्त्री पुरुष भेद जो आहे, त्यामुळे दोघांना वेगवेगळ्या प्रकारच्या निसर्गदत्त शक्ती लाभलेल्या आहेत. यांचा त्याच पद्धतीने अवलंब करून सहज यश मिळविणे हाच त्या मागचा उद्देश होता. त्यातून पुढे पुरुष प्रधान संस्कृती केव्हा कशी निर्माण झाली ते इतिहास जाणे. पण त्यामुळे त्याचे विकृत स्वरूप समाजात निर्माण झाले. आणि त्यातून विकृत सामाजिक कलह निर्माण झाले. काही बाबतीत तर काही विशिष्ट प्रकारच्या गृहस्थाश्रमी कर्मांचे  पालनही  स्त्रियांना निषिद्ध असायचे. त्यामागचा मूळ उद्देश लोप पावला. आणि एक प्रकारच सत्ताधीश पणा निर्माण झाला. माहितीलाच ज्ञान समजून त्यातून निर्माण  झालेल्या अज्ञानाचे हे फळ आहे. अजूनही समाजात माहिती म्हणजेच ज्ञान हाच मोठ्ठा गैर समज आहे. त्यातून पूर्वीच्या गैरसमजात भर पडून  अधिकाधिक  सामाजिक कलह निर्माण होत आहेत. ------- असो ----- त्यामुळे हे सर्व विचार व विचारसरणी प्रधान्न्यपणे पुरुषांना लागू होते. किंबहुना हा योग पुरुषासाठीच आहे असेही वाटू शकते. ---- देह, बुद्धी, आणि मन ह्या तीन  मिळून माणसाचे व्यक्तिमत्व प्रकट होते. त्यात श्रीमंतीची सुद्धा भर पडते. चेहरा व शरीर सुंदर दिसणे हे नशीब आणि महिनातीचे फळ आहे. त्यात भर म्हणून बुद्धीचे  तेजही  माणसाच्या चेहेर्यावर स्पष्ट दिसते. त्यात अधिक --- स्वस्छ आणि पवित्र मनाचे प्रसन्नपण  त्याच्या  सुंदर दिसण्यात भर घालते. नशिबाने जर तो श्रीमंत घरात जन्माला असेल तर त्याचे  हि तेज त्याच्या व्यक्तिमत्वाला नक्की आणखीन प्रभावी करते. ------- ह्या सर्वांवर कडी म्हणजे !!!ब्रम्हचर्य!!! ते जर कडकडीत असेल तर त्याचे तेज ह्या सर्वांहून विलक्षण दिसते. कडकडीत ब्राम्हचार्यामुळे  माणसामध्ये जी शक्ती निर्माण होते, त्याला  ओज  शक्ती असे म्हणतात. (तेच ओज, तेजस्वी वलय रूपाने आपण देव संत ह्यांच्या मागे चित्रात दाखविण्याची प्रथा आहे. अर्थात ह्यात ओजा प्रमाणेच सात्विकता सुद्धा त्यात असते) (ह्या वलयांच्या बाबतीत निरनिराळे रंग असतात, असे ज्ञानी सांगतात.)  ते अधिकारी  (ते बघण्याची पात्रता असलेल्या) पुरुषाला दिसतात.  त्यातील मला म्हाहीत आहेत तेव्हढे सांगतो. पांढरा - सत्व,  स्वच्छ,  सत्य, संतत्वाचा आहे, हीच पंढरी म्हणजे पांढरी. सुक्ष्मसाही कलंक नसलेले पांढरेपण.   लाल - विषयासक्त माणसाच्या भोवती दिसते. काळा  - पैशाचा  हव्यास  असलेल्या आत्यंतिक लोभी व्यक्तीभोवती दिसते. (हे रंग संतांना दिसतात असे म्हणतात) ब्राम्हतेज असलेला माणूस मात्र कोणालाही सहज आकर्षित  करतो.  ब्राम्हच्र्याचे तेज--- ओज लपत  नाही. हा माणूस नेहमी प्रसन्नच असतो.असा माणूस सर्वार्थाने आकर्षित दिसतो.  प्रधान्ण्यातः वैषयिक रित्या आकर्षक  असतो. (आजच्या भाषेत सेक्सी).  हे ओज म्हणजेच  आजकाल  ज्याला ओरा  म्हणतात तो होय. कडकडीत ब्रम्हचर्य पालन हि सोपी गोष्ट नाही. पण ती ह्या योगाचा पाया आहे, आणि कळसही  आहे. ते शक्य नसेल तर चुकुनही ह्या मार्गाचा विचारही करू नये. वेड सुद्धा लागू शकते. इतके  ह्याचे  महत्व आहे. कामाच्या पूर्ण निर्दालानाशिवाय कुंडलिनी  जागृती  शक्य नाही असे जाणकार सांगतात.